शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

गोडसेचे उदात्तीकरण देशासाठी घातक - श्रीपाल सबनीस

By admin | Updated: December 10, 2015 03:05 IST

महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण म्हणजे गांधींच्या महात्म्याचा पुन्हा खून करण्याचा प्रकार आहे. अशा गोष्टी देशासाठी प्रचंड घातक आहेत

सांगली : महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण म्हणजे गांधींच्या महात्म्याचा पुन्हा खून करण्याचा प्रकार आहे. अशा गोष्टी देशासाठी प्रचंड घातक आहेत. अशा प्रवृत्ती कायमच्याच संपल्या पाहिजेत, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी बुधवारी व्यक्त केले. येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सबनीस म्हणाले, मार्क्सचा विचार घेऊन कॉ. गोविंद पानसरे उभे राहिले होते. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार घेऊन डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार घेऊन एम. एम. कलबुर्गी उभे राहिले होते. मात्र या तिघांचीही हत्या करण्यात आली. हा भारतीय लोकशाहीचा, तुमचा आणि आमचा खून आहे. ही प्रवृत्ती आणि ही परंपरा कायमची संपली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, २0१५मध्ये गोडसेच्या नावाने सोहळे साजरे केले जात आहेत. ही गोष्ट हिंदूंचा उन्माद बाळगणाऱ्या लोकांसाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभनीय नाही.सरकारच्या संवेदना का संपल्या आणि कोणी मारल्या, हे आपणास कळेनासे झाले आहे. हे वातावरण चांगले नाही. कलेला कधी जात आणि धर्म नसतो. तसे असते तर बिसमिल्ला खाँसाहेबांची शहनाई प्रत्येक जाती-धर्माच्या सोहळ्यामध्ये वाजली नसती. कला आणि संस्कृतीला अशा बंधनात बांधणेही चुकीचे आहे. > ‘इसिस’चा जगभरात धोकापाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे कुचकामी नेतृत्व आहे. भविष्यात याठिकाणची सत्ता लष्कराच्या हाती जाईल आणि चुकून लष्कराची अण्वस्त्रे लष्कर-ए-तय्यबा किंवा ‘इसिस’सारख्या संघटनांच्या हाती गेली, तर जगाचा एकतृतियांश भाग कायमचा संपुष्टात येईल. म्हणून जागतिक पातळीवर इसिस व अन्य दहशतवादी प्रवृत्तींचा धोका सर्वांनाच आहे, असे मतही सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले.