शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात भोंदूंचे सरकार

By admin | Updated: May 18, 2017 02:30 IST

राज्यामध्ये सध्या भोंदू लोकांचे सरकार सत्तेमध्ये आहे. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणताही कळवळा नाही. कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. केवळ भूलथापा देण्याचेच

- लोकमत न्यूज नेटवर्क

महाड : राज्यामध्ये सध्या भोंदू लोकांचे सरकार सत्तेमध्ये आहे. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणताही कळवळा नाही. कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. केवळ भूलथापा देण्याचेच उद्योग हे सरकार करीत आहे. या सरकारवर कलम ४२0 नुसार गुन्हाच दाखल व्हायला हवा, अशी टीका करत राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी महाडमध्ये सरकारवर हल्लाबोल केला.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी राज्यात काढलेल्या संघर्ष यात्रेचा कोकणातील शेवटचा टप्पा बुधवारी महाड येथून सुरू झाला. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, आ. भाई जगताप, आ. जितेंद्र आव्हाड, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, आ. सुनील केदार, महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांच्यासह विरोधी पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकरी आत्महत्यांमध्ये ६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तुरीचा पैसा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. येत्या अधिवेशनासंदर्भात काय भूमिका घ्यायची याचा निर्णय १९ मे रोजी विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी राज्यामध्ये आघाडीचे सरकार असताना भात उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत दिली जात होती. युती सरकारने मात्र भात खरेदी केंद्रेच सुरू केलेली नसल्याचा आरोप केला. कोकणातील शेतीमालाला किमान आधारभूत किंमत, फळप्रकिया उद्योगाला चालना, मुंबई-गोवा महामार्ग रखडलेला आहेच आता त्याचे चौपदरीकरणाऐवजी सहा पदरीकरण, सागरी महामार्गाबाबत त्वरित पावले उचलली जावीत असे सांगितले.प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी या सरकारला शेतकऱ्यांच्या हिताशी काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप केला. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असेही ते म्हणाले.या पत्रकार परिषदेपूर्वी विरोधी पक्षाच्या सर्व मान्यवर नेत्यांनी किल्ले रायगडवर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. त्यानंतर चवदार तळे येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, त्यांनाही अभिवादन केले.उद्धव ठाकरे तेवढेच जबाबदार- विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सरकारविरोधात ४२० कलमाखाली गुन्हा दाखल व्हायला हवा अशी सडेतोड भूमिका मांडली.- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रोज आपली भूमिका बदलत असतात असे सांगून ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे राजकारणातील लखोबा लोखंडे आहेत.