शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

निधी देऊ, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावा

By admin | Updated: May 11, 2017 00:58 IST

चंद्रकांतदादा : जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास पाण्याचा साठा वाढून प्रश्न मार्र्गी लागतील. प्रकल्प रेंगाळल्याने लागणाऱ्या निधीत कित्येक पटींनी वाढ होते; त्यामुळे हजारो कोटींचे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा. त्यासाठी भूसंपादन, निधी, विविध परवाने या संदर्भांतील आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा आढावा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठकीत घेतला. यावेळी पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार चंद्रदीप नरके, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. साळुंखे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एम चव्हाण, कार्यकारी अभियंता बी. एस. घुणकीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्फनाला, आंबेओहळ, नागनवाडी, धामणी, उचंगी, चांदोली अभयारण्य या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा होण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता तातडीने करा, प्रस्ताव मंत्रालय स्तरावरून मार्र्गी लावू, आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे सांगितले. सर्फनाला प्रकल्प ३३ कोटींवरून २९१ कोटींवरआजरा तालुक्यातील सर्फनाला मध्यम प्रकल्पात एकूण पाणीसाठा १८.९७ दशलक्ष घनमीटर होणार असून, आजरा तालुक्यातील २० गावांमधील ३७८४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे सांगण्यात आले. ३३ कोटी खर्चाच्या मूळ प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव २९१ कोटी २१ लाखांचा झाला आहे. या धरणाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी २६२ हेक्टर क्षेत्र संपादित केले आहे. आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आवश्यकआजरा तालुक्यातील आंबेओहळ मध्यम प्रकल्प १.२४ टीएमसी क्षमतेचा असून आजरा तालुक्यातील २१२२ हेक्टर व गडहिंग्लज तालुक्यातील ४२२० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. हा मूळ प्रकल्प ३० कोटी खर्चाचा असून, त्याची २३० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्तावित केले आहे. सध्या धरणाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. एप्रिल २०१७ अखेर १०९ प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप केले आहे.नागनवाडी पाटबंधारेचे काम २००९ पासून बंदभुदरगडमधील नागनवाडी लघू पाटबंधारे प्रकल्प १२ कोटी ९३ लाख रुपयांवरून ३६ कोटी ३६ लाख रुपयांचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये ८.३३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होणार असून ७०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे २००९ पासून हे काम बंद आहे. ९५.८१ हेक्टरचे संपादन पूर्ण झाले आहे. २१२ प्रकल्पग्रस्त जमीन वाटपासाठी पात्र आहेत. पैकी ६६ जणांना जमीन वाटप केले आहे.उचंगीच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न बाकीउचंगी लघू पाटबंधारे प्रकल्प, तालुका आजरा येथील संकल्पित पाणीसाठा १४.४८ दशलक्ष घनमीटर असून लाभक्षेत्र १७९७ हेक्टरचे आहे. १५ कोटींच्या प्रकल्पाची सुधारित किंमत ५८ कोटी ७३ लाख इतकी आहे. धरणाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. २८० प्रकल्पग्रस्त असून १६१ जणांना जमीन देय आहे. पुढील चार महिन्यांत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.चांदोली अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसन रखडलेशाहूवाडी तालुक्यातील चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी वाटपाबाबत चर्चा झाली. यामध्ये ८२१ प्रकल्पग्रस्तांना जमीन देय असून ५४ जणांना पूर्ण, तर २१४ जणांना अंशत: जमिनीचे वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अपूर्ण भूसंपादन पावसाळ्यात कराअपूर्ण प्रकल्पांचे भूसंपादन पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये करा, असे सांगून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शेती महामंडळाची जमीन, मुलकी पड जमीन, गायरान जमीन या जमिनी घेण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. धामणी प्रकल्पाचे काम ७५ टक्के पूर्णराधानगरी तालुक्यातील धामणी मध्यम प्रकल्पाची क्षमता ३.८५ टीएमसी पाणीसाठ्याची आहे. याद्वारे राधानगरी, गगनबावडा व पन्हाळा तालुक्यांतील १४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तर पिण्यासाठी २.४२ टीएमसी प्रस्तावित केले आहे. १३० कोटींच्या या प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव ७८२ कोटी ३७ लाखांचा केला आहे. धरणाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. २४९ प्रकल्पग्रस्तांपैकी २०४ प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप केले आहे.