शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जिल्ह्यातील गडकोट, किल्ले मोजताहेत अखेरच्या घटका

By admin | Updated: May 1, 2017 02:18 IST

च डोंगरावर असलेल्या काळ्या पाषाणातील दगडधोंड्यांमधील गडकोटांवर शिवरायांनी स्वराज्याचे तोरण फडकाविले. हे साध्य

गोरख माझिरे / भूगावउंच डोंगरावर असलेल्या काळ्या पाषाणातील दगडधोंड्यांमधील गडकोटांवर शिवरायांनी स्वराज्याचे तोरण फडकाविले. हे साध्य करताना ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता या भूमीला पारतंत्र्यामधून मुक्त केले; परंतु हेच गडकोट किल्ले सध्या अखेरच्या घटका मोजताहेत.महाराष्ट्राची संस्कृती जतन आणि संरक्षण करण्यासाठी त्या-त्या काळातील राजवटींनी या सह्याद्रीच्या माथ्यावर किल्ले उभारणी केली. आपापल्या गरजेनुसार गिरीदुर्ग, वनदुर्ग, भुईकोट आणि जलदुर्ग अशा किल्ल्यांची उभारणी झाली. या दुर्गरत्नांनीच महाराष्ट्र प्रदेशाचे वर्षानुवर्षे रक्षण केले;परंतु बलस्थान असलेले गडकिल्ले मात्र आजही उपेक्षित आहेत. मजा, मस्ती, सेल्फीच्या नादात आपण त्या वास्तूंचे महत्त्वदेखील विसरलो. ऐतिहासिक स्थळी कोणत्याही परवानग्या न घेता मुक्काम करणे, गडावर आग लावणे, प्लॅस्टिकच्या बाटल्या पिशव्या गडावर फेकणे, गडावर मद्यपान करणे, अन्न शिजविणे, काचेच्या बाटल्या फोडणे, गडावरील एखादा दगड हलवण्याचा प्रयत्न करणे, कचरा टाकणे असो, किल्ल्यांच्या तटबंदी आणि बुरुजावर प्रेमीयुगुलांनी आपले नाव लिहिणे, ऐतिहासिक ठिकाणी दारू पिणे, नको तसे फोटो काढणे, असे प्रकार गडकिल्ल्यांवर सर्रास घडतात. असे गडकिल्ले अनेकांसाठी केवळ एक पिकनिक पॉइंट एवढेच राहिलेले आहे.या अशा ऐतिहासिक ठिकाणी पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष अशा प्रवृत्तींना खतपाणी घालणारे ठरतेय. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी महाराष्ट्रातील इतिहास आणि गड-किल्ले तज्ज्ञ मंडळींचा समावेश असलेल्या गड-संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली आहे. हे प्रयत्न होतील तेव्हा होतील. पण, आपण स्वत:ही आपली नैतिक जबाबदारी समजून यात पुढाकार घ्यायला हवा. किल्ले तिकोण्यावर श्री शिवदुर्ग संवर्धन ही संस्था दुर्गसंवर्धनाचे अविरत काम करते. अन् गड बघून मन सुखावतंया किल्ल्यावर कमरेला लाल शेला गुंडाळून आणि डोक्यात लाल फेटा चढवून मावळ्याच्या पांढऱ्या वेषात असलेला सुजीत मोहोळ नावाचा उमदा गडपाल सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो.४सन २००८ पासून या संस्थेच्या वतीने गडपाल म्हणून कार्यरत आहे. गडावर जाईपर्यंत एकही प्लॅस्टिकची पिशवी, बाटली, इत्यादी कचरा दिसत नाही यावरूनच त्यांच्या कामाचा अंदाज येतो. दररोज गडावर जाणे, साफसफाई करणे, झाडांना पाणी देणे, गैरप्रकार घडताना दिसल्यास त्यास रोखणे, असं काम ते गडपाल या नात्याने करतात. त्यांना येणाऱ्या अडचणी अनेक आहेत. मुळशीतील किल्ले हे पूर्णपणे दुर्लक्षित आणी असुरक्षित आसून किल्ले संवर्धनाचे काम काही मंडळे व संस्था करत आहेत. सरकारने किल्ल्यावर कसल्याही प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. सरकार व प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष करत आहे. - राजेश नेळगे, दुर्गप्रेमी, पुणेसरकारकडुन गडकिल्ल्यांसाठी निधी येतो, परंतु त्याचा वापर योग्य रितीने होत नाही, गडांसाठी काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांना हे काम दिल्यास योग्य प्रकारे काम होऊन, किल्ल्यावरील पर्यटन वाढण्यास हातभार वाढेल.- पंडित अतिवाडकर, श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे