शहरं
Join us  
Trending Stories
1
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
2
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
3
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
4
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
5
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
6
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
7
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
8
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
9
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
10
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
11
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
12
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
13
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
14
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
15
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
16
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
17
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
18
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
19
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
20
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी

गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जलआराखडा ऐतिहासिक - मुख्यमंत्री

By admin | Updated: July 13, 2017 19:53 IST

गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जलआराखडा आज यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जलआराखडा आज यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी समितीने तयार केलेला हा आराखडा ऐतिहासिक असून ते एक महत्वपूर्ण दस्तावेज असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 
 
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांच्यासह समितीचे सहअध्यक्ष अविनाश सुर्वे, ह. आ. ढंगारे, समितीचे सदस्य व मेरीचे निवृत्त महासंचालक एम. आय. शेख, वाल्मीचे निवृत्त प्राध्यापक प्रदीप पुरंदरे, समितीचे सदस्य सचिव एस. एच. खरात आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
जलनियोजनात अहवालाचा निश्चित वापर करु - मुख्यमंत्री
 
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी समितीने तयार केलेला हा आराखडा ऐतिहासिक असून ते एक महत्वपूर्ण दस्तावेज आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी समितीने मोठी मेहनत घेतली असून सविस्तर अभ्यास केला आहे. समितीने योग्य वेळी आराखडा सादर केला असून तो इतर खोऱ्यांचे जलआराखडे तयार करण्यासाठी मार्गदर्शक आणि दीपस्तंभासारखा ठरेल. राज्यातील इतर खोरी, उपखोरी यांचेही जलआराखडे आपणास तयार करावे लागतील. लवकरच राज्याचा संपूर्ण एकात्मिक जलआराखडा आपण तयार करु. समितीने गोदावरी खोऱ्यासंदर्भात तयार केलेल्या आराखड्याचा शासन स्विकार करीत असून त्यावर पुढची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण केली जाईल. हा आराखडा म्हणजे नुसते दस्तावेज म्हणून न राहता जलनियोजनात या आराखड्याचा वापर करण्यात येईल. त्यातील शिफारशींची दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे ते म्हणाले.
 
 मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात १० वर्षात प्रथमच झालेल्या जलपरिषदेच्या बैठकीत हा आराखडा तयार करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार तज्ज्ञ समितीने हा आराखडा तयार केला आहे. एखाद्या खोऱ्याचा असा अभ्यासपूर्ण आराखडा बनवणारे महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य असून राज्यातीलही हा पहिला आराखडा आहे, असे ते म्हणाले.      
 
जलनियोजनासाठीचे महत्वपूर्ण पाऊल – के. पी. बक्षी
 
समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी म्हणाले की, आराखडा तयार करण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी मोठी मेहनत घेतली. यासाठी समितीच्या २३ बैठका झाल्या. प्रत्यक्ष खोरे क्षेत्रात वेळोवेळी दौरे करुन समितीने सर्वांगिण जलआराखडा तयार केला आहे. हा आराखडा दोन खंडांमध्ये असून पहिल्या खंडात कार्यकारी सारांश आहे. दुसऱ्या खंडाचे दोन भाग असून त्यातील पहिल्या भागात उपखोरे निहाय जलशास्त्रीय अभ्यास, उपखोऱ्यात उपलब्ध असलेली जलसंपत्तीची स्थिती याबाबतचा अभ्यास समाविष्ठ आहे. दुसऱ्या भागात पर्यावरण, पाण्याच्या प्रकल्पाचे अर्थशास्त्र, निधी व संस्थात्मक कामकाजाबाबत शिफारशी यांचा समावेश आहे. हा अहवाल गोदावरी खोऱ्याच्या उपलब्ध पाण्याच्या व पाणीवापराच्या सर्वंकष अभ्यासाचे महत्वपूर्ण पाऊल ठरेल, असे त्यांनी सांगितले. 
 
समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी, सहअध्यक्ष अविनाश सुर्वे, सहअध्यक्ष ह. आ. ढंगारे यांच्यासह समितीवर सदस्य म्हणून निवृत्त सचिव वि. म. रानडे, एस. एल. भिंगारे, मेरीचे निवृत्त महासंचालक एम. आय. शेख, वाल्मीचे निवृत्त प्राध्यापक प्रदीप पुरंदरे, विजय परांजपे, डी. एस. कुलकर्णी, डॉ. डी. एम. मोरे  यांनी कार्य केले. समितीचे सदस्य सचिव म्हणून एस. एच. खरात यांनी कामकाज केले.