शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

प्रवाशांच्या जिवाशी खेळ!

By admin | Updated: April 27, 2016 06:27 IST

एसटी महामंडळ ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असल्याचा दावा करते. मात्र हा प्रवास आता कितपत सुरक्षित राहिला आहे हा मोठा प्रश्नच गेल्या चार महिन्यात निर्माण झाला आहे.

मुंबई : ‘सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’, असे ब्रीदवाक्य असणारे एसटी महामंडळ ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असल्याचा दावा करते. मात्र हा प्रवास आता कितपत सुरक्षित राहिला आहे हा मोठा प्रश्नच गेल्या चार महिन्यात निर्माण झाला आहे. गेल्या चार महिन्यात एसटीच्या बस गाड्यांना आग लागल्याचा पाच घटना घडल्या आहेत. या घटनांची दखल घेत परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी संबंधित बस असलेल्या टाटा कंपनीकडून अहवाल मागितला आहे. सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी नऊच्या सुमारास एसटी महामंडळाच्या मुरुड-मुंबई बसने चिंचवण येथे पेट घेतल्याची घटना घडली. बस चालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला उभी केली आणि त्वरीत ५४ प्रवाशांना उतरविले. इंजिनमधील शॉटसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता एसटीच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. ही घटना घडण्यापूर्वी जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत एसटी बस गाड्यांना आग लागल्याच्या चार घटना घडल्या आणि सोमवारी घडलेली ही पाचवी घटना आहे. वाडा त्यानंतर ठाणे शहर, मराठवाड्यात भूम येथे, खंडाळा घाटात आणि आता चिंचवण येथे एसटी बस गाड्यांना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनेत बसमध्ये प्रवासी होते आणि चालक-वाहकाच्या प्रसंगावधनामुळे प्रवाशांचा जीव वाचला आहे. याबाबत एसटीतील सूत्रांनी सांगितले की,घडलेल्या पाच घटनांमध्ये तीन सेमी लक्झरी आणि दोन साध्या बसचा समावेश आहे. या सर्व बसची बॉडी एसटी महामंडळाकडून बांधण्यात आली आहे. मात्र बसमधील इंजिन आणि अन्य इलेक्ट्रीकल कामे टाटा कंपनीची आहेत. त्यांच्याकडूनच होणाऱ्या कामांत काही चुका होत आहेत की अन्य काही कारणे आहेत याची माहीती एसटी महामंडळाकडून घेतली जात >सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटनांची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. टाटा कंपनीला यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे आणि त्वरीत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांनी अहवाल सादर करताच पुढील निर्णय घेण्यात येईल.- दिवाकर रावते (परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष)