शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

एफआरपीची रक्कम देणाऱ्यांना मिळणार कर्ज

By admin | Updated: June 9, 2015 03:08 IST

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना २ हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय येत्या बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात येईल.

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना २ हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय येत्या बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात येईल. मात्र जे साखर कारखाने त्यांच्या वाट्याचे रास्त बाजार मूल्याचे (एफआरपी) पैसे देतील त्यांनाच कर्जाऊ रक्कम दिली जाईल, अशी स्पष्टोक्ती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.पुढील १० वर्षांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या सोडवून साखर उद्योगाला दिलासा देण्यासंबंधीचा पथदर्शक आराखडा साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील समितीने सोमवारी पाटील यांना सादर केला. यावेळी साखर कारखाने देत असलेली रक्कम व रास्त बाजार मूल्य यामध्ये १४०० रुपयांची तफावत असल्याने सरकारने ८५० रुपये प्रतिटन अनुदान द्यावे, अशी मागणी साखर संघाच्या प्रतिनिधींनी केली.त्यावर सहकारमंत्री म्हणाले की, राज्य सरकार २ हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यास बांधिल आहे. मात्र एवढी मोठी रक्कम कशी द्यायची यावर विचार सुरू आहे. साखर कारखाने ऊस उत्पादकांचे ३८०० कोटी रुपये देणे बाकी आहे. येत्या काही दिवसांत ही रक्कम ३ हजार कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा साखर कारखान्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारने २ हजार कोटी रुपये दिल्यास हा भार हलका होईल, असे साखर कारखानदारांचे मत आहे. सरकार भागभांडवल देते त्या साखर कारखाने व सूत गिरण्यांवर आपले संचालक नियुक्त करु शकते, असेही पाटील म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)या साखर कारखानदारांनी रास्त बाजार मूल्याचे आपल्या वाट्याचे पैसे दिल्यावर सरकार त्यांना ही कर्जाऊ रक्कम मंजूर करणार आहे. कारखान्यांनी संबंधित बँकांकडून ही रक्कम कर्जाऊ घ्यावी व सरकार त्यास गॅरेंटी राहील, हा पर्याय उपलब्ध आहे.