शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

ठिंबकसाठी १०० टक्के अनुदान देणार - सदाभाऊ खोत

By admin | Updated: July 14, 2016 20:41 IST

ऊस पिकाला जादा पाणी लागत असल्याने यावर मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देऊन जास्तीत जास्त ऊस पिकासाठी ठिंबक सिंचन योजना राबविण्याचे

ऑनलाइन लोकमत

टेंभुर्णी, दि. १४ -  ऊस पिकाला जादा पाणी लागत असल्याने यावर मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देऊन जास्तीत जास्त ऊस पिकासाठी ठिंबक सिंचन योजना राबविण्याचे धोरण आखत आहोत़ यासाठी साखर कारखाने, नाबार्ड व शाासन यांच्या माध्यमातून व चांगल्या कंपन्यामार्फत ठिंबक सिंचनचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली़ राज्य मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर प्रथमच माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या सदाभाऊ खोत यांनी उजनी टें येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक प्रा़ सुहास पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते़यावेळी त्यांच्यासमवेत विठ्ठल शुगरचे अध्यक्ष संजयमामा शिंदे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष दिपक भोसले, जिल्हा संघटक प्रा़ सुहास पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, सातारा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष गोपीचंद पडवळकर, जिल्हा संघटक सिध्देश्वर घुगे, कार्याध्यक्ष महावीर सावळे, विजय रणदिवे, एकनाथ सुर्वे, चंद्रकांत गिड्डे, चंद्रकांत कुटे, प्रताप मिसाळ, बळीराम गायकवाड, रूषीकेश बोबडे आदी पदाधिकारी उपस्थित होते़ पूर्वीचा शेतकरी नेता आता शासनाचा प्रतिनिधी झाल्यामुळे पूर्वीच्या भूमिकेत बदल होईल असे आपल्याला वाटते का या प्रश्नावर बोलताना सदाभाऊ म्हणाले की, अजिबात नाही़ सत्तेपेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहे़ सत्तेचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठी झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे़ म्हणूनच व्यापाऱ्यांनी संप चालू केल्यानंतर मंत्री असूनही मुंबईमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला विकण्यासाठी मी गेलो़ शेतकरी हिताचा निर्णयखुल्या अर्थव्यवस्थेचा फायदा शेतकऱ्यांनाही झाला पाहिजे़ शेतकऱ्यांना खुल्या बाजारात आपल्या मर्जीप्रमाणे फळे व भाजीपाला विक्री करता आली पाहिजे म्हणून बाजार समितीच्या नियंत्रणावरून फळे, भाजीपाला मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी गैरसमजातून बंद पुकारला होता़ त्यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय देण्यात आला आहे़ यावर मार्ग काढण्यासाठी समिती नेमण्यात आली असून ६ आॅगस्टपर्यंत अहवाल देण्याच्या सुचना कमिटीस देण्यात आल्या असून शेतकरी, व्यापारी व माथाडी कामगार यांच्या हिताचाच निर्णय होईल असेही पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले़१०० कोटी खर्चुन ९ किटवेअरउजनी धरण शंभर टक्के भरले तरी त्यावरील ताण वरचेवर वाढत आहे़ धरणातून शेतीसाठी वर्षभरात चार वेळा पाणी सोडले जाते़ प्रत्येकवेळी १२ टीएमसी पाणी दिले जाते़ पाण्यासाठी धरणातील ४८ टीएमसी पाणी वापरले जाते़ परंतू वर्षभर जोपासलेली पीके जून - जुलै महिन्यात जळू लागतात़ यावर उपाय म्हणून भिमा नदी व सिना नदीवर सुमारे ९ ठिकाणी किटवेअर बांधले तर यामध्ये ३६ टीएमसी पाणी साठणार आहे़ यासाठी १०० कोटी रूपये खर्च येईल असे सांगिल्यानंतर यासाठी आपण पाठपुरावा करू असे पणन राज्यमंत्री खोत यांनी सांगितले़ खोत यांचे ठिकठिकाणी सत्कारमाढा तालुका दौऱ्यात म्हैसगांव, रिधोरे, तांदुळवाडी, कुर्डूवाडी, कुर्डू, पिंपळनेर, टेंभुर्णी, उजनी टें येथे नुतनमंत्री सदाभाऊ खोत यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला़योजनांचे हेड मिनीमाईज करणारमी पदभार स्वीकारल्यापासून मिळालेल्या वेळेत कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहे़ कृषी खात्यात ११५ हेडखाली विविध योजना राबविल्या जात आहेत़ यामध्ये बदल करून ११५ ऐवजी कमीत कमी हेडखाली या योजना राबविण्याचा विचार आहे जेणेकरून कामकाजात सुसुूत्रता येईल व योजना प्रभावीपणे होतील़वाघ यांच्या कुटुंबियांचे सात्वनजि़प़ कृषी सभापती पंडीत वाघ यांचे अपघाती निधन झाल्याचे समजताच मंत्री सदाभाऊ खोत यांनी आढेगांव येथे पंडीत वाघ यांच्या निवासस्थानी जावून वाघ कुटुंबियांचे सात्वंन केले़