शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

गोदावरीने गाठली धोक्याची पातळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:02 IST

नाशिकमधील संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला असून नदीने

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नाशिकमधील संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. नाशिकच्या पुराचे परिमाण असणारा दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे. गोदावरीला पूर आल्याने जायकवाडी धरणातही हळूहळू नवीन पाण्याची आवक होत आहे. नाशिकमधील पेठ तालुक्यात नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील भीमा, मुळा नद्यांना पूर आला आहे. नाशिकला सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी चार वाजेनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. एकूण चार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना इशारानाशिक जिल्ह्याच्या ऊर्ध्व भागातील प्रकल्प क्षेत्र तसेच औरंगाबाद जिल्हा व जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने गंगापूर, वैजापूर व पैठण तालुक्यांतील गोदावरी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वैजापूर तालुक्याच्या हद्दीतील डोणगाव शिवारातील नदीपात्रात पहाटेच्या सुमारास पाणी येऊन धडकले. पाण्याची गती पाहता रात्रीतून ते जायकवाडीत पोहोचेल.भीमाच्या विसर्गात दुपटीने वाढ : अहमदनगर जिल्ह्यांतून जाणाऱ्या गोदावरी, भीमा, मुळा नद्यांचा विसर्ग दुपटीने वाढला आहे. भंडारदरा धरण भरत आले आहे. मुळा धरणातही जोरदार आवक सुरू आहे. भुशी धरणाच्या पायऱ्यांवरील बंदी झुगारलीपुणे जिल्ह्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांवर मागील ३५ वर्षांत एकाही पर्यटकाचा अपघात झालेला नसताना पोलीस प्रशासन पर्यटकांची अडवणूक का करीत आहे, असे आकांडतांडव करत रविवारी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यासाठी प्रवेश मोकळा करून दिला. बंदी झुगारून ते पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवर घेऊन गेले. बंदीमुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गदा आल्याचे त्यांनी सांगितले.पश्चिम महाराष्ट्रात विश्रांतीकोल्हापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने विश्रांती घेतली; त्यामुळे पंचगंगानदीच्या पुराच्या पातळीत घट होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सांगलीत पावसाने विश्रांती घेतली आहे.‘सेल्फी’ने तरुणाचा बळीचाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्यातील पाटणादेवी धबधब्याजवळील कुंडावर सेल्फी काढत असताना पाय घसरून पडल्याने योगेश्वर राजेश्वर भोरे (२३, रा. कुंडलवाडी, जि.नांदेड) याचा रविवारी दुपारी मृत्यू झाला.