शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

"दोन वर्षांत एक लाख सरकारी नोकऱ्या दिल्या; संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक झाली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 08:04 IST

विरोधक केवळ अफवा पसरवीत आहेत, फडणवीसांचा विधानसभेत आरोप

मुंबई - महायुती सरकार ७५ हजार सरकारी नोकऱ्या देणार, असे आम्ही जाहीर केले होते. आतापर्यंत ५७,४०० जणांना नियुक्तीपत्रे दिलेली आहेत, भरती प्रक्रिया पूर्ण झाली अन् आता कोणत्याही क्षणी नियुक्तीपत्रे दिली जातील, असे १९,८५३ जण आहेत आणि याशिवाय ३१,२०१ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. दोन वर्षांत एक लाखांवर नोकऱ्या देण्याचा हा देशातील विक्रम असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. 

काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी मृद व जलसंधारण विभागामार्फत झालेल्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्याबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. अपवादात्मक परिस्थितीत तसे घडले असले, तरी संपूर्ण भरती प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीनेच झालेली आहे. काही लोक खोट्या नॅरेटिव्हद्वारे अफवा पसरवत आहेत. पुण्यात एक वेबसाइट आहे, ती हेच काम करते. असे खोटे पसरविणाऱ्यांविरुद्ध लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले. 

गट ‘क’ची पदभरती एमपीएससीमार्फत करणारराज्य सरकारी सेवेतील गट ‘क’ची पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्यात येतील. त्यासाठी एमपीएससीने अनुमती दिली आहे. राज्य सरकारनेही तसा निर्णय घेतला आहे.सरकारी पदभरती परीक्षेच्या वेळी निरीक्षक म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल असे फडणवीस म्हणाले.

भरती पुन्हा सुरू केलीपाचवा वेतन आयोग दिल्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारने राज्यात नोकरभरती बंद केलेली होती, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती सुरू करण्यात आली, याची आठवण फडणवीस यांनी विरोधकांना करून दिली. राजेश टोपे, आशिष शेलार, रोहित पवार आदी सदस्यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

पेपरफुटीसंदर्भात कायदा याच अधिवेशनातपेपरफुटीला आळा बसण्यासाठी केंद्राने कायदा आणलेला आहे. राज्याचा असा कायदा आणण्याचा मानस गेल्याच अधिवेशनात व्यक्त केलेला होता. विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात हा कायदा निश्चितपणे आणला जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा