शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

गोपीला प्रेयसी गमविल्याचे दु:ख

By admin | Updated: November 16, 2014 00:43 IST

नक्षल चळवळीतील १५ वर्षांत अनेक हिंसक कारवाया करून नक्षल्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या दलम कमांडर गोपीला वरिष्ठ नक्षल्यांकडून वेळोवेळी त्रास दिला जात होता. त्याच्यावर संशय व्यक्त केला

वरिष्ठ नक्षलवाद्यांकडून अनन्वित छळ : गोपीने सांगितली आपबितीगडचिरोली : नक्षल चळवळीतील १५ वर्षांत अनेक हिंसक कारवाया करून नक्षल्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या दलम कमांडर गोपीला वरिष्ठ नक्षल्यांकडून वेळोवेळी त्रास दिला जात होता. त्याच्यावर संशय व्यक्त केला जात होता. कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील पोलीस चकमकीत त्याची प्रेयसी शामको ही ठार झाली. या घटनांमुळे त्रस्त गोपीने ११ नोव्हेंबर रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असल्याची माहिती गोपीने पोलिसांना दिली. गडचिरोली, गोंदियासह छत्तीसगडच्या सीमा भागात मागील अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या गोपी ऊर्फ निरंगसाय मडावी या जहाल नक्षलवाद्याने कुरखेडा तालुक्यातील सावरगावजवळच्या जंगलात एका सहकाऱ्याच्या माध्यमातून पोलिसांसमोर ११ नोव्हेंबर रोजी आत्मसमर्पण केले. गोपी हा मूळचा कोरची तालुक्यातील असून २००२ मध्ये त्याने नक्षल चळवळीत प्रवेश केला. सुरूवातीला दलम सदस्य म्हणून काम करताना त्याने हळूहळू वरिष्ठ नक्षलवाद्यांचा विश्वास संपादन केला. हिंसक कारवायांमध्ये निपुण आणि दिलेली जबाबदारी न चुकता पार पाडीत असल्याने त्याला दलम कमांडर म्हणून बढती देण्यात आली. एवढेच नव्हे, तर तो विभागीय समितीचा सदस्यसुद्धा होता. दरम्यान, गोपीची शामको ऊर्फ शांता कोरचा रा. तोडसापेढा ता. एटापल्ली हिच्यासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. शामकोच्या प्रेमात पडलेल्या गोपीचे चळवळीतील कारवायांवर लक्ष लागेनासे झाले. याची माहिती वरिष्ठ नक्षलवाद्यांना मिळाली. गोपीवर पाळत ठेवण्यास सुरूवात झाली. त्याचे एकेकाळचे सहकारी असलेले नक्षली त्याच्यावर संशय घेऊ लागले.नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य व महाराष्ट्राचा सचिव मिलिंद तेलतुंबडे याने गडचिरोली-गोंदिया डिव्हीजनचा डिव्हीजनल कमांडर पहाळसिंग याला २८ जून २०१३ रोजी पत्र लिहून गोपी व शामकोच्या प्रकरणाची माहिती दिली. हे पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. गोपी व शामकोला एकत्र ठेवू नये, गोपीला नक्षल कारवायांसाठी पुन्हा सक्षम करणे आवश्यक आहे. त्याला एकट्याला कारवाईवर पाठवू नका, त्याच्यावर विशेष नजर ठेवा, असे पत्रात म्हटले आहे. पत्रानुसार गोपी व शामकोला वेगवेगळे ठेवण्यात आले. वरिष्ठांच्या या कृतीमुळे गोपी व शामको दोघांच्याही मनात नक्षल चळवळीविषयी प्रचंड संताप निर्माण झाला होता. त्यातच १७ फेब्रुवारी २०१४ रोजी गडचिरोली-गोंदिया सीमेवर असलेल्या कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील पोलीस चकमकीत शामको ठार झाली. यामुळे गोपी पूर्णपणे हतबल झाला. एकीकडे जीवापाड प्रेम करणारी प्रेयसी गेली आणि दुसरीकडे वरिष्ठांकडून त्रास देण्याचे प्रकार वाढीस लागले.