शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

मिरा-भार्इंदरला ५ एमएलडी पाणी द्या!

By admin | Updated: May 19, 2016 04:11 IST

मुंबई महापालिकेकडून १९६७ पासून मीरा-भार्इंदरला होत असलेला पाच एमएलडी पाणीपुरवठा चार वर्षापासून बंद आहे.

भार्इंदर : मुंबई महापालिकेकडून १९६७ पासून मीरा-भार्इंदरला होत असलेला पाच एमएलडी पाणीपुरवठा चार वर्षापासून बंद आहे. तो पूर्ववत होण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी मुंबई पालिकेकडे पाठपुरावा करुनही त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घातले आहे.ग्रामपंचायतीच्या काळात मुंबई पालिकेकडून मिरा-भार्इंदरच्या नागरिकांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अडीच एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली शहरातील औद्योगिक वसाहतींसह हायवे पट्यातील मोठ्या उद्योगांना प्रत्येकी एक आणि तबेले, हॉटेल यांना अर्धा असे एकूण पाच एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. महामार्गाखाली स्वतंत्र जलवाहिनी होती. चार वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रुंदीकरणासाठी रस्ते खोदले. त्यात जलवाहिनीचे मोठे नुकसान झाल्याने मुंबई पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा रुंदीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत खंडित होणार असल्याची भावना स्थानिक प्रशासनाची झाली होती. रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरही मुंबई पालिकेने शहराला होणारा पाणीपुरवठा सुरु न करता उलट नुकसान झालेली जलवाहिनी स्वखर्चातून दुरूस्त करण्याची सूचना मिरा-भार्इंदर पालिकेला केली. त्याप्रमाणे स्थानिक प्रशासनाने ही जलवाहिनी टाकण्यासाठी तब्बल ७० लाख खर्च केले. हे काम मार्च २०१५ मध्ये पूर्ण झाले. त्याची पाहणी दोन्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर पाणीपुरवठा सुरु होण्याची चिन्हे असतानाच मुंबई पालिकेने खो घातला आहे. हे पाणी शहराला मिळावे, यासाठी पाटील यांनी मुंबई पालिकेच्या जलअभियंत्यांना निवेदन दिले. महापौर गीता जैन यांनीही पत्रव्यवहार केला. परंतु,शहराला अद्याप पाच एमएलडी पाणीपुरवठा सुरु झालेला नाही. पाणीपुरवठा त्वरित सुरु करावा अन्यथा न्यायालयात दाद मागू, असा इशाराही पाटील यांनी दिला होता. (प्रतिनिधी)