शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘गुड मॉर्निंग पथकांनी संवेदनशीलता बाळगावी’ : राज्य महिला आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 03:53 IST

स्वच्छ भारत अभियान अथवा हागणदारीमुक्त योजना राबविताना अधिका-यांनी आततायीपणा करू नये. योजना आणि त्यामागील हेतू चांगला असला तरी महिलांविषयी प्रकरणे हाताळताना संवेदनशीलता बाळगावी

मुंबई : स्वच्छ भारत अभियान अथवा हागणदारीमुक्त योजना राबविताना अधिका-यांनी आततायीपणा करू नये. योजना आणि त्यामागील हेतू चांगला असला तरी महिलांविषयी प्रकरणे हाताळताना संवेदनशीलता बाळगावी, असे निर्देश राज्य महिला आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.जिल्हा हागणदारीमुक्त योजनेतील ‘गुड मॉर्निंग’ पथकांच्या अतिउत्साही कारभारामुळे महिलांना विशेषत: गर्भवती महिलांना त्रास होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. सोलापूर जिल्ह्यात तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनीच उघड्यावर शौचास जाणाºया महिलांचा सत्कार केल्याचा प्रकार समोर आला. याबाबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने सोलापूर जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून दक्षता घेण्याची सूचना केली आहे. स्वच्छता अभियानाचा हेतू चांगला असून अनेक अधिकारी यात चांगले काम करतात. कारवाई करताना आततायीपणा करून महिलेला शरम, लज्जा वाटेल असा प्रकार घडू नये. महिलेचे नाव, फोटो, चित्रण किंवा ओळख उघड होईल असे प्रकार करू नयेत, अशा सूचना आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सोलापूर जिल्हाधिकाºयांना दिल्या.सोलापूर जिल्हाधिकाºयांसोबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून स्वच्छता मोहीम, जिल्हा हागणदारीमुक्त अभियान राबविताना काळजी घेण्याचे तसेच महिलांबाबत संवेदनशीलता बाळगण्याचे निर्देशही रहाटकर यांनी दिले आहेत.आज महिलांच्या प्रश्नांवर जनसुनावणीठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी गुरुवारी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी १ वाजता जनसुनावणी होणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना मुंबईत येऊन तक्रार करणे, सुनावणीस उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. त्यामुळे आयोगाच्या वतीने ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.