शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी यांचे मुंबईत निधन

By admin | Updated: June 2, 2014 05:14 IST

जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने रविवारी दुपारी १२ वाजता बोरीवली येथील राहत्या घरी निधन झाले

मुंबई : जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने रविवारी दुपारी १२ वाजता बोरीवली येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे शास्त्रीय संगीताचा आधारवड हरपल्याची भावना शास्त्रीय संगीत क्षेत्रातून व्यक्त झाली आहे. ज्येष्ठ गायक अल्लादिया खाँ यांच्या गायकीने सुरू झालेल्या जयपूर-अत्रौली घराण्याला धोंडूतार्इंच्या गाण्याने आणखी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. धोंडूताई यांचा जन्म २३ जुलै १९२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हिरवडे गावात झाला होता. त्यांचे वडील गणेश कुलकर्णी हे शिक्षक होते. उस्ताद भुर्जीखान हे त्यांचे पहिले गुरू होत. त्यांनी लक्ष्मीबाई जाधव यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले होते. केसरबाई यांचा एकच शिष्य म्हणजे धोंडूताई, हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. धोंडूतार्इंनी वयाच्या आठव्या वर्षांपासून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

   ‘विद्येच्या ज्ञानाला कधीच पूर्णविराम येत नसतो, ती प्रक्रिया अखंडपणे सुरूच असते’, धोंडूताई कुलकर्णी यांनी असे म्हणत संगीताचा रियाझ नेहमीच सुरू ठेवला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी प्रथम आॅल इंडिया रेडिओ, मुंबईवर गाणे सादर केले होते. १९४० ते १९५० या काळात त्या रेडिओची ‘ए ग्रेड’ आर्टिस्ट झाल्या. त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार, १९९० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी ‘ढुँढूँ बारे सैंया तोहे सकल बन बन... बिंदन तिहारी कोऊ न जाने...’सारख्या बंदिशी गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. अनवट (अप्रचलित) रागांवर त्यांची पकड होती, हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. धोंडूताई या खूप मोठ्या कलाकार होत्या. गायकीची खानदानी परंपरा त्यांनी जपली. गुरू-शिष्य परंपरेत तयार झालेल्या त्या एकमेव गायिका होत्या. वयाच्या ८० वर्षानंतरही सुरांना आकार लावणे दुर्मीळ होते. त्यांचे गाणे ऐकून मी भारावून गेलो होतो. दुसरे म्हणजे त्या खूप समाधानी होत्या. पैसा, प्रसिद्धी यांच्या मागे त्या कधीही धावल्या नाहीत. एवढी मोठी गायिका महाराष्ट्रात असूनही शासनाने कधी त्यांची दखल घेतली नाही. त्यांचे मोठेपण आपण ओळखले नाही तर ते आपलेच दुर्दैव आहे. गायन क्षेत्रातला एक सूर्यच आज हरपला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ गायक उपेंद्र भट यांनी भावना व्यक्त केल्या. धोंडूताई मोठ्या गायिका होत्या. उस्ताद अल्लारखाँ यांचा सहवास लाभलेल्या काही मोजक्या व्यक्तींपैकी त्या होत्या. आठ वर्षे केसरबार्इंबरोबर तालमीतले गाणे त्या शिकल्या. जयपूर घराण्याची गायकी शेवटपर्यंत जपली. या गायकीला इतरांना हात लावू दिला नाही. त्यांच्याकडे रागदारीचा मोठा संग्रह होता. भारत गायन समाजात त्यांनी आपली कला सादर केली होती. आम्ही त्यांना माणिक वर्मा पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केला होता, अशी आठवण गायिका शैला दातार यांनी सांगितली.