शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

शिल्लक साखरेचा पैसा शेतकऱ्यांना द्या

By admin | Updated: June 19, 2017 01:47 IST

एफ.आर.पी. प्रमाणे दर दिला असला तरी मार्चअखेर शिल्लक असलेल्या साखरेच्या विक्रीतून आलेल्या पैशाची वाटणीही शेतकऱ्यांना द्या, अशा नोटिसा

अरुण बारसकर । लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : एफ.आर.पी. प्रमाणे दर दिला असला तरी मार्चअखेर शिल्लक असलेल्या साखरेच्या विक्रीतून आलेल्या पैशाची वाटणीही शेतकऱ्यांना द्या, अशा नोटिसा साखर आयुक्तांनी राज्यातील १५० साखर कारखान्यांना बजावल्या आहेत. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार को-जनरेशन असलेल्या साखर कारखान्यान्याच्या त्या-त्या वर्षाच्या उत्पादनातून आलेल्या रक्कमेपैकी ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना व २५ टक्के रक्कम प्रशासनावर खर्च करावी तर को-जनरेशन नसलेल्या कारखान्यांनी ७० टक्के रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व ३० टक्के रक्कम प्रशासनावर खर्च करावी किंवा मागील वर्षीच्या गाळपाला पडलेल्या साखर उताऱ्यानुसार एफ.आर.पी. द्यावी असा नियम आहे. त्यानुसार बहुतेक साखर कारखाने एफ.आर.पी.ची रक्कमही देतात. परंतु मागील वर्षाची साखर शिल्लक ठेवून पुढील वर्षी अधिक दराने विक्री केली तर त्याचीही वाटणी (एफ.आर.पी.शिवाय) शेतकऱ्यांना दिली पाहिजे, असा कायदा आहे. या कायद्यानुसार साखर आयुक्तांनी राज्यातील १५० साखर कारखान्यांना २०१५-१६ च्या गाळपातून तयार झालेली साखर शिल्लक ठेवून २०१६-१७ मध्ये विक्री झालेल्या प्रमाणे उसाला दर देण्यात यावा अशा प्रकारची नोटीस दिली आहे. १५-१६ या वर्षांत साखरेला साधारण दोन हजार ४०० रुपयापर्यंत दर होता तर १६-१७ मध्ये साधारण ३४०० ते ३५०० रुपये साखरेला दर मिळाला. मागील वर्षीची साखर यावर्षी अधिक दराने विक्री केल्याने त्यातून आलेला अधिक पैसा यावर्षी गाळप झालेल्या ऊस उत्पादकांना देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी कारखान्यांना दिले आहेत. या नोटीसनंतर साखर संघाने ठराविक कारखानदारांची बैठक घेतली. या बैठकीत नियमात दुरुस्तीसाठी सहकार मंत्री व मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे निश्चित झाले. संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी, आ. बाळासाहेब पाटील, आ. दिलीप वळसे-पाटील, माजी आ. हर्षवर्धन पाटील, राजन पाटील, रोहित पवार, संजय शिंदे, कल्याण काळे, अ‍ॅड. बी.बी. ठोंबरे आदींच्या उपस्थितीत हा निर्णय झाला. लोकनेतेला प्रति टन १० हजाराचा दरमोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते साखर कारखान्याचे १६-१७ या वर्षीचे गाळप १४ हजार मे.टन. झाले होते. त्यांच्याकडे १५-१६ च्या शिल्लक असलेल्या साखरेला आलेल्या दराचा (३४०० ते ३५०० रु.) विचार करता १६-१७ मध्ये ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना प्रति टन १० हजार रुपयेचा दर द्यावा लागेल, असे नोटीस सांगते.