शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

जेष्ठ नागरिकांच्या पेंशनसाठी सरकारची कंजुषी

By admin | Updated: November 3, 2015 02:54 IST

पुरोगामी महाराष्ट्रामध्ये १ कोटी ११ लाख जेष्ठ नागरिकांची उपेक्षा सुरू आहे. केंद्र शासनाने निराधार व गरीब ज्येष्ठांसाठी पेंशन योजना सुरू केली आहे. केंद्र सरकार प्रतीव्यक्ती २०० रूपये देत

- नामदेव मोरे,  नवी मुंबईपुरोगामी महाराष्ट्रामध्ये १ कोटी ११ लाख जेष्ठ नागरिकांची उपेक्षा सुरू आहे. केंद्र शासनाने निराधार व गरीब ज्येष्ठांसाठी पेंशन योजना सुरू केली आहे. केंद्र सरकार प्रतीव्यक्ती २०० रूपये देत असून उर्वरित रक्कम राज्य शासनाने देणे बंधनकारक आहे. गोव्यात ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक २ हजार रुपये पेंशन दिली जात असून महाराष्ट्रात मात्र फक्त ६०० रुपयेच दिले जात आहे, असे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे संस्थापक डॉ. एस. पी. किंजवडेकर यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने दोन वर्षार्वी जेष्ठ नागरिक धोरण जाहीर केले. परंतू यासाठी कोणतीही आर्थिक तरतुद अर्थसंकल्पामध्ये केलेली नाही. केंद्र सरकारने १९९९ मध्ये जेष्ठ नागरिक धोरण जाहीर केले आहे. त्यानंतर देशातील निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल जेष्ठांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीस वार्धक्य निवृत्ती योजना सुरू केली. यामध्ये केंद्र सरकार प्रत्येक नागरिकासाठी २०० रूपये देते. राज्यांनी त्यामध्ये वाढ करून मदत देण्यात यावी अशा सुचना देण्यात आल्या. छोट्या राज्यांमध्ये समावेश असणाऱ्या गोवा सरकारने तब्बल २ हजार रूपये निवृत्ती वेतन सुरू केले. त्यांच्यानंतर दिल्ली,तामिळनाडू, आंध्रप्रदेश , तेलंगण राज्यांनी १ हजार रूपये देण्यास सुरवात केली आहे. परंतू महाराष्ट्रात मात्र फक्त ६०० रूपये दिले जात आहेत.महाराष्ट्र सरकारने जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवाव्या यासाठी अखील भारतीय जेष्ठ नागरिक महासंघ व अखिल महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ २० वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. संघटनेचे संस्थापक डॉ. एस. पी. किंजवडेकर, डी. एन.चापके, अन्नासाहेब टेंकाळे, अनिल कासखेडीकर, रामचंद्र देशपांडे व इतर पदाधिकारी सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार करत आहेत. राज्य शासनाने श्रावणबाळ या नावाने निवृत्ती वेतन योजना सुरू केली आहे. सरकारने ६०० रूपयांवरून निवृत्तीवेतन किमान दोनशे रूपये करावे अशी मागणी केली आहे. राज्य सरकार अनावश्यक गोष्टींवर कराडो रूपये खर्च करत आहे. परंतू जेष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन व इतर सुविधा देण्यासाठी कंजूशी केली जात आहे. याविषयी जेष्ठ नागरिक महासंघाने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. ६०० रूपये या तुटपंजा निवृत्तीवेतनामध्ये निराधार जेष्ठ नागरिकांनी कसे जगायचे असा प्रश्न उपस्थित केला आहे. गोवा सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही निवृत्तीवेतन वाढवावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गोव्यात होणार १५ वे अधिवेशनजेष्ठ नागरिक महासंघ प्रत्येक वर्षी देशातील विविध राज्यांमध्ये महाअधिवेशनाचे आयोजन करत असते. यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठीच्या योजना, समस्या व इतर गोष्टींवर लक्ष वेधण्यात येते. गोवा मध्ये जेष्ठ नागरिकांना सर्वाधीक पेंशन व सुविधा दिल्या जात आहेत. यावर्षीचे अधिवेशनही ३ व ४ मार्चला पणजीमधील शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडीयमवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.देशात गोवा सर्वाधीक २ हजार रूपये निवृत्ती वेतन देत आहे. दिल्ली, तामिळनाडू,आंध्रप्रदेश व तेलंगन सकार प्रत्येकी १ हजार रूपये देत आहे. परंतूमहाराष्ट्र सरकार मात्र जेष्ठांना फक्त ६०० रूपये देत आहे. गोवा सरकारच्या धर्तीवर राज्यातही जेष्ठांना निवृत्तीवेतन मिळाले पाहिजे. जेष्ठांच्या इतर समस्या सोडविण्यासाठीही ठोस कार्र्यवाही झाली पाहिजे. - डॉ. एस. पी. किंजवडेकर, संस्थापक,जेष्ठ नागरिक महासंघ