शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात भोंदूंचे सरकार

By admin | Updated: May 18, 2017 02:30 IST

राज्यामध्ये सध्या भोंदू लोकांचे सरकार सत्तेमध्ये आहे. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणताही कळवळा नाही. कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. केवळ भूलथापा देण्याचेच

- लोकमत न्यूज नेटवर्क

महाड : राज्यामध्ये सध्या भोंदू लोकांचे सरकार सत्तेमध्ये आहे. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणताही कळवळा नाही. कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. केवळ भूलथापा देण्याचेच उद्योग हे सरकार करीत आहे. या सरकारवर कलम ४२0 नुसार गुन्हाच दाखल व्हायला हवा, अशी टीका करत राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी महाडमध्ये सरकारवर हल्लाबोल केला.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी राज्यात काढलेल्या संघर्ष यात्रेचा कोकणातील शेवटचा टप्पा बुधवारी महाड येथून सुरू झाला. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, आ. भाई जगताप, आ. जितेंद्र आव्हाड, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, आ. सुनील केदार, महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांच्यासह विरोधी पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकरी आत्महत्यांमध्ये ६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तुरीचा पैसा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. येत्या अधिवेशनासंदर्भात काय भूमिका घ्यायची याचा निर्णय १९ मे रोजी विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी राज्यामध्ये आघाडीचे सरकार असताना भात उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत दिली जात होती. युती सरकारने मात्र भात खरेदी केंद्रेच सुरू केलेली नसल्याचा आरोप केला. कोकणातील शेतीमालाला किमान आधारभूत किंमत, फळप्रकिया उद्योगाला चालना, मुंबई-गोवा महामार्ग रखडलेला आहेच आता त्याचे चौपदरीकरणाऐवजी सहा पदरीकरण, सागरी महामार्गाबाबत त्वरित पावले उचलली जावीत असे सांगितले.प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी या सरकारला शेतकऱ्यांच्या हिताशी काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप केला. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असेही ते म्हणाले.या पत्रकार परिषदेपूर्वी विरोधी पक्षाच्या सर्व मान्यवर नेत्यांनी किल्ले रायगडवर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. त्यानंतर चवदार तळे येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, त्यांनाही अभिवादन केले.उद्धव ठाकरे तेवढेच जबाबदार- विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सरकारविरोधात ४२० कलमाखाली गुन्हा दाखल व्हायला हवा अशी सडेतोड भूमिका मांडली.- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रोज आपली भूमिका बदलत असतात असे सांगून ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे राजकारणातील लखोबा लोखंडे आहेत.