शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

'युपीए'प्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या; अमोल कोल्हेंची लोकसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 15:57 IST

केंद्रीय मंत्री म्हणतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून काहीही होणार नाही. परंतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचा दावा करतात. भाजपकडून अशा दोन भूमिका का घेतल्या जातात. हा देखील जुमलाच आहे का, असा सवाल कोल्हे यांनी केला.

नवी दिल्ली - देशातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युपीएच्या काळात केल्याप्रमाणे आता देखील संपूर्ण देशात शेतकरी कर्जमाफी करावी, अशी मागणी डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत केली.

शेतकऱ्यांना वर्षिक सहा हजार रुपये देण्याचे जाहीरातबाजी करण्यात येते. परंतु, पाच रुपये महिन्यात शेतकऱ्यांचे घर चालू शकते का, असा सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला. तसेच देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन डॉलरपर्यंत नेण्याची चर्चा आपण करत आहोत. त्याचवेळी एक लाजिरवाणी गोष्ट समोर येते. २०१५ ते २०१८ या तीन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात १२ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना जेव्हा देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलयन डॉलर झाल्याची सांगू तेव्हा ती मुलं म्हणतील ते सोडा आमचा बाप आम्हाला परत आणून द्या, अशी घणाघाती टीका कोल्हे यांनी सरकारवर केली.

यावेळी कोल्हे यांनी शेतकरी कर्जमाफीवर आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्रीय मंत्री म्हणतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून काहीही होणार नाही. परंतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचा दावा करतात. भाजपकडून अशा दोन भूमिका का घेतल्या जातात. हा देखील जुमलाच आहे का, असा सवाल कोल्हे यांनी केला. तसेच २००९ मध्ये युपीए सरकारने ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी यावेळी कोल्हे यांनी केली.

ऍग्रो टुरीझमचा प्रोत्साहन द्यावे

अर्थसंकल्पात ऍग्रो टुरीझमविषयी तरतूद करण्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या सणवार, पारंपरिक कार्यक्रमांना जागतीक पातळीवर स्थान मिळवू देण्याची ताकत ऍग्रो टुरीझममध्ये आहे. यापैकी बैलगाडा शर्यत महत्त्वाची आहे. या शर्यतीमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करता येईल. त्यामुळे बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार कोल्हे यांनी केली.