शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

गणपतीपुळे जागतिक दर्जाचे

By admin | Updated: August 6, 2015 23:23 IST

सुधीर मुनगंटीवार : अनेक सुविधांनी तीर्थक्षेत्र होणार ‘स्मार्ट टुरिझम सेंटर’

रत्नागिरी : महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाच्या श्री क्षेत्र गणपतीपुळेला पर्यटनदृष्ट्या जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. येथे वर्षाला येणाऱ्या २० लाखांपेक्षा अधिक पर्यटक, गणेश भक्तांसाठी टप्प्या टप्प्याने सर्व सुविधा निर्माण करून गणपतीपुळे ‘स्मार्ट टुरिझम सेंटर’ बनविले जाणार असल्याची ग्वाही राज्याचे पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा शिष्टमंडळाला दिली आहे. रत्नागिरी शहराची स्मार्ट शहर होण्याची संधी हुकली असली तरी, आता याच तालुक्यातील गणपतीपुळे क्षेत्र ‘स्मार्ट’ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. श्री क्षेत्र गणपतीपुळे हे स्वयंभू देवस्थान आहे. येथील श्रीगणेश भक्तांना पावणारा म्हणून प्रसिध्द आहे. तसेच फेसाळणारा समुद्र व पांढऱ्या शुभ्र किनाऱ्यावर हे क्षेत्र वसलेले असल्यानेही देशवासियांना या ठिकाणाबाबत मोठे आकर्षण आहे. या ठिकाणी येणाऱ्या लाखो पर्यटक व भक्तांसाठी असलेल्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अत्यंत लोकप्रिय असलेल्या या क्षेत्राचा सर्वांगिण विकास करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील शिडी संस्थानाप्रमाणेच हे क्षेत्र धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत, त्यासाठी पुरेसा निधी देण्याची तयारी मुनगंटीवार यांनी दाखविली आहे. काही महिन्यांपूर्वी मंत्री मुनगंटीवार रत्नागिरीत आले असता त्यांनी गणपतीपुळेला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी गणपतीपुळेच्या विकासाला निधीची कमतरता भासणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.विकास प्रक्रियेनुसार गणपतीपुळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय (अक्वेरियम) उभारण्याचा प्रस्तावही शासनाच्या विचाराधीन आहे. येथील समुद्रकिनारी पर्यटक स्नान करीत असताना अपघात होऊ नयेत यासाठी अपघात प्रतिबंधक उपाययोजना करणे, मोठ्या प्रमाणातील पर्यटकांसाठी निवळी एम.आय.डी.सी. येथून जयगडकडे जाणाऱ्या वाहिनीदवारे पाणी आणून ते गणपतीपुळेला पुरवठा करण्याबाबतही शिष्टमंडळाशी चर्चा झाली. पर्यटन मंत्र्यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्र तथा बाळ माने, विनय नातू, राजन तेली, अ‍ॅड. अजित गोगटे, प्रशांत ठाकुर, माजी आमदार प्रमोद जठार, प्रवीण दरेकर, रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोकणच्या शिष्टमंडळाचा पाठपुरावागणपतीपुळे येथे येणाऱ्या भक्त पर्यटकांसाठी विविध सोई सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. मुख्य रस्ते, आंतरिक सुविधा, वाहनतळ व्यवस्था, प्रवाशांसाठी बस स्थानक, जलनिस्सारण, सांडपाण्यावर प्रक्रीया करून पुनर्वापर, पथदीप, भुयारी गटारे, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, साईट अ‍ॅँड साऊंड प्रकल्प, एम.टी.डी.सी.ची निवास व भोजन व्यवस्था अद्ययावत करणे, रेल्वे, बस आरक्षणाची सुविधा, सी प्लेन निर्माण केल्या जाणार आहेत.दरवर्षी गणपतीपुळेत येतात २० लाखांवर पर्यटक. रत्नागिरीची स्मार्ट सिटीची हुकलेली संधी गणपतीपुळे भरून काढणार.सी प्लेन सुरू करण्याबाबत चर्चा. रेल्वे आरक्षण, अद्ययावत बसस्थानक होणार.