शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

सृदृढ मानसिकतेतून संघटित शक्तीची निर्मिती

By admin | Updated: September 29, 2014 01:06 IST

देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, शत्रूमध्ये भीती निर्माण करण्यासाठी शक्तीची गरज आहे. तसेच देशाला सशक्त बनविण्यासाठी सृदृढ मानसिकतेची गरज आहे. आजही मांजर आडवी गेल्यावर वाहने थांबतात.

अतुल मोघे : बाल स्वयंसेवकांचा शस्त्रपूजन सोहळानागपूर : देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, शत्रूमध्ये भीती निर्माण करण्यासाठी शक्तीची गरज आहे. तसेच देशाला सशक्त बनविण्यासाठी सृदृढ मानसिकतेची गरज आहे. आजही मांजर आडवी गेल्यावर वाहने थांबतात. मात्र सिग्नलचा लाल लाईट लागला असतानाही, वाहतूक ब्रेक करतात, अशी मानसिकता समाजाची झाली आहे. नियम आणि संयमाने वागल्यास मानसिकता सृदृढ होते. त्यातून संघटित शक्ती निर्माण होते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांतचे सहकार्यवाह प्रा. अतुल मोघे यांनी व्यक्त केले. विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल स्वयंसेवकांचा शस्त्रपुजन सोहळा रेशीमबाग मैदानावर पार पडला. या सोहळ्याला वक्ता म्हणून अतुल मोघे उपस्थित होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रा.स्व.संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे व प्रमुख अतिथी म्हणून युनिव्हर्सल हाऊस प्रा. लि. चे प्रवर्तक आशिष कलोडे उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते शस्त्रपूजनाचा सोहळा पार पडला. याप्रसंगी बाल स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना आशिष कलोडे म्हणाले की, विद्यार्थीदशेत परीक्षेचा जसा अभ्यासक्रम असतो, तसाच जीवनाच्या परीक्षेत अभ्यासक्रम असतो. तो सोपा, सहज आणि आनंददायी असतो. त्याला नित्य, निरंतर केल्यास जीवनाची परीक्षा सहजतेने यशस्वी होऊ शकता. या अभ्यासक्रमाचा पहिला पेपर आरोग्याचा असतो. आरोग्य टिकविण्यासाठी नियमित व्यायाम, खेळ खेळणे गरजेचे असते. दुसरा पेपर हा वाचनाचा असतो. भरपूर वाचन केल्यास, तुम्ही अनुभवसंपन्न बनता. तिसरा पेपर म्हणजे छंद जोपासणे, छंद जोपासल्यास तुम्ही ताणतणावापासून मुक्त राहता आणि चौथा निरंतर शिकत राहणे. कारण शिकलेले कधीच वाया जात नाही. आयुष्यात कुठल्यातरी रूपाने तुम्हाला त्याची मदत होते. या सोहळ्याला उपस्थित बाल स्वयंसेवकांनी संघात शिकविल्या जाणाऱ्या शारीरिक कवायतीचे सादरीकरण केले. घोषपथकांनी शिस्तबद्ध संचलन सादर केले. सोहळ्याचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महानगर सहसंघचालक लक्ष्मण पार्डीकर यांनी केले. (प्रतिनिधी)