शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

गणेश देवी की अक्षयकुमार काळे ?

By admin | Updated: September 23, 2016 03:23 IST

भाषांच्या सर्वेक्षणाचे काम करून बोलीभाषांना नवसंजीवनी देणारे प्राध्यापक गणेश देवी आणि कवितेच्या समीक्षेतून गालिबपासून ग्रेसपर्यंत अनेकांचे अंतरंग उलगडून दाखवणारे

डोंबिवली : भाषांच्या सर्वेक्षणाचे काम करून बोलीभाषांना नवसंजीवनी देणारे प्राध्यापक गणेश देवी आणि कवितेच्या समीक्षेतून गालिबपासून ग्रेसपर्यंत अनेकांचे अंतरंग उलगडून दाखवणारे प्राध्यापक अक्षयकुमार काळे या दोन दिग्गजांची नावे डोंबिवलीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आली आहेत. गाढे समीक्षक म.सु. पाटील, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, प्रसिद्ध लेखक रवींद्र शोभणे यांच्याही नावांची चर्चा साहित्य परिषद आणि साहित्य संघाच्या विविध शाखांत सुरू आहे. या सर्वांचा परस्परांवर असलेला गाढ स्नेह आणि परस्परांच्या कामाबद्दल असलेला आदर पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असेही प्रयत्न सुरू आहेत.साहित्य संमेलनाचे स्थळ म्हणून डोंबिवलीचे नाव घोषित झाले. त्याबाबतचे अधिकृत पत्रही अजून आयोजक संस्था असलेल्या आगरी युथ फोरमला मिळालेले नाही. मात्र, अध्यक्षपदासाठी १२ आॅक्टोबरपर्यंत म्हणजे अवघ्या २० दिवसांत नावे सुचवायची आहेत. त्यामुळे मतदानाचा अधिकार असलेल्या वेगवेगळ्या साहित्य संघांमध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावांच्या चर्चेचा गलबला सुरू झाला आहे. संमेलन डोंबिवलीत असल्याने तेथील साहित्यिक-सांस्कृतिक वातावरणाचा विचार करून मातब्बर व्यक्तीची निवड व्हावी, असे प्रयत्न सुरू आहेत. लोकभाषा, बोलीभाषांसाठी केलेल्या कामामुळे आणि आदिवासी अकादमीमुळे गणेश देवी यांची ख्याती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक आहे. अध्यक्ष होण्यास ते तयारही असल्याचे सांगितले जाते. पण, त्यांना त्यासाठी निवडणूक लढवण्यात रस नाही; तर कवितेचे समीक्षक अशी ओळख निर्माण केलेले, त्यासाठीच्या व्यासंगामुळे सुपरिचित असलेले अक्षयकुमार काळे यांनी संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गेले वर्षभर भरपूर तयारी केली आहे. त्यासाठी ते अनेक संस्थांच्या संपर्कात आहेत. लेखक रवींद्र शोभणे यांचीही निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे सांगितले जाते. विचारवंत रावसाहेब कसबे यांचेही नाव पुण्याच्या वर्तुळातून पुढे आले आहे. मुंबई-ठाण्याच्या वर्तुळातून ज्येष्ठ समीक्षक म.सु. पाटील यांचे नाव पुढे आले आहे. मात्र, त्यांनी त्याबाबत स्वत:हून इच्छा असल्याबाबत काहीही जाहीर केलेले नाही. शिवाय, निवडणूक झालीच, तर त्यासाठीच्या प्रचाराची दगदग त्यांना कितपत सोसवेल, असाही पेच त्यांच्या हितचिंतकांपुढे आहे. या सर्वात गणेश देवी यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तीचे नाव स्पर्धेत आल्यामुळे साहित्य क्षेत्रातील अनेकांचा हुरूप वाढला आहे. त्यामुळे देवी आणि गेले वर्षभर तयारी करून आपला दावा भक्कम करणारे अक्षयकुमार काळे यांच्याच नावावर जोरदार चर्चा झडते आहे. पुढील आठवड्यात साधारण नवरात्रीच्या तोंडावर याबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.