शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
3
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
4
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
5
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
6
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
7
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
8
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
9
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
10
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
11
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
12
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
13
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
14
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
15
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
16
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
17
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
18
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
19
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
20
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन

वैधानिक मंडळांना निधी देऊ - अर्थमंत्री

By admin | Updated: April 6, 2015 23:08 IST

राज्याचा समतोल विकास साधण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द असून विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी वैधानिक मंडळांना निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

मुंबई : राज्याचा समतोल विकास साधण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द असून विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी वैधानिक मंडळांना निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे विनंतीही करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली. पुणे येथील उर्वरित महाराष्ट्र वैधानिक मंडळाचे मुख्यालय नाशिक येथे स्थलांतरीत करण्याची शिफारस डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली होती. याबाबतचा प्रश्न शेकापचे जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री म्हणाले की, केळकर समितीने नाशिक येथे वैधानिक मंडळाचे मुख्यालय हलविण्याची शिफारस केली होती. मात्र, सदर अहवालावर सभागृहात अद्याप चर्चा बाकी आहे. समितीच्या कोणत्या शिफारसी स्वीकारायच्या याचा निर्णय सभागृहातील चर्चेनंतरच घेतला जाईल. सध्यातरी वैधानिक मंडळाचे कार्यालय नाशिक येथे हलविण्याबाबत सरकारने कोणताच निर्णय घेतला नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी वैधानिक मंडळांना दिला जाणारा निधी बंद करण्यात आला असून तो निधी पुर्ववत देण्याचा निर्णय घेणार का, असा प्रश्न केला. यावर,राज्यपालांच्या निर्देशानुसार निधीचे वाटप केले जाते. मात्र, आघाडी शासनाच्या काळात २०११-१२ साली वैधानिक मंडळांचे निधी वाटप थांबविण्यात आले. तत्कालीन सरकारने हा निधी वाटप सुरु ठेवण्याची साधी विनंतीही राज्यपालांना केली नाही. (प्रतिनिधी)