शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

द्यायचे पाच अन् घ्यायचे शंभर! इंधन स्वस्त तर धान्य महाग; जीएसटीमुळे आर्थिक भुर्दंड

By योगेश पिंगळे | Updated: July 22, 2022 09:31 IST

सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य भरडला जात असून, महागाईच्या खाईत लोटला गेल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी मुंबई : राज्य सरकारने पेट्रोलचे दर पाच रुपये तर डिझेलच्या दरात तीन रुपयांची कपात केली असल्याचा दिलासा दिला असला तरी एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे काहीतरी थोडे स्वस्त करून दिलासा दिल्याचे चित्र निर्माण केले जात असल्याचा आरोप सर्वसामान्यांनी केला आहे. गॅस सिलिंडर महाग, अन्नधान्यावर पाच टक्के जीएसटी लावल्याने हा आर्थिक भुर्दंडदेखील सामान्यांना सोसावा लागणार आहे.

 इंधन दरांसह इतर जीवनावश्यक सर्वच क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे मागील सुमारे दोन वर्ष हातावर पोट अवलंबून असणाऱ्या अनेकांच्या हाताला काम नव्हते त्यामुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर जनजीवन हळूहळू सुरळीत होऊ लागले आहे. उत्पन्नात वाढ झालेलीच नसताना सातत्याने होणाऱ्या महागाईला तोंड देताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असल्याने माल वाहतुकीचे दरदेखील वाढले आहेत. गॅसचे दर वाढल्याने हॉटेलिंगदेखील महागले आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी इंधनाच्या वाढलेल्या दरात पेट्रोल पाच रुपये तर डिझेल तीन रुपयांची कपात करून दिलासा दिला. परंतु, त्याच वेळी गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढविले आहेत. स्वयंपाकघरात दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर प्रथमच पाच टक्के जीएसटी लादला आहे. दुग्धजन्य पदार्थ आणि चिवडा किंवा मुरमुरे यावरही पाच टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.

अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटी

दैनंदिन जीवनातील मूलभूत गरज असलेल्या अन्नधान्यावर केंद्र सरकारने ५ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे.  यामध्ये अन्नधान्यावर प्रती किलो ५ ते ८ रुपये वाढणार आहेत. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे.

सिलिंडर तब्बल ५० रुपयांनी महागला

आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली़ आहे. त्यामुळे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत १,०५३ रुपयांवर पोहचल्या असून वर्षभरात ही २४४ रुपयांची वाढ झाली आहे.

पेट्रोल ५, तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

राज्यात सत्ताबदल होताच केंद्रातील भाजप सरकारच्या निर्देशानुसार राज्यात इंधनावरील करकपात करण्यात आली आहे. यामुळे पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

सर्वसामान्य महागाईच्या खाईत  

सातत्याने होणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य भरडला जात आहे. आता अन्नधान्यावरदेखील जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्यांवर अन्याय होणार असून शासनाने हा निर्णय मागे घेण्याची आवश्यकता आहे. - किशोर पवार, नागरिक

इंधन दरवाढ, गॅसचे दर वाढत आहेत तसेच प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढली आहे परंतु नागरिकांच्या उत्पन्नात मात्र वाढ झालेली नाही. महागाई कमी करून सर्वच वजनावरील अन्नधान्यावर जीएसटी लावण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा. आणि नागरिकांना दिलासा द्यावा. - विजय पाटील, नागरिक 

टॅग्स :InflationमहागाईGSTजीएसटी