शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

'युपीए'प्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या; अमोल कोल्हेंची लोकसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 15:57 IST

केंद्रीय मंत्री म्हणतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून काहीही होणार नाही. परंतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचा दावा करतात. भाजपकडून अशा दोन भूमिका का घेतल्या जातात. हा देखील जुमलाच आहे का, असा सवाल कोल्हे यांनी केला.

नवी दिल्ली - देशातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युपीएच्या काळात केल्याप्रमाणे आता देखील संपूर्ण देशात शेतकरी कर्जमाफी करावी, अशी मागणी डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत केली.

शेतकऱ्यांना वर्षिक सहा हजार रुपये देण्याचे जाहीरातबाजी करण्यात येते. परंतु, पाच रुपये महिन्यात शेतकऱ्यांचे घर चालू शकते का, असा सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला. तसेच देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन डॉलरपर्यंत नेण्याची चर्चा आपण करत आहोत. त्याचवेळी एक लाजिरवाणी गोष्ट समोर येते. २०१५ ते २०१८ या तीन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात १२ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना जेव्हा देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलयन डॉलर झाल्याची सांगू तेव्हा ती मुलं म्हणतील ते सोडा आमचा बाप आम्हाला परत आणून द्या, अशी घणाघाती टीका कोल्हे यांनी सरकारवर केली.

यावेळी कोल्हे यांनी शेतकरी कर्जमाफीवर आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्रीय मंत्री म्हणतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून काहीही होणार नाही. परंतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचा दावा करतात. भाजपकडून अशा दोन भूमिका का घेतल्या जातात. हा देखील जुमलाच आहे का, असा सवाल कोल्हे यांनी केला. तसेच २००९ मध्ये युपीए सरकारने ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी यावेळी कोल्हे यांनी केली.

ऍग्रो टुरीझमचा प्रोत्साहन द्यावे

अर्थसंकल्पात ऍग्रो टुरीझमविषयी तरतूद करण्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या सणवार, पारंपरिक कार्यक्रमांना जागतीक पातळीवर स्थान मिळवू देण्याची ताकत ऍग्रो टुरीझममध्ये आहे. यापैकी बैलगाडा शर्यत महत्त्वाची आहे. या शर्यतीमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करता येईल. त्यामुळे बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार कोल्हे यांनी केली.