शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘स्वयम’मध्ये दिव्यांग मुले साकारतायत ‘ट्री गणेशा...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 13:02 IST

कोल्हापूर, दि. 4 - दिव्यांग मुलांना आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्वयम् उद्योग केंद्रात यंदा इको-फ्रेंडली गणेशमूर्तीतून ...

ठळक मुद्देस्वयम् उद्योग केंद्रात यंदा इको-फ्रेंडली गणेशमूर्तीतून ‘ट्री गणेशा’ साकारला जात आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित स्वयम् उद्योग केंद्रातील मुले सध्या लाडक्या गणरायाला घडविण्यात व्यस्त आहेत. एरवी या दिव्यांगांच्या क्षमतांकडे दुर्लक्ष केले जात असताना त्यांचे निरागस हात अत्यंत बारीक कलाकुसरीने श्री गणेशाची मूर्ती साकारत असताना पाहणे हा अति

कोल्हापूर, दि. 4 - दिव्यांग मुलांना आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्वयम् उद्योग केंद्रात यंदा इको-फ्रेंडली गणेशमूर्तीतून ‘ट्री गणेशा’ साकारला जात आहे. संस्थेतर्फे प्रत्येक भक्ताला गणेशमूर्तीसोबत एका कुंडीत फळझाडांचे बी घालून देण्यात येणार आहे. विसर्जनानंतर गणेशमूर्तीची माती या कुंडीत घातल्यानंतर त्यातून रोप उगवेल, अशी या ‘ट्री गणेशा’मागील संकल्पना आहे. 

न्यायालयाच्या मागील बाजूस साकारण्यात आलेल्या नव्या इमारतीत इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित स्वयम् उद्योग केंद्रातील मुले सध्या लाडक्या गणरायाला घडविण्यात व्यस्त आहेत. एरवी या दिव्यांगांच्या क्षमतांकडे दुर्लक्ष केले जात असताना त्यांचे निरागस हात अत्यंत बारीक कलाकुसरीने श्री गणेशाची मूर्ती साकारत असताना पाहणे हा अतिशय सुखद अनुभव आहे.

साधी माती आणि शाडूची माती एकत्र करून ही मुले इको-फ्रेंडली गणेशमूर्ती साकारतात. माती चाळण्यापासून ती मळणे, चेचणे, साच्यामध्ये भरणे, वाळल्यानंतर मूर्ती साच्यामधून काढणे, घासकाम, मूर्तीला रेखीवता आणणे, अलंकारांची कलाकुसर, रंगकाम ही सगळी कामे संस्थेतील बारा दिव्यांग मुले करीत आहेत. त्यांना व्यवसायप्रमुख जयसिंग पाटील, कलाकार बाजीराव माने, अशोक मिस्त्री, केशव लाटवले यांचे सहकार्य मिळते  आणि मुख्याध्यापक प्रमोद भिसे यांचे मुलांकडे वैयक्तिक लक्ष असते.

अन्य कलाकारांच्या तुलनेत दिव्यांगांच्या कामाची गती संथ असते; त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सव संपल्यानंतर दोन महिन्यांनी लगेचच गणेशमूर्ती घडविण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष असून, संस्थेतर्फे शंभरहून अधिक मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. त्यांत दगडूशेठ, आजोबा गणपती, पाटील गणपती, लालबागचा राजा, सिंहासनारूढ गणेश अशा विविध रूपांतील गणेशमूर्तींचा समावेश आहे. 

यंदाच्या वर्षी या इको-फ्रेंडली गणेशमूर्तींसोबतच ‘ट्री गणेशा’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. भाविकांच्या हाती गणेशमूर्ती सोपविताना एका कुंडीत बी घालून देण्यात येणार आहे. घरगुती गणेशमूर्तीचे घरात विसर्जन करून ही माती दिलेल्या कुंडीत भाविकांनी घालायची. या बीमधून उगवणारे रोप म्हणजे ट्री गणेशा. त्यासाठी झेंडू, दोडका, भेंडी अशा फळझाडांच्या बिया संकलित करण्यात आल्या आहेत. 

संस्थेत एकूण १२० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांपैकी १८ ते ४० वयोगटातील पन्नास मुले-मुली उद्योग केंद्रासाठी काम करतात. त्यांत फुलदाणी बनविणे, फायली, दिवाळी भेट, आकाशकंदील, आकर्षक दिवे, चित्र, कागदी पिशव्या, राख्या अशा वेगवेगळ्या उद्योगांचा समावेश आहे.