शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

एफआरपीची रक्कम देणाऱ्यांना मिळणार कर्ज

By admin | Updated: June 9, 2015 03:08 IST

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना २ हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय येत्या बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात येईल.

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना २ हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय येत्या बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात येईल. मात्र जे साखर कारखाने त्यांच्या वाट्याचे रास्त बाजार मूल्याचे (एफआरपी) पैसे देतील त्यांनाच कर्जाऊ रक्कम दिली जाईल, अशी स्पष्टोक्ती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.पुढील १० वर्षांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या सोडवून साखर उद्योगाला दिलासा देण्यासंबंधीचा पथदर्शक आराखडा साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील समितीने सोमवारी पाटील यांना सादर केला. यावेळी साखर कारखाने देत असलेली रक्कम व रास्त बाजार मूल्य यामध्ये १४०० रुपयांची तफावत असल्याने सरकारने ८५० रुपये प्रतिटन अनुदान द्यावे, अशी मागणी साखर संघाच्या प्रतिनिधींनी केली.त्यावर सहकारमंत्री म्हणाले की, राज्य सरकार २ हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यास बांधिल आहे. मात्र एवढी मोठी रक्कम कशी द्यायची यावर विचार सुरू आहे. साखर कारखाने ऊस उत्पादकांचे ३८०० कोटी रुपये देणे बाकी आहे. येत्या काही दिवसांत ही रक्कम ३ हजार कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा साखर कारखान्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारने २ हजार कोटी रुपये दिल्यास हा भार हलका होईल, असे साखर कारखानदारांचे मत आहे. सरकार भागभांडवल देते त्या साखर कारखाने व सूत गिरण्यांवर आपले संचालक नियुक्त करु शकते, असेही पाटील म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)या साखर कारखानदारांनी रास्त बाजार मूल्याचे आपल्या वाट्याचे पैसे दिल्यावर सरकार त्यांना ही कर्जाऊ रक्कम मंजूर करणार आहे. कारखान्यांनी संबंधित बँकांकडून ही रक्कम कर्जाऊ घ्यावी व सरकार त्यास गॅरेंटी राहील, हा पर्याय उपलब्ध आहे.