शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गौतम यांच्या घोटाळ्याची एसीबी करणार चौकशी, निलंगेकर यांची घोषणा

By यदू जोशी | Updated: July 3, 2019 01:02 IST

अतिरिक्त मुख्य सचिव असलेले विजयकुमार गौतम चार वर्षे संचलनालयाचे संचालक असताना १०० कोटींचे घोटाळे केले, असा चौफेर हल्ला दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी चढविला.

मुंबई : व्यवसाय प्रशिक्षण संचलनालयात आयएएस अधिकारी विजयकुमार गौतम संचालक असताना घडलेल्या १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा आणि चौकशीतील चालढकलीचा पर्दाफाश ‘लोकमत’ने केल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी एसीबीतर्फे १५ आॅगस्टपर्यंत करण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी विधानसभेत केली.एसीबी चौकशी पूर्ण होईपर्यंत आधीच्या चौकशीत दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. एसीबीचा अहवाल येणार आहे, तेव्हा विधिमंडळ अधिवेशन सुरू नसेल. त्यामुळे चौकशीबाबत सदस्यांना माहिती मिळावी, यासाठी आपल्या दालनात बैठक घेण्याचे निर्देश उपसभापती नीलम गो-हे यांनी सरकारला दिले.

अतिरिक्त मुख्य सचिव असलेले विजयकुमार गौतम चार वर्षे संचलनालयाचे संचालक असताना १०० कोटींचे घोटाळे केले, असा चौफेर हल्ला दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी चढविला. नागो गाणार, प्रा.अनिल सोले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. गिरीश व्यास, भाई जगताप यांनी २०११ ते २०१४ दरम्यानच्या या घोटाळ्याची चौकशी का दाबली जात आहे, गौतम यांना कोण वाचवू पाहत आहे, असा सवाल केला. त्यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताचा उल्लेख करून, एसीबी चौकशीची मागणी केली.

आयटीआयसाठी केलेल्या खरेदीत १०० कोटी रुपयांचे घोटाळे गौतम आणि अन्य अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाले. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर चौकशीचा फार्स केला, पण अहवालच आलेला नाही. खात्याचे सचिव असीम गुप्ता, मंत्र्यांचे खासगी सचिव मारूती मोरे, प्रभारी संचालक अनिल जाधव, सध्याचे उपसंचालक योगेश पाटील यांनी चौकशी दाबली, असा आरोप गाणार यांनी केला.गौतम यांच्याकडे आॅनलाइन शेतकरी कर्जमाफीचे काम आयटी सचिव म्हणून सोपविले होते. त्याचा बट्टयाबोळ त्यांनीच केला. ते नगरविकास विभागात असताना त्यांनी बरीच उलटी कामे केली होती असा आरोप गिरीश व्यास यांनी केला. गौतम यांचा खरा चेहरा १०० कोटींच्या घोटाळ्याने समोर आला असा चिमटा अनिल सोले यांनी काढला.

चौकशी पूर्ण होऊ नये यासाठी खात्यातील अधिकाºयांनी षड्यंत्र केले. सभागृह व सरकारची वारंवार दिशाभूल केली. पहिले प्रकरण दाबण्यात यशस्वी झाल्यानंतर २०१७-१८ मध्ये गरज नसताना ५० कोटींची खरेदी केली. त्यातही दहा कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गाणार यांनी केला. प्रशासनाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याने एसीबी चौकशीची मागणीही त्यांनी केली.‘दोषींवर कठोेर कारवाई करणार’मंत्री पाटील-निलंगेकर म्हणाले की, २०११ ते १४ च्या भ्रष्टाचाराची चौकशी एसीबीकडे सोपविण्यात येईल. त्यात दोषी अधिकाºयांवर कठोेर कारवाई केली जाईल. आधीच्या चौकशीत ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे त्यांच्यावर एसीबीचा तपास पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तर, २०१७-१८ या आर्थिक वर्षातील ५० कोटीच्या खरेदीप्रकरणाची अद्याप चौकशी झाली नाही. परंतु दोन्ही प्रकरणात तीच मंडळी असल्याचे दोन्हींचा तपास एकत्रितपणे एसीबीकडे सोपविण्यात येईल. याशिवाय, योगेश पाटील यांच्या पदोन्नतीची शिफारस करणाºयांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा