शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

वैधानिक मंडळांना निधी देऊ - अर्थमंत्री

By admin | Updated: April 6, 2015 23:08 IST

राज्याचा समतोल विकास साधण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द असून विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी वैधानिक मंडळांना निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

मुंबई : राज्याचा समतोल विकास साधण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द असून विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी वैधानिक मंडळांना निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे विनंतीही करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली. पुणे येथील उर्वरित महाराष्ट्र वैधानिक मंडळाचे मुख्यालय नाशिक येथे स्थलांतरीत करण्याची शिफारस डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली होती. याबाबतचा प्रश्न शेकापचे जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री म्हणाले की, केळकर समितीने नाशिक येथे वैधानिक मंडळाचे मुख्यालय हलविण्याची शिफारस केली होती. मात्र, सदर अहवालावर सभागृहात अद्याप चर्चा बाकी आहे. समितीच्या कोणत्या शिफारसी स्वीकारायच्या याचा निर्णय सभागृहातील चर्चेनंतरच घेतला जाईल. सध्यातरी वैधानिक मंडळाचे कार्यालय नाशिक येथे हलविण्याबाबत सरकारने कोणताच निर्णय घेतला नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी वैधानिक मंडळांना दिला जाणारा निधी बंद करण्यात आला असून तो निधी पुर्ववत देण्याचा निर्णय घेणार का, असा प्रश्न केला. यावर,राज्यपालांच्या निर्देशानुसार निधीचे वाटप केले जाते. मात्र, आघाडी शासनाच्या काळात २०११-१२ साली वैधानिक मंडळांचे निधी वाटप थांबविण्यात आले. तत्कालीन सरकारने हा निधी वाटप सुरु ठेवण्याची साधी विनंतीही राज्यपालांना केली नाही. (प्रतिनिधी)