शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

गोदावरीने गाठली धोक्याची पातळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:02 IST

नाशिकमधील संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला असून नदीने

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नाशिकमधील संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. नाशिकच्या पुराचे परिमाण असणारा दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे. गोदावरीला पूर आल्याने जायकवाडी धरणातही हळूहळू नवीन पाण्याची आवक होत आहे. नाशिकमधील पेठ तालुक्यात नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील भीमा, मुळा नद्यांना पूर आला आहे. नाशिकला सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी चार वाजेनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. एकूण चार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना इशारानाशिक जिल्ह्याच्या ऊर्ध्व भागातील प्रकल्प क्षेत्र तसेच औरंगाबाद जिल्हा व जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने गंगापूर, वैजापूर व पैठण तालुक्यांतील गोदावरी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वैजापूर तालुक्याच्या हद्दीतील डोणगाव शिवारातील नदीपात्रात पहाटेच्या सुमारास पाणी येऊन धडकले. पाण्याची गती पाहता रात्रीतून ते जायकवाडीत पोहोचेल.भीमाच्या विसर्गात दुपटीने वाढ : अहमदनगर जिल्ह्यांतून जाणाऱ्या गोदावरी, भीमा, मुळा नद्यांचा विसर्ग दुपटीने वाढला आहे. भंडारदरा धरण भरत आले आहे. मुळा धरणातही जोरदार आवक सुरू आहे. भुशी धरणाच्या पायऱ्यांवरील बंदी झुगारलीपुणे जिल्ह्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांवर मागील ३५ वर्षांत एकाही पर्यटकाचा अपघात झालेला नसताना पोलीस प्रशासन पर्यटकांची अडवणूक का करीत आहे, असे आकांडतांडव करत रविवारी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यासाठी प्रवेश मोकळा करून दिला. बंदी झुगारून ते पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवर घेऊन गेले. बंदीमुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गदा आल्याचे त्यांनी सांगितले.पश्चिम महाराष्ट्रात विश्रांतीकोल्हापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने विश्रांती घेतली; त्यामुळे पंचगंगानदीच्या पुराच्या पातळीत घट होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सांगलीत पावसाने विश्रांती घेतली आहे.‘सेल्फी’ने तरुणाचा बळीचाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्यातील पाटणादेवी धबधब्याजवळील कुंडावर सेल्फी काढत असताना पाय घसरून पडल्याने योगेश्वर राजेश्वर भोरे (२३, रा. कुंडलवाडी, जि.नांदेड) याचा रविवारी दुपारी मृत्यू झाला.