शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मराठवाड्याला खास पॅकेज द्या

By admin | Updated: September 13, 2015 02:36 IST

केंद्र सरकारने बिहारला नुकतेच सव्वाशे कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मराठवाड्यातील शेतकरी भीषण दुष्काळात होरपळून निघत असून खास बाब म्हणून मराठवाडा

औरंगाबाद : केंद्र सरकारने बिहारला नुकतेच सव्वाशे कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मराठवाड्यातील शेतकरी भीषण दुष्काळात होरपळून निघत असून खास बाब म्हणून मराठवाडा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही तशीच मदत मिळाली पाहिजे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी खुलताबाद येथे जिल्ह्यातील एक हजार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मराठवाड्यात आतापर्यंत एवढा भीषण दुष्काळ कधी पडलेला नाही. शेतकऱ्यांना जगणे मुश्कील झाले आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पॅकेजरुपी मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करण्यात येईल.मध्यंतरी केंद्राचे पथक मराठवाड्यात येऊन गेले. त्याने पाहणीचा फार्स केला, पण आता फार्सबाजी करुन चालणार नाही. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, अशी शिवसेनेची मागणी असल्याचे ठाकरे म्हणाले. (प्रतिनिधी)‘जेलभरो’पेक्षा शेतकऱ्यांच्या चुली पेटवामराठवाड्यात दुष्काळ असताना जेलभरो करण्यापेक्षा शेतकऱ्याला कशी मदत करता येईल. त्यांच्या चुली कशा पेटविता येतील याचा विचार करावा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केली. दुष्काळग्रस्तांना पाणी देण्याच्या मुद्यावर अजित पवार काय बोलले होते, याचीही आठवण त्यांनी करून दिली. प्रत्येक गावात पथकमराठवाड्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शिवसेना प्रत्येक गावात उभारी पथक स्थापन करणार आहे. पथक गावातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करील. त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.कन्यादान योजनाशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे घेतली जातील. त्याचा खर्च शिवसेना करेल.