शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

गुगल सर्चद्वारे अल्पवयीन मुलाच्या हत्येचा लागला छडा

By admin | Updated: March 28, 2017 14:40 IST

गुगल सर्चच्या आधारे पोलिसांनी एका 12 वर्षांच्या मुलाच्या हत्येचा छडा लावला आहे. 7 जानेवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) बाहेर एक बॅगमध्ये रणधीर साहनीचा मृतदेह आढळून आला होता.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - गुगल सर्चच्या आधारे पोलिसांनी एका 12 वर्षांच्या मुलाच्या हत्येचा छडा लावला आहे. 7 जानेवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) बाहेर एक बॅगमध्ये रणधीर साहनीचा मृतदेह आढळून आला होता. या हत्या प्रकरणाचा गुंता गुगलमुळे पोलिसांना सोडवता येऊ शकला आहे. 
 
याप्रकरणी पोलिसांनी एकूण 6 जणांना अटक केली आहे. यातील रणविजय साहनी (20), रेणुदेवी (35) आणि शिवनाथ (36) अशी प्रमुख आरोपींची नावं आहेत. विशेष म्हणजे हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपींनी रणधीरची हत्या करुन त्याच्या आईला सव्वा लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन बिहारमध्ये पाठवलं. शिवाय, रणधीरचे आजारामुळे निधन झाल्याचंही खोट सांगितलं. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रणधीर बिहारच्या वैशाली शहरातील रहिवासी होता. मुंबईमध्ये तो रणविजयच्या बांगड्यांच्या कारखान्यात कामाला होता. रणविजय आणि अन्य आरोपी काही वर्षापूर्वीच मुंबईत आले होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जानेवारी रोजी किरकोळ कारणावरुन रणधीर आणि रणविजयमध्येही वाद झाला. यावेळी रागाच्या भरात रणविजयने रणधीरचा गळा दाबला.
 
दरम्यान, रणविजयच्या मनात त्याला ठार करण्याचा कोणताच कट नव्हता. पण गळा दाबल्यामुळे रणधीर काही वेळा बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्याच्या नातेवाईकांची घाबरगुंडी उडाली. यानंतर सर्वांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना आखली. यावेळी रणधीरचा आजाराने निधन झाले असून सांगून त्याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्याचं ठरवण्यात आले.
 
त्याचा मृतदेह ट्रेननं नेण्यासाठी रणविजयने मालाडहून एक मोठी बॅग विकत घेतली. रणधीरच्या मृतदेहावरील आधीचे कपडे बदलण्यात आले. यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी बिहारकडे एक मालगाडी जाणार होती. मृतदेह असलेली बॅग स्टेशनवर घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच स्कॅनर मशीन आरोपींनी पाहिली. व घाबरुन त्यांनी बॅग स्टेशनबाहेरच सोडली. ही बॅग ट्रॅव्हल गो कंपनीची होती. 
 
हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी गुगल सर्चद्वारे या कंपनीचा तपशील काढण्यास सुरुवात केली, त्यावेळी मुंबईतील नळ बाजारात त्याचे एक ऑफिस असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी ट्रॅव्हल गोच्या ऑफिसमध्ये जाऊन विचारपूस केली तेव्हा या बॅगचे वितरण मालाड, कुरार, गोरेगाव आणि बोरिवलीतील निरनिराळ्या भागात केले जात असल्याचे समजलं. तपास पथकाने मग त्या-त्या ठिकाणी जाऊन संबंधित दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. यावेळी मालाडमधील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये रणविजय व कृष्णा नावाचे आरोपी 1400 रुपयांने बॅग खरेदी करताना दिसले, याच कंपनीच्या बॅगमध्ये रणधीरचा मृतदेह मिळाला होता. 
 
यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचे रेखाचित्र छापून मालाड, कुरारपासून ते पश्चिम उपनगरांत वाटले. या सर्व  घडामोडींमध्ये पोलिसांनी रणविजयच्या बांगड्यांच्या कारखान्याची माहिती मिळाली. व याद्वारे पोलिसांनी रणविजय व कृष्णाच्या मुसक्या आवळल्या. या दोघांच्या अटकेनंतर बिहारमधून चार जणांना ताब्यात घेण्यात आले.  अशा प्रकारे पोलिसांनी गुगल सर्चच्या माध्यमातून हत्या प्रकरणात छडा लावला.