शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

सुदामनगरी रामभरोसे

By admin | Updated: August 7, 2014 01:06 IST

देशाच्या हृदयस्थानी असलेले नागपूर भौगोलिकदृष्ट्या सुरक्षित मानल्या जाते. परंतु माळीण येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ चमूने शहरातील काही वस्त्यांचा आढावा घेतला असता, अनेक वस्त्या पहाडीच्या

जीवाला घोर - प्रश्न कधी सुटणार ?मंगेश व्यवहारे/जीवन रामावत - नागपूरदेशाच्या हृदयस्थानी असलेले नागपूर भौगोलिकदृष्ट्या सुरक्षित मानल्या जाते. परंतु माळीण येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ चमूने शहरातील काही वस्त्यांचा आढावा घेतला असता, अनेक वस्त्या पहाडीच्या पायथ्याशी असुरक्षितच नव्हे, तर तेथील हजारो नागरिक जीव मुठीत धरून जगत असल्याचे वास्तव पुढे आले. त्यापैकी हिलटॉप परिसरातील सुदामनगरी ही एक वस्ती आहे. या संपूर्ण वस्तीला पहाडीने वेढले आहे. त्या पहाडीवरून सतत कोसळणाऱ्या दरड व दगडांमुळे लोकांमध्ये दहशत आहे. येथे आजपर्यंत अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. त्यात कुणाच्या घराच्या भिंती पडल्या, तर कुणाचे घर जमीनदोस्त झाले. तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही. येथे शंभर ते दीडशे घरांची वस्ती आहे. त्यात राहणारी शेकडो कुटुंबे गत कित्येक वर्षांपासून दहशतीत जगत आहे. दोन घरे जमीनदोस्त काही वर्षांपूर्वी येथील गीताबाई झनकलाल व शीलाबाई कांबळे यांच्या घरावर दरड कोसळून त्यात त्यांची घरे जमीनदोस्त झाली. परंतु सुदैवाने त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही कुटुंबांचा संसार उघड्यावर आला होता. त्यांना मुला-बाळांसह अनेक दिवस रस्त्यांवर काढावे लागले होते. शेवटी पै-पै गोळा करून, त्यांनी पुन्हा येथे आपले छोटेसे घर उभे केले. मात्र पहाडीवरून कोसळणाऱ्या दगडांमुळे त्यांच्या याही घरांना धोका निर्माण झाला आहे.