शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडे आणि ओबीसी चळवळ

By admin | Updated: June 4, 2014 00:39 IST

या देशातील ओबीसी चळवळीचे गोपीनाथ मुंडे हे मोठे व झुंजार नेते होते. ओबीसींच्या संपूर्ण प्रश्नांची त्यांना उत्तम जाण होती.

या देशातील ओबीसी चळवळीचे गोपीनाथ मुंडे हे मोठे व झुंजार नेते होते. ओबीसींच्या संपूर्ण प्रश्नांची त्यांना उत्तम जाण होती. मंडल आयोगाने ओबीसींसाठी करून ठेवलेल्या शिफारशींचा त्यांचा चांगला अभ्यास होता. भाजपाचे नेते असल्यामुळे मुंडे यांना खुलेपणाने ‘ओबीसी नेते’ म्हणून भूमिका  बजावता येत नव्हती, हे वास्तवही नाकारता येत नाही.  
भाजपाला अधिक व्यापक व ‘मास पार्टी’ करण्याचे खरे श्रेय गोपीनाथ मुंडे यांनाच द्यावे लागेल. महाराष्ट्रात तरी त्यांनी हे काम उत्तमरीतीने पार पाडलेले दिसते. भाजपा हा ओबीसींचा, 
वंजारी, बंजारा, माळी, धनगर समाजांचा किंबहुना अठरापगड जाती-जमातींचा पक्ष करण्यात मुंडे यांनी घेतलेल्या परिश्रमांची नोंद इतिहासाला घ्यावी लागेल. 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत जाणीवपूर्वक नोंद करून ठेवलेल्या सोयी-सवलती ओबीसींना मिळायलाच पाहिजेत, अशी मुंडे यांची धारणा होती. ओबीसींच्या जनगणनेचे महत्त्व महाराष्ट्रातील गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ या दोन नेत्यांना जेवढे पटले होते, तेवढे अन्य कुणालाही पटले नव्हते. म्हणूनच या प्रश्नावर मुंडे यांनी दिल्लीत संसद हलवून सोडली. 
देशातील ओबीसींची जनगणना ‘ओबीसी’ कोड टाकून करण्यात यावी, असे आश्वासन त्यांनी मिळवल़े पण पुढे जे व्हायचे तेच झाले. ओबीसींची जनगणना तशी झालीच नाही. 
कोड टाकला गेलाच नाही़ पण हे व्हावे यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी केलेला संघर्ष मोठा होता, सर्वव्यापी होता, ओबीसींच्या एकूणच कल्याणाचा होता. भाजपासारख्या पक्षाची थेट किंवा छुपी अशी आणखी काही भूमिका बाजूला सारून योग्य वेळ येताच ओबीसींसाठी धावून येणारा, असा हा झुंजार नेता होता. ओबीसींची जनगणना होत नसल्यामुळे किती अडचणी निर्माण झालेल्या आहेत, याची चांगली जाणीव मुंडे यांना होती. या देशातील सर्वोच्च न्यायालय, मागासवर्ग आयोगाने वेळोवेळी ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती, असा सवाल उपस्थित केलेला आहे. केंद्र सरकार त्याचे उत्तर आताही देऊ शकत नाही. 
घटनेच्या 34क् व्या कलामानुसार अस्तित्वात आलेल्या मंडल आयोगाने सांगितलेल्या शिफारशी अमलात आणण्यासाठी ही जनगणना आवश्यक होती. मुंडे हयात होते तेव्हार्पयत तरी अशी जनगणना झाली नाही. नरेंद्र मोदींच्या रूपाने ओबीसी असलेल्या पंतप्रधानांनी पुढील जनगणनेच्या वेळी तरी ओबीसींची स्वतंत्र जनगणना करून व केंद्र सरकारात ओबीसी मंत्रलय स्थापन केले तर मुंडे यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल़ 
 
ओबीसींच्या मुद्दय़ावर समान धागा
गोपीनाथ मुंडे हे भाजपाचे व छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे. मंडल आयोगाच्या प्रश्नावरच छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली, हे सर्वश्रुतच आहे. पक्ष वेगवेगळे असले तरी ओबीसींच्या प्रश्नांवर एक समान धागा दिसून येतो. मुंडे हे ‘ओबीसींच्या प्रश्नांवरचे माङो नेते भुजबळ आहेत,’ 
असे सांगायला मागे-पुढे पाहात नव्हते.
 
मनात आणले असते तर..
मनात आणले असते तर हे दोघे एकत्र येऊन ओबीसींचा एखादा पक्षही चालवू शकले असते; परंतु या देशातील ओबीसी पुरेसा जागरूक नाही याची जाणही त्यांना होती. म्हणून त्यांनी आहे त्या पक्षात राहूनच संघर्ष करून सत्ता मिळवायची व ती ओबीसी व सर्वसामान्यांसाठी वापरायची, असेच धोरण ठरलेले होते.