शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

मुंबईत मुलींचे वर्चस्व

By admin | Updated: June 14, 2017 00:40 IST

दहावीच्या निकालात मुंबई विभागात मुलींचे वर्चस्व दिसून आले आहे. निकालाचा टक्का घसरला असला तरी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या कायम आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावीच्या निकालात मुंबई विभागात मुलींचे वर्चस्व दिसून आले आहे. निकालाचा टक्का घसरला असला तरी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या कायम आहे. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० हजार अधिक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते, अशी माहिती मुंबई विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली. मार्च ते एप्रिलदरम्यान दहावीची परीक्षा राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आली होती. मुंबई विभागातून दहावीच्या परीक्षेला ३ लाख ४३ हजार ९९१ नियमित विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३ लाख ४२ हजार ९७३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून, ३ लाख ८ हजार ९९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच मुंबई विभागाचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल हा ९०.०९ टक्के लागला आहे. मुंबई विभागातून पुनर्परीक्षार्थी (रिपिटर) विद्यार्थ्यांची संख्या ४१ हजार ९८३ इतकी होती. त्यापैकी १८ हजार १६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे पुन्हा परीक्षेला बसून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ४३.२६ टक्के इतकी आहे. मुंबई विभागात प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत ७२ हजार ७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर १ लाख ४ हजार ९९९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, द्वितीय श्रेणीत ९८ हजार ६१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तृतीय श्रेणीत ३२ हजार ६७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याप्रमाणे एकूण ३ लाख ८ हजार ९९६ नियमित विद्यार्थी मुंबई विभागातून उत्तीर्ण झाले आहेत. अरेबिक, फ्रेंच, आॅटोमोबाइल सर्व्हिस टेकनिक, ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेस, फिजिकल एज्युकेशन या विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मुंबई विभागातून एकूण ३ हजार ६४४ शाळांमधून १ लाख ८१ हजार २ मुले आणि १ लाख ६१ हजार ९१७ मुली दहावीच्या परीक्षेस बसल्या होत्या. त्यातील १ लाख ६० हजार १३८ मुले तर १ लाख ४८ हजार ८५८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८८.४७ टक्के तर मुलींचे प्रमाण ९१.९० टक्के इतके आहे. २८ हजार ९७१ मुले आणि १३ हजार १२ मुली या पुनर्परीक्षार्थी होत्या. त्यातील ११ हजार ८७२ मुले आणि ६ हजार २८८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यात मुले पास होण्याची टक्केवारी ४०.९८ टक्के आणि मुली पास होण्याची टक्केवारी ४८.३२ टक्के इतकी आहे. ८ शाळांचा शून्य टक्के निकाल मुंबई विभागातील ८ शाळांचा निकाल हा शून्य टक्के लागला आहे. तर, १ ते १० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या ४ आहे. ३ हजार ६३६ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे.