शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

गणपती गेले; खड्डे राहिले

By admin | Updated: September 19, 2016 00:33 IST

खड्ड्यामुळे रस्त्यांची अवस्था वाईट झालेली असतानाच बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यावर मंडपासाठी घेतलेल्या खड्ड्यांमुळे आणखी बिकट परिस्थिती निर्माण झाली

पुणे : पावसाळ्यात शहरात पडलेल्या खड्ड्यामुळे रस्त्यांची अवस्था वाईट झालेली असतानाच बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यावर मंडपासाठी घेतलेल्या खड्ड्यांमुळे आणखी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा केल्यानंतर मंडळांनी रस्त्यावरील खड्डे स्वत:हून बुजवणे अपेक्षित आहे. परंतु, रस्त्याच्या मधोमध घेतलेले खड्डे अद्याप बुजवले गेले नाहीत. त्यावर पालिका प्रशासनाकडूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते. पुणे शहराचे वैभव असणारा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळाचे कार्यकर्ते रात्रंदिवस झटतात. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात पुण्याच्या गणेशोत्सवाची चर्चा होते. मात्र, शहरातील काही रस्त्यांचा अर्धा भाग गणेश मंडळांनी घातलेल्या मंडपांनी व्यापला होता. मंडपांसाठी रस्त्याच्या मधोमध खड्डे घेण्यात आले होते. उत्सव संपल्यानंतर रस्त्यावरील मंडप काढण्यात आले आहे. मात्र, रस्त्यावरील खड्डे आजही तसेच आहेत. गणेशोत्सव मंडळांसाठी महापालिकेने मंडप उभारणीबाबत नियमावली तयार केली आहे. सिमेंटच्या रस्त्यावर खड्डे घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, रस्त्यांवर खड्डे घेतलेच, तर ते मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थित बुजवावेत, असे स्पष्ट केले आहे.शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगर परिसरातील काही गणेश मंडळांनी रस्त्यावरील खड्डे बुजवले नसल्याचे दिसून येत आहे. येरवडा, सोमवार पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्त्यासह भारती विद्या भवन विविध ठिकाणच्या रस्यावर खड्डे पडले आहेत. कमला नेहरू हॉस्पिटल जवळील रस्त्यावर एका मंडळाने अर्धवट खड्डे बुजवलेले नाहीत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांचा पाय मुरगळण्याची शक्यता आहे. तसेच पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्यांचा आकार वाढू शकतो. त्यामुळे खड्डे तत्काळ बुजवणे गरजेचे आहे. परंतु, पालिका प्रशासन याबाबत गंभीर नाही. परिणामी, नागरिकांना खड्ड्यातून वाट काढतच जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)।नवरात्रोत्सवासाठी मंडप कायम ?पुणे महानगरपालिकेच्या मंडप धोरणानुसार तीन दिवसांच्या आत गणेशोत्सवासाठी उभारलेला मंडप रस्त्यावरून हटवणे आवश्यक आहे. मात्र, उपनगर परिसरातील काही मंडळांनी मंडपांना हातही लावलेले नाहीत. येत्या आॅक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. त्यासाठी हे मंडप कायम ठेवले जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.तात्पुरता मंडप/ स्टेज उभारताना पदपथावर खड्डे घेऊ नयेत. सार्वजनिक ठिकाणी खड्डे घेतल्याचे किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचे आढळून आल्यास पालिका प्रश्नासनाकडून प्रतिखड्डा २ हजार रुपयांप्रमाणे दंड वसूल केला जाईल. मंडप परवानगीची मुदत संपल्यानंतर मंडप, रस्त्यावरील देखावे, विटांमधील बांधकामे अन्य साहित्य रस्त्यावरून तत्काळ हटवावे, असे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण/ अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने तयार केलेल्या ‘पुणे महानगरपालिका- मंडप धोरण २०१५ ’मध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, पालिका प्रशासनाला आपल्याच नियमावलीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. कारण एकाही मंडळावर अद्याप दंडात्मक कारवाई झालेली नाही. ।मंगळवारपर्यंत सर्व खड्डे बुजविले जाणारगणेश मंडळांनी मंडप टाकण्यासाठी घेतलेले सर्व खड्डे येत्या मंगळवारी बुजविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. मंडप खोदाईसाठी घेतलेले खड्डे मंडळांकडून बुजवून घेण्याच्या सूचना अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या प्रमुख संध्या गागरे यांना दिल्या आहेत.- प्रशांत जगताप, महापौर