शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मुंबईत मुलींचे वर्चस्व

By admin | Updated: June 14, 2017 00:40 IST

दहावीच्या निकालात मुंबई विभागात मुलींचे वर्चस्व दिसून आले आहे. निकालाचा टक्का घसरला असला तरी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या कायम आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावीच्या निकालात मुंबई विभागात मुलींचे वर्चस्व दिसून आले आहे. निकालाचा टक्का घसरला असला तरी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या कायम आहे. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० हजार अधिक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते, अशी माहिती मुंबई विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली. मार्च ते एप्रिलदरम्यान दहावीची परीक्षा राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आली होती. मुंबई विभागातून दहावीच्या परीक्षेला ३ लाख ४३ हजार ९९१ नियमित विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३ लाख ४२ हजार ९७३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून, ३ लाख ८ हजार ९९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच मुंबई विभागाचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल हा ९०.०९ टक्के लागला आहे. मुंबई विभागातून पुनर्परीक्षार्थी (रिपिटर) विद्यार्थ्यांची संख्या ४१ हजार ९८३ इतकी होती. त्यापैकी १८ हजार १६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे पुन्हा परीक्षेला बसून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ४३.२६ टक्के इतकी आहे. मुंबई विभागात प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत ७२ हजार ७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर १ लाख ४ हजार ९९९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, द्वितीय श्रेणीत ९८ हजार ६१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तृतीय श्रेणीत ३२ हजार ६७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याप्रमाणे एकूण ३ लाख ८ हजार ९९६ नियमित विद्यार्थी मुंबई विभागातून उत्तीर्ण झाले आहेत. अरेबिक, फ्रेंच, आॅटोमोबाइल सर्व्हिस टेकनिक, ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेस, फिजिकल एज्युकेशन या विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मुंबई विभागातून एकूण ३ हजार ६४४ शाळांमधून १ लाख ८१ हजार २ मुले आणि १ लाख ६१ हजार ९१७ मुली दहावीच्या परीक्षेस बसल्या होत्या. त्यातील १ लाख ६० हजार १३८ मुले तर १ लाख ४८ हजार ८५८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८८.४७ टक्के तर मुलींचे प्रमाण ९१.९० टक्के इतके आहे. २८ हजार ९७१ मुले आणि १३ हजार १२ मुली या पुनर्परीक्षार्थी होत्या. त्यातील ११ हजार ८७२ मुले आणि ६ हजार २८८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यात मुले पास होण्याची टक्केवारी ४०.९८ टक्के आणि मुली पास होण्याची टक्केवारी ४८.३२ टक्के इतकी आहे. ८ शाळांचा शून्य टक्के निकाल मुंबई विभागातील ८ शाळांचा निकाल हा शून्य टक्के लागला आहे. तर, १ ते १० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या ४ आहे. ३ हजार ६३६ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे.