शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मराठवाड्याला खास पॅकेज द्या

By admin | Updated: September 13, 2015 02:36 IST

केंद्र सरकारने बिहारला नुकतेच सव्वाशे कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मराठवाड्यातील शेतकरी भीषण दुष्काळात होरपळून निघत असून खास बाब म्हणून मराठवाडा

औरंगाबाद : केंद्र सरकारने बिहारला नुकतेच सव्वाशे कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मराठवाड्यातील शेतकरी भीषण दुष्काळात होरपळून निघत असून खास बाब म्हणून मराठवाडा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही तशीच मदत मिळाली पाहिजे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी खुलताबाद येथे जिल्ह्यातील एक हजार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मराठवाड्यात आतापर्यंत एवढा भीषण दुष्काळ कधी पडलेला नाही. शेतकऱ्यांना जगणे मुश्कील झाले आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पॅकेजरुपी मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करण्यात येईल.मध्यंतरी केंद्राचे पथक मराठवाड्यात येऊन गेले. त्याने पाहणीचा फार्स केला, पण आता फार्सबाजी करुन चालणार नाही. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, अशी शिवसेनेची मागणी असल्याचे ठाकरे म्हणाले. (प्रतिनिधी)‘जेलभरो’पेक्षा शेतकऱ्यांच्या चुली पेटवामराठवाड्यात दुष्काळ असताना जेलभरो करण्यापेक्षा शेतकऱ्याला कशी मदत करता येईल. त्यांच्या चुली कशा पेटविता येतील याचा विचार करावा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केली. दुष्काळग्रस्तांना पाणी देण्याच्या मुद्यावर अजित पवार काय बोलले होते, याचीही आठवण त्यांनी करून दिली. प्रत्येक गावात पथकमराठवाड्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शिवसेना प्रत्येक गावात उभारी पथक स्थापन करणार आहे. पथक गावातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करील. त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.कन्यादान योजनाशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे घेतली जातील. त्याचा खर्च शिवसेना करेल.