शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

राज्यात भोंदूंचे सरकार

By admin | Updated: May 18, 2017 02:30 IST

राज्यामध्ये सध्या भोंदू लोकांचे सरकार सत्तेमध्ये आहे. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणताही कळवळा नाही. कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. केवळ भूलथापा देण्याचेच

- लोकमत न्यूज नेटवर्क

महाड : राज्यामध्ये सध्या भोंदू लोकांचे सरकार सत्तेमध्ये आहे. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणताही कळवळा नाही. कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. केवळ भूलथापा देण्याचेच उद्योग हे सरकार करीत आहे. या सरकारवर कलम ४२0 नुसार गुन्हाच दाखल व्हायला हवा, अशी टीका करत राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी महाडमध्ये सरकारवर हल्लाबोल केला.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी राज्यात काढलेल्या संघर्ष यात्रेचा कोकणातील शेवटचा टप्पा बुधवारी महाड येथून सुरू झाला. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, आ. भाई जगताप, आ. जितेंद्र आव्हाड, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, आ. सुनील केदार, महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांच्यासह विरोधी पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकरी आत्महत्यांमध्ये ६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तुरीचा पैसा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. येत्या अधिवेशनासंदर्भात काय भूमिका घ्यायची याचा निर्णय १९ मे रोजी विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी राज्यामध्ये आघाडीचे सरकार असताना भात उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत दिली जात होती. युती सरकारने मात्र भात खरेदी केंद्रेच सुरू केलेली नसल्याचा आरोप केला. कोकणातील शेतीमालाला किमान आधारभूत किंमत, फळप्रकिया उद्योगाला चालना, मुंबई-गोवा महामार्ग रखडलेला आहेच आता त्याचे चौपदरीकरणाऐवजी सहा पदरीकरण, सागरी महामार्गाबाबत त्वरित पावले उचलली जावीत असे सांगितले.प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी या सरकारला शेतकऱ्यांच्या हिताशी काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप केला. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असेही ते म्हणाले.या पत्रकार परिषदेपूर्वी विरोधी पक्षाच्या सर्व मान्यवर नेत्यांनी किल्ले रायगडवर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. त्यानंतर चवदार तळे येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, त्यांनाही अभिवादन केले.उद्धव ठाकरे तेवढेच जबाबदार- विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सरकारविरोधात ४२० कलमाखाली गुन्हा दाखल व्हायला हवा अशी सडेतोड भूमिका मांडली.- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रोज आपली भूमिका बदलत असतात असे सांगून ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे राजकारणातील लखोबा लोखंडे आहेत.