शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

‘एनएचएम’चे भवितव्य टांगणीला!

By admin | Updated: March 6, 2017 02:14 IST

३१ मार्चला संपणार मुदत; हजारो कर्मचारी संभ्रमात.

अतुल जयस्वाल अकोला, दि. ५- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी अभियान व राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध राष्ट्रीय संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या राज्यभरातील तब्बल २२ हजार अधिकारी व कर्मचार्‍यांचे कंत्राट ३१ मार्च २0१७ रोजी संपत आहे. शासकीय सेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी लढा देत असलेल्या या कर्मचार्‍यांना यावर्षी अद्यापपर्यंंत मुदतवाढ मिळालेली नसल्याने त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.जनतेस सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरायी आणि सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात एप्रिल २00५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले. दरम्यान, २0१४-१५ मध्ये केंद्र सरकारने सर्व केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित करून त्यास ह्यराष्ट्रीय आरोग्य अभियानह्ण, असे नाव दिले. या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध राष्ट्रीय संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांचा समावेश होतो. या अभियानांतर्गत असलेल्या विविध योजना राबविण्यासाठी आरोग्य विभागातील विविध आस्थापनांमध्ये राज्यभरात तब्बल २२ हजार अधिकारी व कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. इतर शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे काम करावे लागत असतानाही या कर्मचार्‍यांना मानधन मात्र अत्यंत तुटपुंजे मिळते. ह्यसमान काम - समान वेतनह्ण आणि विनाशर्त शासकीय सेवेत समायोजन या दोन प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ ही संघटना २0१२ पासून संघर्ष करीत आहे. परंतु, शासनाकडून अद्यापपर्यंंत त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. दरम्यान, एनएचएम अंतर्गत असलेल्या योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने ३१ मार्च २0१७ पर्यंंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदत संपण्यासाठी केवळ २५ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. दरवर्षी साधारणपणे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात या अभियानास मुदतवाढ दिली जाते. मार्च महिना सुरू झाला असतानाही शासन स्तरावरून अद्यापही या अभियानास मुदतवाढ मिळाली नसल्याने या अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांमध्ये नोकरीविषयी साशंकता निर्माण झाली आहे.राज्यात २२ हजार कर्मचारीएनएचएम अंतर्गत राज्यात २२ हजार कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. अमरावती विभागात जवळपास १५00 अधिकारी-कर्मचारी एनएचएम अंतर्गत विविध पदांवर काम करीत आहेत.एनएचएम अभियानातील कर्मचारी हे ११ महिन्यांच्या कंत्राटावर कार्यरत असतात. दरवर्षी कंत्राट संपल्यानंतर त्यांना नव्याने मुदतवाढ देण्यात येते. सुरुवातीपासून ही प्रक्रिया अवलंबिण्यात येत आहे. यावर्षीही कंत्राटी कर्मचार्‍यांना मुदतवाढ देण्यात येईल. - डॉ. नितीन अंबाडेकर उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला.एनएचएम अभियानातील कर्मचार्‍यांना अद्यापपर्यंंत शासन स्तरावरून मुदतवाढीचा कोणताही निर्णय झाला नाही. शासनाने अभियानास मुदतवाढ देतानाच कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करावे. - मनोज कडू, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ, अकोला