शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

मराठवाड्याला खास पॅकेज द्या

By admin | Updated: September 13, 2015 02:36 IST

केंद्र सरकारने बिहारला नुकतेच सव्वाशे कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मराठवाड्यातील शेतकरी भीषण दुष्काळात होरपळून निघत असून खास बाब म्हणून मराठवाडा

औरंगाबाद : केंद्र सरकारने बिहारला नुकतेच सव्वाशे कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मराठवाड्यातील शेतकरी भीषण दुष्काळात होरपळून निघत असून खास बाब म्हणून मराठवाडा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही तशीच मदत मिळाली पाहिजे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी खुलताबाद येथे जिल्ह्यातील एक हजार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मराठवाड्यात आतापर्यंत एवढा भीषण दुष्काळ कधी पडलेला नाही. शेतकऱ्यांना जगणे मुश्कील झाले आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पॅकेजरुपी मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करण्यात येईल.मध्यंतरी केंद्राचे पथक मराठवाड्यात येऊन गेले. त्याने पाहणीचा फार्स केला, पण आता फार्सबाजी करुन चालणार नाही. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, अशी शिवसेनेची मागणी असल्याचे ठाकरे म्हणाले. (प्रतिनिधी)‘जेलभरो’पेक्षा शेतकऱ्यांच्या चुली पेटवामराठवाड्यात दुष्काळ असताना जेलभरो करण्यापेक्षा शेतकऱ्याला कशी मदत करता येईल. त्यांच्या चुली कशा पेटविता येतील याचा विचार करावा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केली. दुष्काळग्रस्तांना पाणी देण्याच्या मुद्यावर अजित पवार काय बोलले होते, याचीही आठवण त्यांनी करून दिली. प्रत्येक गावात पथकमराठवाड्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शिवसेना प्रत्येक गावात उभारी पथक स्थापन करणार आहे. पथक गावातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करील. त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.कन्यादान योजनाशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे घेतली जातील. त्याचा खर्च शिवसेना करेल.