शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

निधी देऊ, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावा

By admin | Updated: May 11, 2017 00:58 IST

चंद्रकांतदादा : जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास पाण्याचा साठा वाढून प्रश्न मार्र्गी लागतील. प्रकल्प रेंगाळल्याने लागणाऱ्या निधीत कित्येक पटींनी वाढ होते; त्यामुळे हजारो कोटींचे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा. त्यासाठी भूसंपादन, निधी, विविध परवाने या संदर्भांतील आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा आढावा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठकीत घेतला. यावेळी पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार चंद्रदीप नरके, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. साळुंखे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एम चव्हाण, कार्यकारी अभियंता बी. एस. घुणकीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्फनाला, आंबेओहळ, नागनवाडी, धामणी, उचंगी, चांदोली अभयारण्य या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा होण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता तातडीने करा, प्रस्ताव मंत्रालय स्तरावरून मार्र्गी लावू, आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे सांगितले. सर्फनाला प्रकल्प ३३ कोटींवरून २९१ कोटींवरआजरा तालुक्यातील सर्फनाला मध्यम प्रकल्पात एकूण पाणीसाठा १८.९७ दशलक्ष घनमीटर होणार असून, आजरा तालुक्यातील २० गावांमधील ३७८४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे सांगण्यात आले. ३३ कोटी खर्चाच्या मूळ प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव २९१ कोटी २१ लाखांचा झाला आहे. या धरणाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी २६२ हेक्टर क्षेत्र संपादित केले आहे. आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आवश्यकआजरा तालुक्यातील आंबेओहळ मध्यम प्रकल्प १.२४ टीएमसी क्षमतेचा असून आजरा तालुक्यातील २१२२ हेक्टर व गडहिंग्लज तालुक्यातील ४२२० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. हा मूळ प्रकल्प ३० कोटी खर्चाचा असून, त्याची २३० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्तावित केले आहे. सध्या धरणाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. एप्रिल २०१७ अखेर १०९ प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप केले आहे.नागनवाडी पाटबंधारेचे काम २००९ पासून बंदभुदरगडमधील नागनवाडी लघू पाटबंधारे प्रकल्प १२ कोटी ९३ लाख रुपयांवरून ३६ कोटी ३६ लाख रुपयांचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये ८.३३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होणार असून ७०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे २००९ पासून हे काम बंद आहे. ९५.८१ हेक्टरचे संपादन पूर्ण झाले आहे. २१२ प्रकल्पग्रस्त जमीन वाटपासाठी पात्र आहेत. पैकी ६६ जणांना जमीन वाटप केले आहे.उचंगीच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न बाकीउचंगी लघू पाटबंधारे प्रकल्प, तालुका आजरा येथील संकल्पित पाणीसाठा १४.४८ दशलक्ष घनमीटर असून लाभक्षेत्र १७९७ हेक्टरचे आहे. १५ कोटींच्या प्रकल्पाची सुधारित किंमत ५८ कोटी ७३ लाख इतकी आहे. धरणाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. २८० प्रकल्पग्रस्त असून १६१ जणांना जमीन देय आहे. पुढील चार महिन्यांत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.चांदोली अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसन रखडलेशाहूवाडी तालुक्यातील चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी वाटपाबाबत चर्चा झाली. यामध्ये ८२१ प्रकल्पग्रस्तांना जमीन देय असून ५४ जणांना पूर्ण, तर २१४ जणांना अंशत: जमिनीचे वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अपूर्ण भूसंपादन पावसाळ्यात कराअपूर्ण प्रकल्पांचे भूसंपादन पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये करा, असे सांगून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शेती महामंडळाची जमीन, मुलकी पड जमीन, गायरान जमीन या जमिनी घेण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. धामणी प्रकल्पाचे काम ७५ टक्के पूर्णराधानगरी तालुक्यातील धामणी मध्यम प्रकल्पाची क्षमता ३.८५ टीएमसी पाणीसाठ्याची आहे. याद्वारे राधानगरी, गगनबावडा व पन्हाळा तालुक्यांतील १४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तर पिण्यासाठी २.४२ टीएमसी प्रस्तावित केले आहे. १३० कोटींच्या या प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव ७८२ कोटी ३७ लाखांचा केला आहे. धरणाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. २४९ प्रकल्पग्रस्तांपैकी २०४ प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप केले आहे.