शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

गोदावरीने गाठली धोक्याची पातळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:02 IST

नाशिकमधील संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला असून नदीने

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नाशिकमधील संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. नाशिकच्या पुराचे परिमाण असणारा दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे. गोदावरीला पूर आल्याने जायकवाडी धरणातही हळूहळू नवीन पाण्याची आवक होत आहे. नाशिकमधील पेठ तालुक्यात नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील भीमा, मुळा नद्यांना पूर आला आहे. नाशिकला सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी चार वाजेनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. एकूण चार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना इशारानाशिक जिल्ह्याच्या ऊर्ध्व भागातील प्रकल्प क्षेत्र तसेच औरंगाबाद जिल्हा व जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने गंगापूर, वैजापूर व पैठण तालुक्यांतील गोदावरी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वैजापूर तालुक्याच्या हद्दीतील डोणगाव शिवारातील नदीपात्रात पहाटेच्या सुमारास पाणी येऊन धडकले. पाण्याची गती पाहता रात्रीतून ते जायकवाडीत पोहोचेल.भीमाच्या विसर्गात दुपटीने वाढ : अहमदनगर जिल्ह्यांतून जाणाऱ्या गोदावरी, भीमा, मुळा नद्यांचा विसर्ग दुपटीने वाढला आहे. भंडारदरा धरण भरत आले आहे. मुळा धरणातही जोरदार आवक सुरू आहे. भुशी धरणाच्या पायऱ्यांवरील बंदी झुगारलीपुणे जिल्ह्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांवर मागील ३५ वर्षांत एकाही पर्यटकाचा अपघात झालेला नसताना पोलीस प्रशासन पर्यटकांची अडवणूक का करीत आहे, असे आकांडतांडव करत रविवारी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यासाठी प्रवेश मोकळा करून दिला. बंदी झुगारून ते पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवर घेऊन गेले. बंदीमुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गदा आल्याचे त्यांनी सांगितले.पश्चिम महाराष्ट्रात विश्रांतीकोल्हापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने विश्रांती घेतली; त्यामुळे पंचगंगानदीच्या पुराच्या पातळीत घट होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सांगलीत पावसाने विश्रांती घेतली आहे.‘सेल्फी’ने तरुणाचा बळीचाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्यातील पाटणादेवी धबधब्याजवळील कुंडावर सेल्फी काढत असताना पाय घसरून पडल्याने योगेश्वर राजेश्वर भोरे (२३, रा. कुंडलवाडी, जि.नांदेड) याचा रविवारी दुपारी मृत्यू झाला.