शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कचरा उचलण्याच्या ठेक्याच्या मुदत महिना अखेर संपणार; उल्हासनगरात दिवाळीनंतर कचरा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 19:38 IST

शहरातील कचरा उचलण्याच्या ठेक्याची मुदत संपण्यापूर्वी महापालिकेने नवीन ठेकेदार नियुक्त केला नाहीतर, कचऱ्याची टांगती तलवार शहरवासियावर उभी टांगली जाणार आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील कचरा उचलण्याच्या ठेक्याची मुदत संपण्यापूर्वी महापालिकेने नवीन ठेकेदार नियुक्त केला नाहीतर, कचऱ्याची टांगती तलवार शहरवासियावर उभी टांगली जाणार आहे. कचऱ्याचा ठेका देण्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली असून तत्कालीन ठेक्याच्या कार्यपद्धतीवर सर्वस्तरातून टीका होत आहे. 

उल्हासनगरातील कचरा उचलण्याचा ठेका महापालिकेने कोणार्क नावाच्या कंपनीला दिला असून कंपनीचा ठेका ५ डिसेंबरला संपणार आहे. महापालिका कचरा उचलण्यावर दररोज ४ लाख तर वर्षाला १५ कोटी पेक्षा जास्त खर्च करीत आहेत. महापालिका आरोग्य विभागाने ठेका संपण्यापूर्वी नवीन ठेका देण्याबाबत प्रक्रिया करणे गरजेचे आहे. मात्र ठेक्याच्या मुदत संपण्याला एक महिन्याच्या कालावधी बाकी असतांना नवीन ठेका प्रक्रिया सुरू केली. अशी माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली. दिवाळी सणा दरम्यान कचऱ्यात वाढ झाल्याने, कचरा उचलण्यासाठी जास्तीची साधनसामग्री लावल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी दिली. असे असतांना शहरातील अनेक कचरा कुंड्या ओव्हरफ्लॉ झाल्याचे चित्र शहरात आहे. 

महापालिका कचरा उचलण्यावर वर्षाला १५ कोटी पेक्षा खर्च करीत असून डम्पिंग ग्राऊंड वरील कचरा सफाटीकरणावर ३ कोटी खर्च केला जात आहे. तसेच शहरातील डेब्रिज उचलण्यावर ३ कोटी पेक्षा जास्त खर्च केला जात असूनही शहरातील विविध भागात कचरा, डेब्रिजचे ढिग दिसत आहे. वर्षाला १५ कोटी पेक्षा जास्त खर्च एकट्या कचरा उचलण्याच्या ठेक्यावर करूनही कचऱ्याचे साम्राज्य शहरात आहे. कचरा ठेका देण्याची निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडल्यास, यापेक्षा कमी किंमतीला कचरा उचलनारा ठेकेदार महापालिकेला मिळू शकतो. असेही बोलले जाते. मात्र महापालिका महासभेत महत्वाच्या विषयावर विरोधी पक्ष आपली भूमिका वठवित नसल्याचे चित्र शहरात आहे. २७० कंत्राटी कामगार ठेका व मालमत्ता सर्वेक्षण व मॅपिंग ठेक्याच्या वेळी सत्ताधारी शिवसेना व विरोधी पक्ष भाजप एकत्र आल्याचे गेल्या महिन्यात शहरवासीयांनी पाहिले आहे.

कचऱ्याचा ठेकेदार बदलण्याची मागणी?

 शहरातील कचरा नियमित उचलला जात नसून दिवाळी सणा समोर शहर कचऱ्यात हरविल्याचा भास होतो. तसेच ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवर बहुतांश नगरसेवक व नागरिकांनी नापसंती दर्शविली आहे. नवीन ठेकेदार नियुक्ती करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर