शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शासकीय आयुर्वेदिक कॉलेजातील प्रवेशबंदी उठली, आजपासून प्रवेश सुरू; लोकमतच्या बातमीनंतर हलली यंत्रणा 

By संतोष आंधळे | Updated: November 23, 2022 08:20 IST

विद्यार्थ्यांना या महाविद्यालयांत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बुधवारपासून या महाविद्यालयात प्रवेश सुरू होणार आहेत.

मुंबई : वैद्यकीय शाखेच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असताना,  भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने राज्यातील पाच शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयांत प्रवेशबंदी केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात प्रवेश घेता येऊ शकत नव्हता. त्यानंतर, वैद्यकीय शिक्षण विभागाने ज्या कारणांकरिता बंदी घातली होती. त्या कारणांची काही दिवसांत पूर्तता केली. अखेर अटी-शर्तीसह त्या महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी उठली आहे.

विद्यार्थ्यांना या महाविद्यालयांत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बुधवारपासून या महाविद्यालयात प्रवेश सुरू होणार आहेत. ‘पाच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांत प्रवेशबंदी’ अशी बातमी ‘लोकमत’ने ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर, प्रवेशबंदीचा नियमित मागोवा घेण्यात आला. 

लोकमतच्या बातमीनंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला होता, तसेच त्यांचे वेतन दुपटीने वाढविले, तसेच क आणि ड संवर्गातील रिक्त पदे भरण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी पशुगृह लागते, त्यासाठी महाविद्यालयाजवळील पशुगृहासोबत संलग्न करून घेतले आहे. 

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या आयुष संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी उशिरा भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने प्रवेशबंदी उठविल्याचे पत्र पाठविले. त्यामध्ये त्यांनी काही अटी आणि शर्ती पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्याची पूर्तता येत्या काळात करावी लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी मुलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बुधवारपासून विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहे. मुंबई, जळगाव, नांदेड, नागपूर आणि उस्मानाबाद येथील महाविद्यालयांचा यात समावेश आहे. 

कायमस्वरूपी पदे भरण्याची मागणी - नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या आयुर्वेदिक आणि युनानी डॉक्टरांच्या संघटनेने  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून प्रवेशबंदी उठविण्याची मागणी केली होती. - या संघटनेत राज्यातील एक लाख डॉक्टरांचा समावेश आहे. या संघटनेच्या विद्यार्थी फोरमचे सरचिटणीस डॉ.राहुल राऊत यांनी सांगितले की, शासनाने प्राध्यापकाची पदे कंत्राटी स्वरूपात भरण्यापेक्षा ती कायमस्वरूपी भरावी.- त्यामुळे भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, तसेच ज्या अटी-शर्ती आयोगाने सांगितल्या आहेत, त्याची वेळेत पूर्तता करावी.

टॅग्स :Medicalवैद्यकीयStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयdoctorडॉक्टर