शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गणपतीपुळे जागतिक दर्जाचे

By admin | Updated: August 6, 2015 23:23 IST

सुधीर मुनगंटीवार : अनेक सुविधांनी तीर्थक्षेत्र होणार ‘स्मार्ट टुरिझम सेंटर’

रत्नागिरी : महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाच्या श्री क्षेत्र गणपतीपुळेला पर्यटनदृष्ट्या जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. येथे वर्षाला येणाऱ्या २० लाखांपेक्षा अधिक पर्यटक, गणेश भक्तांसाठी टप्प्या टप्प्याने सर्व सुविधा निर्माण करून गणपतीपुळे ‘स्मार्ट टुरिझम सेंटर’ बनविले जाणार असल्याची ग्वाही राज्याचे पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा शिष्टमंडळाला दिली आहे. रत्नागिरी शहराची स्मार्ट शहर होण्याची संधी हुकली असली तरी, आता याच तालुक्यातील गणपतीपुळे क्षेत्र ‘स्मार्ट’ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. श्री क्षेत्र गणपतीपुळे हे स्वयंभू देवस्थान आहे. येथील श्रीगणेश भक्तांना पावणारा म्हणून प्रसिध्द आहे. तसेच फेसाळणारा समुद्र व पांढऱ्या शुभ्र किनाऱ्यावर हे क्षेत्र वसलेले असल्यानेही देशवासियांना या ठिकाणाबाबत मोठे आकर्षण आहे. या ठिकाणी येणाऱ्या लाखो पर्यटक व भक्तांसाठी असलेल्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अत्यंत लोकप्रिय असलेल्या या क्षेत्राचा सर्वांगिण विकास करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील शिडी संस्थानाप्रमाणेच हे क्षेत्र धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत, त्यासाठी पुरेसा निधी देण्याची तयारी मुनगंटीवार यांनी दाखविली आहे. काही महिन्यांपूर्वी मंत्री मुनगंटीवार रत्नागिरीत आले असता त्यांनी गणपतीपुळेला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी गणपतीपुळेच्या विकासाला निधीची कमतरता भासणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.विकास प्रक्रियेनुसार गणपतीपुळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय (अक्वेरियम) उभारण्याचा प्रस्तावही शासनाच्या विचाराधीन आहे. येथील समुद्रकिनारी पर्यटक स्नान करीत असताना अपघात होऊ नयेत यासाठी अपघात प्रतिबंधक उपाययोजना करणे, मोठ्या प्रमाणातील पर्यटकांसाठी निवळी एम.आय.डी.सी. येथून जयगडकडे जाणाऱ्या वाहिनीदवारे पाणी आणून ते गणपतीपुळेला पुरवठा करण्याबाबतही शिष्टमंडळाशी चर्चा झाली. पर्यटन मंत्र्यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्र तथा बाळ माने, विनय नातू, राजन तेली, अ‍ॅड. अजित गोगटे, प्रशांत ठाकुर, माजी आमदार प्रमोद जठार, प्रवीण दरेकर, रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोकणच्या शिष्टमंडळाचा पाठपुरावागणपतीपुळे येथे येणाऱ्या भक्त पर्यटकांसाठी विविध सोई सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. मुख्य रस्ते, आंतरिक सुविधा, वाहनतळ व्यवस्था, प्रवाशांसाठी बस स्थानक, जलनिस्सारण, सांडपाण्यावर प्रक्रीया करून पुनर्वापर, पथदीप, भुयारी गटारे, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, साईट अ‍ॅँड साऊंड प्रकल्प, एम.टी.डी.सी.ची निवास व भोजन व्यवस्था अद्ययावत करणे, रेल्वे, बस आरक्षणाची सुविधा, सी प्लेन निर्माण केल्या जाणार आहेत.दरवर्षी गणपतीपुळेत येतात २० लाखांवर पर्यटक. रत्नागिरीची स्मार्ट सिटीची हुकलेली संधी गणपतीपुळे भरून काढणार.सी प्लेन सुरू करण्याबाबत चर्चा. रेल्वे आरक्षण, अद्ययावत बसस्थानक होणार.