शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या जिवाशी खेळ!

By admin | Updated: April 27, 2016 06:27 IST

एसटी महामंडळ ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असल्याचा दावा करते. मात्र हा प्रवास आता कितपत सुरक्षित राहिला आहे हा मोठा प्रश्नच गेल्या चार महिन्यात निर्माण झाला आहे.

मुंबई : ‘सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’, असे ब्रीदवाक्य असणारे एसटी महामंडळ ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असल्याचा दावा करते. मात्र हा प्रवास आता कितपत सुरक्षित राहिला आहे हा मोठा प्रश्नच गेल्या चार महिन्यात निर्माण झाला आहे. गेल्या चार महिन्यात एसटीच्या बस गाड्यांना आग लागल्याचा पाच घटना घडल्या आहेत. या घटनांची दखल घेत परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी संबंधित बस असलेल्या टाटा कंपनीकडून अहवाल मागितला आहे. सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी नऊच्या सुमारास एसटी महामंडळाच्या मुरुड-मुंबई बसने चिंचवण येथे पेट घेतल्याची घटना घडली. बस चालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला उभी केली आणि त्वरीत ५४ प्रवाशांना उतरविले. इंजिनमधील शॉटसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता एसटीच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. ही घटना घडण्यापूर्वी जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत एसटी बस गाड्यांना आग लागल्याच्या चार घटना घडल्या आणि सोमवारी घडलेली ही पाचवी घटना आहे. वाडा त्यानंतर ठाणे शहर, मराठवाड्यात भूम येथे, खंडाळा घाटात आणि आता चिंचवण येथे एसटी बस गाड्यांना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनेत बसमध्ये प्रवासी होते आणि चालक-वाहकाच्या प्रसंगावधनामुळे प्रवाशांचा जीव वाचला आहे. याबाबत एसटीतील सूत्रांनी सांगितले की,घडलेल्या पाच घटनांमध्ये तीन सेमी लक्झरी आणि दोन साध्या बसचा समावेश आहे. या सर्व बसची बॉडी एसटी महामंडळाकडून बांधण्यात आली आहे. मात्र बसमधील इंजिन आणि अन्य इलेक्ट्रीकल कामे टाटा कंपनीची आहेत. त्यांच्याकडूनच होणाऱ्या कामांत काही चुका होत आहेत की अन्य काही कारणे आहेत याची माहीती एसटी महामंडळाकडून घेतली जात >सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटनांची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. टाटा कंपनीला यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे आणि त्वरीत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांनी अहवाल सादर करताच पुढील निर्णय घेण्यात येईल.- दिवाकर रावते (परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष)