शहरं
Join us  
Trending Stories
1
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
2
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
3
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
4
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
5
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
6
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
7
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
8
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
9
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
11
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
12
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
13
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
14
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
15
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
16
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
17
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
18
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
19
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
20
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

तीन वर्षात घरोघरी पाईपने गॅस पुरवठा -जयगडमध्ये एलएनजी टर्मिनलचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 20:37 IST

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरामध्ये हिरानंदानी गु्रपतर्फे फ्लोटिंग स्टोरेज रिगॅसिफिकेशन युनिटवर आधारित एलएनजी टर्मिनल सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या तीन वर्षांमध्ये जिल्हयातील घराघरांमध्ये

ठळक मुद्देदाभोळ प्रकल्पालाही गॅस पुरवठा होणार

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरामध्ये हिरानंदानी गु्रपतर्फे फ्लोटिंग स्टोरेज रिगॅसिफिकेशन युनिटवर आधारित एलएनजी टर्मिनल सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या तीन वर्षांमध्ये जिल्हयातील घराघरांमध्ये पाईपदवारे स्वयंपाक गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. देशातील केवळ महानगरांमध्येच उपलब्ध असलेली ही सुविधा येथे उपलब्ध झाल्यास रत्नागिरी हा अशी सुविधा मिळविणारा देशातील पहिला जिल्हा ठरू शकेल.

देशातील पहिल्या फ्लोटिंग स्टोरेज रिगॅसिफिकेशन युनिटवर आधारित एलएनजी टर्मिनलचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या प्रकल्पादवारे थेट पाईप लाईनमधून दाभोळच्या रत्नागिरी पॉवर प्रोजेक्टला गॅसचा पुरवठा ३६५ दिवस केला जाणार आहे. गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी पॉवर प्रोजेक्ट वर्षातून केवळ ६ महिनेच कार्यरत आहे. एच एनर्जीच्या टर्मिनलमधून पाईपदवारे गॅसचा पुरवठा झाल्यानंतर दाभोळच्या रत्नागिरी पॉवर प्रोजेक्टमधून वर्षभर विजनिर्मिती शक्य होणार आहे.

टर्मिनल उदघाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जो प्रकल्प उभारण्यासाठी ४ ते ५ वर्षांचा कालावधी लागतो, असा हा प्रकल्प हिरानंदानी ग्रुपने केवळ १७ महिन्यात अत्यंत कल्पकतेने पूर्ण केला आहे. एलएनजी ही देशाची गरज आहे. स्वच्छ इंधनाच्या वापराकडे देशाला नेण्याचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. उद्योग, वाहतूक व घरगुती वापरासाठी जयगडचे हे टर्मिनल जिल्'ासाठी महत्वाचे ठरेल. पाईपलाईनमधून एलएनजी गॅस मिळणार असल्याने रत्नागिरीकर भाग्यवान असून महाराष्ट दिनी देशाला एक नवीन व्यवस्था मिळाली असल्याचे फडणवीस म्हणाले.

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी जयगड बंदर हे कोकण किनाºयाला लाभलेले वरदान असल्याचे सांगितले. कारखान्यांना गॅस इंधन मिळाले तर जयगड भागात व परिसरात कारखान्यांचा विकास वेगाने होईल. या पार्श्वभूमीवर पोर्टबेस इंडस्ट्री सिटी विकसित करायला हवी. कारखानदारीला आवश्यक वातावरण, सुविधा येथे आहेत, असे जेएसडब्ल्यूचे संचालक सज्जन जिंदाल यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर उद्योगपती निरंजन हिरानंदानी, दर्शन हिरानंदानी, खासदार विनायक राऊत, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार उदय सामंत, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.गॅस हे क्लीन फ्युएलरत्नागिरी जिल्हयातील घरोघरी, वाहने व उद्योगांना इंधन म्हणून गॅस पुरवठा करण्यासाठी आवश्यक स्टोेरेज स्टेशन्स कंपनीतर्फे उभारली जाणार आहेत. घरांमध्ये दिला जाणारा हा गॅस एलपीजी गॅसपेक्षा स्वस्त मिळणार आहे. तसेच या गॅसच्या वापरामुळे स्वच्छ इंधन (क्लीन फ्युएल) उपलब्ध होणार असून अन्य इंधनाप्रमाणे प्रदुषणाचा धोका उरणार नाही.

 

 

 

 

टॅग्स :ministerमंत्रीgovernment schemeसरकारी योजना