शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

शिल्लक साखरेचा पैसा शेतकऱ्यांना द्या

By admin | Updated: June 19, 2017 01:47 IST

एफ.आर.पी. प्रमाणे दर दिला असला तरी मार्चअखेर शिल्लक असलेल्या साखरेच्या विक्रीतून आलेल्या पैशाची वाटणीही शेतकऱ्यांना द्या, अशा नोटिसा

अरुण बारसकर । लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : एफ.आर.पी. प्रमाणे दर दिला असला तरी मार्चअखेर शिल्लक असलेल्या साखरेच्या विक्रीतून आलेल्या पैशाची वाटणीही शेतकऱ्यांना द्या, अशा नोटिसा साखर आयुक्तांनी राज्यातील १५० साखर कारखान्यांना बजावल्या आहेत. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार को-जनरेशन असलेल्या साखर कारखान्यान्याच्या त्या-त्या वर्षाच्या उत्पादनातून आलेल्या रक्कमेपैकी ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना व २५ टक्के रक्कम प्रशासनावर खर्च करावी तर को-जनरेशन नसलेल्या कारखान्यांनी ७० टक्के रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व ३० टक्के रक्कम प्रशासनावर खर्च करावी किंवा मागील वर्षीच्या गाळपाला पडलेल्या साखर उताऱ्यानुसार एफ.आर.पी. द्यावी असा नियम आहे. त्यानुसार बहुतेक साखर कारखाने एफ.आर.पी.ची रक्कमही देतात. परंतु मागील वर्षाची साखर शिल्लक ठेवून पुढील वर्षी अधिक दराने विक्री केली तर त्याचीही वाटणी (एफ.आर.पी.शिवाय) शेतकऱ्यांना दिली पाहिजे, असा कायदा आहे. या कायद्यानुसार साखर आयुक्तांनी राज्यातील १५० साखर कारखान्यांना २०१५-१६ च्या गाळपातून तयार झालेली साखर शिल्लक ठेवून २०१६-१७ मध्ये विक्री झालेल्या प्रमाणे उसाला दर देण्यात यावा अशा प्रकारची नोटीस दिली आहे. १५-१६ या वर्षांत साखरेला साधारण दोन हजार ४०० रुपयापर्यंत दर होता तर १६-१७ मध्ये साधारण ३४०० ते ३५०० रुपये साखरेला दर मिळाला. मागील वर्षीची साखर यावर्षी अधिक दराने विक्री केल्याने त्यातून आलेला अधिक पैसा यावर्षी गाळप झालेल्या ऊस उत्पादकांना देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी कारखान्यांना दिले आहेत. या नोटीसनंतर साखर संघाने ठराविक कारखानदारांची बैठक घेतली. या बैठकीत नियमात दुरुस्तीसाठी सहकार मंत्री व मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे निश्चित झाले. संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी, आ. बाळासाहेब पाटील, आ. दिलीप वळसे-पाटील, माजी आ. हर्षवर्धन पाटील, राजन पाटील, रोहित पवार, संजय शिंदे, कल्याण काळे, अ‍ॅड. बी.बी. ठोंबरे आदींच्या उपस्थितीत हा निर्णय झाला. लोकनेतेला प्रति टन १० हजाराचा दरमोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते साखर कारखान्याचे १६-१७ या वर्षीचे गाळप १४ हजार मे.टन. झाले होते. त्यांच्याकडे १५-१६ च्या शिल्लक असलेल्या साखरेला आलेल्या दराचा (३४०० ते ३५०० रु.) विचार करता १६-१७ मध्ये ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना प्रति टन १० हजार रुपयेचा दर द्यावा लागेल, असे नोटीस सांगते.