शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

मद्यनिर्मितीऐवजी शेतकऱ्यांना पाणी द्या !

By admin | Updated: January 20, 2015 01:27 IST

मराठवाड्याला मद्यनिर्मिती व औद्योगिकीकरणाला पाणी देण्याऐवजी नगर जिल्ह्यातील उद्ध्वस्त शेतकऱ्यांना पाणी द्यावे,

लोणी (अहमदनगर) : मराठवाड्याला मद्यनिर्मिती व औद्योगिकीकरणाला पाणी देण्याऐवजी नगर जिल्ह्यातील उद्ध्वस्त शेतकऱ्यांना पाणी द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.जायकवाडी धरणात आवश्यकता नसतानाही पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वरच्या भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. सध्या पाण्याचे फक्त राजकीय वाटप चालू असून, सामाजिक न्यायाची भूमिका जलसंपदा खात्याने घ्यावी. नाशिक महानगरपालिका जोपर्यंत पाणी शुद्ध करीत नाही तोपर्यंत इंडिया बुल्स कंपनीला पाणी देऊ नये, असे स्पष्ट करीत आघाडी सरकारचा निर्णय बाजूला ठेवून तातडीने समन्यायी पाणी वाटपाचा वाद समोपचाराने मिटवावा, असेही त्यांनी म्हटले आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्याचे पुनर्विलोकन करावे. हा राज्याच्या व जिल्ह्याच्या ऐक्याला धोका ठरणारा आहे. शेतीला प्रथम पाणी देण्याचे धोरण केंद्र सरकारने ठरविले असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. अनेक वर्षांत नवीन धरणे झालेली नाहीत. कोकणातील पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्यास दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. (वार्ताहर)