शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 02:33 IST

पाच दिवसांच्या बाप्पाला शुक्रवारी संध्याकाळी वाजत गाजत निरोप देण्यात आला.

अलिबाग : पाच दिवसांच्या बाप्पाला शुक्रवारी संध्याकाळी वाजत गाजत निरोप देण्यात आला. त्यामध्ये एक सार्वजनिक आणि एक हजार २६० गणेशमूर्तींचा समावेश होता. जिल्ह्यातील ३० तलाव, १९ नदीचे पात्र, पाच समुद्र तर दोन ठिकाणच्या खाडी किनारी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी समुद्र किनाऱ्यासह नदी, तलाव या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तेथील स्थानिक प्रशासनाने गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी व्यवस्था केली होती. अलिबागमध्ये विविध मिरवणुका काढण्यात आल्या. पारंपरिक वाद्यांच्या आणि भजनांच्या तालावर गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. खासगी गणेशमूर्तींना काहींनी आपापल्या वाहनांतूनच विसर्जन स्थळी नेले. बाप्पाला विसर्जनासाठी नेताना वाहने, हातगाड्यांची सजावट करण्यात आली होती. काहींनी भजने गात बाप्पाला निरोप दिला. अलिबाग नगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांची साफसफाई केली होती. रस्त्यावर साठलेली धुळ काढल्याने रस्ते चकाचक झाल्याचे दिसत होते. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी विजेचीही सोय केल्याचे दिसून आले. विसर्जन शांततेमध्ये पार पडावे यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी ४०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, १०० होमगार्ड असा फौजफाटा जिल्ह्यात तैनात करण्यात आला होता. गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणातील चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला असल्याने महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (विशेष प्रतिनिधी)>चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या जादा बसेसगोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणातील चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाल्याने महामार्गावर चोखी पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. गुरु वारी श्रीवर्धन आगारातून ७ तर मुरुड आगारातून एक अशा आठ जादा एसटी मुंबईसाठी रवाना झाल्या तर शुक्रवारी श्रीवर्धन व मुरुड आगारातून प्रत्येकी ७ अशा एकूण १४ एसटी मुंबईस रवाना झाल्या असल्याची माहिती एसटीच्या नियंत्रण कक्षाच्या सुत्रांनी दिली आहे.अलिबाग नगरपालिकेने गणेशोत्सव सुरु असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांची साफसफाई केली होती. यामुळे नागरिकांनी देखिल समाधान व्यक्त के ले.त्याचप्रमाणे ठिकठिकाणी विजेचीही सोय केल्याचे दिसून आले. विसर्जन शांततेमध्ये पार पडावे यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ४०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, १०० होमगार्ड असा फौजफाटा जिल्ह्यात तैनात करण्यात आला होता.