शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

गोपीला प्रेयसी गमविल्याचे दु:ख

By admin | Updated: November 16, 2014 00:43 IST

नक्षल चळवळीतील १५ वर्षांत अनेक हिंसक कारवाया करून नक्षल्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या दलम कमांडर गोपीला वरिष्ठ नक्षल्यांकडून वेळोवेळी त्रास दिला जात होता. त्याच्यावर संशय व्यक्त केला

वरिष्ठ नक्षलवाद्यांकडून अनन्वित छळ : गोपीने सांगितली आपबितीगडचिरोली : नक्षल चळवळीतील १५ वर्षांत अनेक हिंसक कारवाया करून नक्षल्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या दलम कमांडर गोपीला वरिष्ठ नक्षल्यांकडून वेळोवेळी त्रास दिला जात होता. त्याच्यावर संशय व्यक्त केला जात होता. कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील पोलीस चकमकीत त्याची प्रेयसी शामको ही ठार झाली. या घटनांमुळे त्रस्त गोपीने ११ नोव्हेंबर रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असल्याची माहिती गोपीने पोलिसांना दिली. गडचिरोली, गोंदियासह छत्तीसगडच्या सीमा भागात मागील अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या गोपी ऊर्फ निरंगसाय मडावी या जहाल नक्षलवाद्याने कुरखेडा तालुक्यातील सावरगावजवळच्या जंगलात एका सहकाऱ्याच्या माध्यमातून पोलिसांसमोर ११ नोव्हेंबर रोजी आत्मसमर्पण केले. गोपी हा मूळचा कोरची तालुक्यातील असून २००२ मध्ये त्याने नक्षल चळवळीत प्रवेश केला. सुरूवातीला दलम सदस्य म्हणून काम करताना त्याने हळूहळू वरिष्ठ नक्षलवाद्यांचा विश्वास संपादन केला. हिंसक कारवायांमध्ये निपुण आणि दिलेली जबाबदारी न चुकता पार पाडीत असल्याने त्याला दलम कमांडर म्हणून बढती देण्यात आली. एवढेच नव्हे, तर तो विभागीय समितीचा सदस्यसुद्धा होता. दरम्यान, गोपीची शामको ऊर्फ शांता कोरचा रा. तोडसापेढा ता. एटापल्ली हिच्यासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. शामकोच्या प्रेमात पडलेल्या गोपीचे चळवळीतील कारवायांवर लक्ष लागेनासे झाले. याची माहिती वरिष्ठ नक्षलवाद्यांना मिळाली. गोपीवर पाळत ठेवण्यास सुरूवात झाली. त्याचे एकेकाळचे सहकारी असलेले नक्षली त्याच्यावर संशय घेऊ लागले.नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य व महाराष्ट्राचा सचिव मिलिंद तेलतुंबडे याने गडचिरोली-गोंदिया डिव्हीजनचा डिव्हीजनल कमांडर पहाळसिंग याला २८ जून २०१३ रोजी पत्र लिहून गोपी व शामकोच्या प्रकरणाची माहिती दिली. हे पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. गोपी व शामकोला एकत्र ठेवू नये, गोपीला नक्षल कारवायांसाठी पुन्हा सक्षम करणे आवश्यक आहे. त्याला एकट्याला कारवाईवर पाठवू नका, त्याच्यावर विशेष नजर ठेवा, असे पत्रात म्हटले आहे. पत्रानुसार गोपी व शामकोला वेगवेगळे ठेवण्यात आले. वरिष्ठांच्या या कृतीमुळे गोपी व शामको दोघांच्याही मनात नक्षल चळवळीविषयी प्रचंड संताप निर्माण झाला होता. त्यातच १७ फेब्रुवारी २०१४ रोजी गडचिरोली-गोंदिया सीमेवर असलेल्या कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील पोलीस चकमकीत शामको ठार झाली. यामुळे गोपी पूर्णपणे हतबल झाला. एकीकडे जीवापाड प्रेम करणारी प्रेयसी गेली आणि दुसरीकडे वरिष्ठांकडून त्रास देण्याचे प्रकार वाढीस लागले.