आयोजकांच्या इच्छेचाही होणार विचारसंमेलनाच्या आयोजक संस्थेला ८० मतांचा कोटा असतो. मतदारांच्या एकूणच हजारभर मतांच्या पसाऱ्यात त्या मतांचे स्थान अल्प आहे. त्यामुळे त्या मतांच्या जोरावर आयोजक संस्थेला आपल्या इच्छेनुसार अध्यक्षांची निवड करता येत नाही. परंतु, यंदाची आयोजक संस्था आगरी युथ फोरम असल्याने आगरीला बोलीभाषेच्या पटलावर आणणारे गणेश देवी आणि मुंबई-ठाणे पट्ट्यात वावर असल्याने म.सु. पाटील यांच्या नावांची चर्चा डोंबिवलीच्या साहित्यवर्तुळात आहे. त्यातील पाटील हे संमेलनाध्यक्षपदाच्या रिंगणात न उतरल्यास गणेश देवी यांच्या बाजूने आयोजकांचा कल असेल. त्यांनी साहित्य महामंडळाला त्यासाठी गळ घातली, तर महामंडळ त्यासाठी विविध शाखांशी संपर्क साधून त्यांचे मत वळवू शकते. त्यातही महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा देवी यांच्याशी स्नेह आहे. त्यामुळे तेही याबाबत पुढाकार घेत प्रयत्न करू शकतात. शिवाय, देवी यांच्यासारखे नाव पुढे आले, तर अक्षयकुमार काळे अध्यक्षपदासाठी वर्षभर थांबण्यास तयार होतील, असाही साहित्यवर्तुळाचा होरा आहे.विदर्भावर बरेच काही अवलंबूनमहामंडळाचे कार्यालय विदर्भात गेल्याने राज्याच्या सत्तावर्तुळात विदर्भाला महत्त्व आल्याने संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीतही विदर्भाचा कौल महत्त्वाचा ठरेल, असा अंदाज आहे. संमेलनाचे स्थळ घोषित करताना पुणे आणि विदर्भातील संघर्ष समोर आला होता. तो टाळण्यासाठी अध्यक्षपद हे चांगले निमित्त आहे. विदर्भातून दरवर्षी एकगठ्ठा मतदान होते. छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशच्या मतदानावरही विदर्भाचा प्रभाव असल्याचे मानले जाते. त्यामुळे अक्षयकुमार काळे यांच्यासाठी ती जमेची बाजू आहे. शिवाय, त्यांनी बडोदा, आंध्र प्रदेशमधूनही जोर लावला आहे. मुंबई-पुण्यातही त्यांचा चांगला संपर्क आहे. मात्र, गणेश देवी यांचे नाव पुढे आल्यास हे चित्र बदलू शकते. पुणे-विदर्भाचे मनोमिलन होऊ शकते.अक्षयकुमार काळे यांची साहित्यसंपदा सूक्तसंदर्भ, कविता कुसुमाग्रजांची, अर्वाचीन मराठी काव्यदर्शन, मर्ढेकरांची कविता-आकलन, आस्वाद आणि चिकित्सा, ग्रेसविषयी, प्रतितिविभ्रम, गालिबचे उर्दू काव्यविश्व-अर्थ आणि भाष्य हे समीक्षा ग्रंथ. गोविंदाग्रज-समीक्षक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज-व्यक्ती आणि वाङ्मय, सांप्रदायिक सद्भाव आणि शांतता हे संपादित ग्रंथ.गणेश देवी यांची साहित्यसंपदा : वानप्रस्थ (मराठी), आदिवासी जाणे छे (गुजराथी), आॅफ मेनी हीरोज (इंग्रजी), आफ्टर अ‍ॅम्नेसी (इंग्रजी), इंडिया बिटवीन ट्रॅडिशन अ‍ॅण्ड मॉडर्निटी (इंग्रजी), इंडियन लिटररी क्रिटिसिझम : थिअरी अ‍ॅण्ड इंटरप्रिटेशन (इंग्रजी), इन अनदर टंग (इंग्रजी), की वर्डज : ट्रूथ (इंग्रजी), क्रिटिकल थॉट (इंग्रजी), द जी. एन. देवी रीडर (इंग्रजी), ए नॉमॅड कॉल्ड थीफ (इंग्रजी), पीपल्स लिंग्विटिक सर्व्हे आॅफ इंडिया, पेण्टेड वडर््ज : अ‍ॅन अ‍ॅन्थॉलॉजी आॅफ ट्रायबल लिटरेचर (इंग्रजी).