शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

गायरानाने राज्यभरात माजवले रान; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:19 IST

सरकार अधिगृहीत अशी जमीन ज्यावर जनावरे चरण्यासाठी, जळाऊ लाकडे मिळविण्यासाठी, स्मशानभूमी, सरकारी ऑफिसला देण्याकरिता राखीव असते. तिच्यावरचा ताबा किवा मालकी हक्क हा फक्त सरकारचा असतो.

सध्या राज्यात गायरान जमिनींवरील अतिक्रमणांचा मुद्दा गाजत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ‘सु मोटो’ जनहित याचिका दाखल करून घेत राज्यातील गायरान जमिनींबाबतचा तपशील महाराष्ट्र शासनाला मागितला. त्यात अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाल्यानंतर न्यायालयाने सर्व अतिक्रमणे चालू वर्षअखेरपर्यंत हटविण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता तहसीलदारांमार्फत अतिक्रमणधारकांना बांधकाम पाडण्याच्या नोटीस जारी करण्याचे सत्र सुरू झाले असून, मोठी खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर लोकमत चमूने घेतलेला हा खास आढावा....

गायरान जमीन म्हणजे काय? -सरकार अधिगृहीत अशी जमीन ज्यावर जनावरे चरण्यासाठी, जळाऊ लाकडे मिळविण्यासाठी, स्मशानभूमी, सरकारी ऑफिसला देण्याकरिता राखीव असते. तिच्यावरचा ताबा किवा मालकी हक्क हा फक्त सरकारचा असतो.

गायरान जमीन सरकारकडून भाडेतत्त्वावर मिळते. ती कुणाच्याही नावावर होत नाही. त्याची शासन दरबारी १ इ फॉर्मवर नोंद होते. म्हणजेच या जमिनीवर अतिक्रमण झाले, याची सरकार दप्तरी नोंद होते.

सर्वोच्च न्यायालयाने २०११ रोजी दिलेला आदेश -- ‘देशात अनेक जमिनी या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात. गुरांना चरण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी, स्मशानभूमीसाठी या जमिनी ग्रामपंचायतींच्या ताब्यात आहेत. परंतु, अनेक राज्यांत अशा जमिनी हडप केल्या जात आहेत. त्यामुळे सर्व राज्यांच्या सरकारांनी ग्रामपंचायतींच्या अखत्यारीतील जमिनींवर झालेली अतिक्रमणे तात्काळ काढावे. - याबाबत राज्यांच्या मुख्य सचिवांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साह्य घ्यावे. कोणत्याही कारणाखाली कारवाई टाळू नये. - तसेच बेकायदा बांधकाम नियमित करू नये. केवळ अशा जमिनींवर शाळा, दवाखाना अथवा सार्वजनिक सेवा सुरू असल्यास किवा सरकारी अधिसूचनेद्वारे बेघरांना, अनुसूचित जाती-जमातीतील लोकांच्या बाबतीत बेकायदा ताबा नियमित करण्याचा विचार करावा.’

विभागनिहाय अतिक्रमण -विभाग    अतिक्रमणे    क्षेत्रफळ (हे.)कोकण    २३,९२३    ९५३ पुणे    ७६,९६९    ३,३७१नाशिक    १९,१५५     ६९६औरंगाबाद    ५४,१३३    २,४२०अमरावती    १८,५४१     ८१२नागपूर    २९,४३२    १,८३७(महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहिती)

विदर्भ -जिल्हा    गायरान    अतिक्रमित     संख्याअकोला     १२,५२१.७६     ३९.३४    ३,०१०अमरावती    ६,८२६     २४.२८    ३६०नागपूर    १,६४३.२९    ९.५५    १४८बुलढाणा    १८,१०६.५३    २४८.६६    १३,०१५चंद्रपूर    ५४०    ५३८    १,३९०गोंदिया    २४,६२९.२१    १,१२६.६६    २७,८५४यवतमाळ    ४९८.६९    ४९८.६९    - -भंडारा    १८.१८    ०    ०वाशिम    ४५,३३३.२०    ०    गडचिरोली    ०    ०    - -वर्धा    ०    ०    - -

उत्तर महाराष्ट्र -जिल्हा    गायरान    अतिक्रमित     संख्यानाशिक    १६१    १६१     - -जळगाव    - -    ९.८७    ७१६नंदुरबार    २,०००    - -    - -धुळे     - -    २७.८    १,८६८अहमदनगर    १७६३५.५८२    ४६१.९२७    ११५९२    

प. महाराष्ट्र, कोकण -जिल्हा    गायरान    अतिक्रमित     संख्याठाणे    २,२०९.३३    ६२४.२५    १२,६७६पालघर    ३०३९.२५    २१०.९९     ७,२६४रायगड    - -    - -    ३,९३५सिंधुदुर्ग    ३१५.६३     ०     ०सांगली    १०,४४६.६१    १०,०५१.१४    ११,४६८रत्नागिरी    ८५३.७८     ०.६१     ४८कोल्हापूर    २३ हजार    १,५००    २३,३४४सातारा     ८,८६२.९८    १०७.१२    १,७५८सोलापूर     - -    ९४७     २१,०००पुणे    १५,९०३.०५     ९९१.७६     १६,४७०

मराठवाडा -जिल्हा    गायरान    अतिक्रमित     संख्याजालना    २०,८७७.९७    ४,०८०    - -बीड    ४०,२७२    - -     - -परभणी    ३,५४०.३५    ८०.४३    २,०४०लातूर    ६,४९७.७२    ६९६.५१    २२,११९उस्मानाबाद    ४,९८४.४६    ७६.५७    १,५७२नांदेड    ४,३६०.३०    ३४०    २,०४४औरंगाबाद    ५३,५३९    १२,५००    ४१,२५०

(गायरान     आणि अतिक्रमित आकडेवारी हेक्टरमध्ये)

हायकोर्टाचे सरकारला निर्देशयापुढे कोणत्याही सरकारी प्रशासनाने किवा अधिकाऱ्याने अतिक्रमणे व बेकायदा बांधकामे नियमित करू नये. १२ जुलै २०११ पर्यंत १२ हजार ६५२ अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय कशाच्या आधारे घेतला त्याचे उत्तर चार आठवड्यांत द्यावे.दोन लाख २२ हजार १५३ अतिक्रमणे वर्षअखेरपर्यंत हटवण्याबाबतचा नेमका कृती आराखडा सादर करावा.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकारEnchroachmentअतिक्रमण