शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

गजानन पेंढरकर कालवश

By admin | Updated: October 9, 2015 05:04 IST

भारतीय आयुर्वेदाचा ठेवा जगभर पोहोचवण्यात अग्रभागी असलेल्या ‘विको लॅबोरेटरीज’चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक गजानन केशव पेंढरकर यांचे परळ येथील

मुंबई : भारतीय आयुर्वेदाचा ठेवा जगभर पोहोचवण्यात अग्रभागी असलेल्या ‘विको लॅबोरेटरीज’चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक गजानन केशव पेंढरकर यांचे परळ येथील घरी गुरुवारी सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. दुपारी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार बंधू, दोन कन्या, एक मुलगा असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून पेंढरकर यांची प्रकृती खालावली होती. परळमधल्या अशोक टॉवरमधील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. पेंढरकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी परेलच्या डॉ. एस.एस. राव रोड, गांधी रुग्णालयाजवळ अशोक टॉवर, बँक्वेट हॉल येथे सायंकाळी ४ ते ७ या वेळेत श्रद्धांजली सभा होणार आहे.पेंढरकर यांनी गुजरातच्या अहमदाबादमधून औषधशास्त्राचे पदवी शिक्षण घेतले. नंतर १९५७मध्ये वडिलांच्या व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. सुरुवातीच्या काळात अत्यंत कठीण परिस्थितीत परळ येथील १२० चौरस फुटांच्या जागेत विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी अर्थात ‘विको’चे काम सुरू केले. घरोघरी फिरून त्यांनी आपल्या उत्पादनांची जाहिरात केली. पुढे डोंबिवलीत त्यांनी कारखाना सुरू केला; आणि ‘विको’चा जगभर विस्तार केला.पेंढरकर यांनी गेली ४५ वर्षे विको समूहाचे अध्यक्षपद भूषविले. या काळात त्यांनी ‘विको’च्या आयुर्वेदिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून दिला. आयुर्वेदाला परदेशी बाजारपेठेत मान्यता प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी अतिशय परिश्रम घेतले. आजघडीला ४०हून अधिक देशांमध्ये ‘विको’च्या उत्पादनांना मागणी आहे. (प्रतिनिधी)द्रष्टा उद्योजक हरपला!‘विको लॅबोरेटरीज’चे अध्यक्ष गजानन केशव पेंढरकर यांच्या निधनामुळे अवघे उद्योगविश्व हळहळले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि दु:ख व्यक्त केले.महाराष्ट्राच्या औद्योगिक विश्वात पेंढरकर यांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करतानाच आयुर्वेदाच्या प्रसारासाठीही मोठे योगदान दिले. विशेषत: जागतिक बाजारपेठेत विविध आयुर्वेदिक उत्पादनांना मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक द्रष्टा उद्योजक गमाविला आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वडोंबिवलीमधील गणेश मंदिराच्या उभारणीवेळी त्यांच्याशी जवळचा संबंध आला. त्यांनी तत्काळ चेक दिला. उद्योजकतेमध्ये नावलौकिक मिळवताना अध्यात्मालाही त्यांनी तितकेच महत्त्व दिले. शिवाय उत्पादन आणि जाहिरातीमध्ये नवीन कल्पना आणण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे त्यांच्या रूपात मोठा उद्योजक गेल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. - माधव भिडे (संस्थापक-अध्यक्ष, सॅटर्डे क्लब)मराठी फॉरवर्ड थिंकर गमावलाजगात देशाचे नाव उंचावण्याचे काम त्यांनी केले. आयुर्वेदिक उत्पादनांना जागतिक स्तरावर त्यांच्यामुळे अधिक नावलौकिक मिळाला. नवोदित उद्योजकांना त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. त्यांचे पुत्र हा वारसा अधिक पुढे नेतील, याची खात्री आहे.- नितीन पोतदार (संस्थापक, मॅक्सेल फाउंडेशन)उद्योगविश्वाचे विद्यापीठ हरपले : गजानन पेंढरकर हे अवघ्या उद्योगविश्वाचे विद्यापीठ होते. कित्येक लोकांनी पेंढरकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन उद्योगाला सुरुवात केली. तसेच, पेंढरकर हे कुटुंबाचा आधार होते, त्यांनी कायम कुटुंबाला प्रोत्साहन देऊन उद्योगविश्वात सक्रिय केले. त्यांचे वक्तृत्व कौशल्य, बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रेरणादायी होते. पेंढरकर यांचे ‘कर्म चाले संगती’ हे आत्मचरित्र नव्या पिढीतील प्रत्येक उद्योजकाने वाचले पाहिजे.- मीनल मोहाडीकरसंघर्षशील उद्योगपतीला देश मुकलाज्येष्ठ उद्योगपती गजाननराव पेंढरकर यांच्या निधनाने देश एका अत्यंत मेहनती, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या आणि तत्त्वांशी तडजोड न करणाऱ्या उद्योगपतीला मुकला आहे. पेंढरकर आणि माझा ऋणानुबंध ३० वर्षांपासून होता. मुंबईत माझी त्यांची नेहमी भेट व्हायची. फारसे कुणाचे पाठबळ नसताना ते नेहमी बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करायचे. ही गोष्ट मला नेहमी अभिमानास्पद वाटत आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी ‘विको’ला समोर आणले. गजाननराव पेंढरकरांना माझी विनम्र श्रद्धांजली.- खासदार विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत वृत्तपत्र समूहउत्साही व्यक्तिमत्त्वगजानन पेंढरकर यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा होता. त्यांना साहित्य-कलाक्षेत्रातही रुची होती. माझे आणि पेंढरकर यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. प्रत्येक भेटीत कोणत्याही विषयावर चर्चा केल्यास अगदी सहज ते निष्कर्षापर्यंत येत असत, त्यात त्यांची विशेष हातोटी होती.- जयराज साळगावकर, कालनिर्णयसमाजाभिमुख उद्योजक गमावलागजानन पेंढरकर यांनी आंतरराष्ट्रीय कॅनव्हासवर ‘विको’ हा ब्रँड त्या काळात प्रस्थापित केला. आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना कायम त्यांनी जपली आणि शेवटच्या क्षणापर्यंत समाजाला परतफेड करत राहिले. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने समाजाभिमुख होते.- किशोर रांगणेकर, सारस्वत बँकेचे माजी उपाध्यक्षउत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले गजानन पेंढरकर हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. मराठी लोकांनी उद्योग क्षेत्रात यावे, यासाठी कायम प्रोत्साहित करायचे. त्यांच्याकडे उत्तम बुद्धिमत्ता, चातुर्य आणि संवाद कौशल्य होते. मराठीत अशा प्रकारे प्रसिद्धी, यश मिळवूनही समाजाचा विचार करणारा उद्योजक पुन्हा होणे नाही.- अनंत भालेकर, चेअरमन, मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळमराठी उद्योगविश्वाचे प्रेरणास्थानगजानन पेंढरकर हे मराठी उद्योगविश्वाचे प्रेरणास्थान आहेत. ते सर्वांनाच गुरुस्थानी होते. पितांबरी उद्योगसमूहाच्या निर्मितीची प्रेरणा त्यांच्याकडून घेतली. त्यांच्या जाण्याने मराठी उद्योगविश्वाचे नुकसान झाले आहे.- रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी