शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
3
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
4
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
5
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
7
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
8
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
9
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
10
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
11
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
12
खळबळजनक! ७ वर्षांच्या मुलाने चुकून घेतला ९ वर्षांच्या भावाचा जीव, खेळता खेळता काय घडलं?
13
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
14
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
15
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
16
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
17
येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं! गणराया, तू जाताना वेड लावून जातोस रे...
18
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
19
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
20
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले

खव्याच्या भट्ट्या विझल्या!

By admin | Updated: May 18, 2016 05:30 IST

एक-दोन नव्हेतर तब्बल ७०पेक्षा अधिक कुटुंबे जीवापाड मेहनत घेऊन दर्जेदार खवानिर्मितीच्या व्यवसायात आहेत़

एसपी़ शिंदे,

डोंगरशेळकी (जि. लातूर)- उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी या गावाचे नाव उच्चारले की जिभेवर तरळते ती येथील प्रसिद्ध खव्याची लज्जत़ एक-दोन नव्हेतर तब्बल ७०पेक्षा अधिक कुटुंबे जीवापाड मेहनत घेऊन दर्जेदार खवानिर्मितीच्या व्यवसायात आहेत़ परंतु, यंदा पाऊस नसल्याने या भागातील दुग्धोत्पादन घटले असून, त्याचा मोठा परिणाम खवा उत्पादनावर झाला आहे़ सध्या सरासरीच्या १० टक्केही उत्पादन होत असल्याने डोंगरशळकीकरांची आर्थिक घडी विस्कटून गेली आहे.श्री समर्थ धोंडूतात्यांच्या वास्तव्याने डोंगरशेळकी गावाला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे़ गाव डोंगरदऱ्यांच्या रांगांमध्ये वसलेले असल्याने शेती माळरानच़ त्यामुळे पदरी फारसे काही पडतच नाही़ मात्र, चाऱ्याची उपलब्धता असल्याने पशुधन व्यवसाय भरभराटीला आला़ मोठ्या प्रमाणात दुग्धोत्पादन होऊ लागल्याने एकेक करीत तब्बल ७०पेक्षा अधिक पशुपालकांनी खवानिर्मितीच्या व्यवसायात उडी टाकली़ शुद्ध दुधाद्वारे दर्जेदार खवा डोंगरशेळकीत तयार होऊ लागला़ व्यवसायात प्रामाणिकपणा व दर्जा जपल्याने अल्पावधीतच येथील खव्याने बाजारपेठेत चांगला जम बसविला़ संपूर्ण जिल्हाभरात कुठेही खव्याची मोठी गरज असल्यास रात्रीतून ती पूर्ण करण्याची क्षमता डोंगरशेळकीने जपली़ त्यामुळे खवा म्हटले की पहिल्यांदा डोंगरशेळकीचे नाव ओठावर येऊ लागले़ या व्यवसायातून गावातील ७०पेक्षा अधिक कुटुंबे स्थिरस्थावर झाली़ त्यांची संपूर्ण उपजिविकाच या व्यवसायावर स्थिर झाली़ दरम्यान, गेल्या दोन-तीन वर्षांपासून या भागात अत्यल्प पर्जन्यमान झाले़ या पावसाळ्यात तर पुरेसा चारा येईल एवढाही पाऊस न झाल्याने पशुपालकांवर पशुधन विकण्याची वेळ आली़ त्यामुळे दुग्धोत्पादनात मोठी घट झाली व त्याचा परिणाम खवा व्यवसायावर झाला़ आजघडीला गावातील अनेक भट्ट्या विझल्या आहेत़ ज्या सुरू आहेत त्यातून अत्यल्प उत्पादन होत आहे़ >चारा-पाणीटंचाईमुळे पशुधन विकले...डोंगरशेळकीतील व्यंकटराव मरेवाड यांच्याकडे चार दुभत्या म्हशी होत्या़ परंतु, चारा व पाणीटंचाईमुळे त्यांनी दोन म्हशी विकल्या़ गणेश मुंढे यांच्याकडेही ६ जनावरे दुभती आहेत़ परंतु, टंचाईमुळे ती पुरेशी दूध देत नसल्याचे मुंढे यांनी सांगितले़ भट्टीसाठी आवश्यक असणारा दूधपुरवठा क्षमतेने होत नसल्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून खवा उत्पादन घटले आहे़ अगदी १० टक्केपेक्षाही कमी खवा उत्पादित होत असल्याचे व्यवसायिक गोपीनाथ इंगळेवाड, तुळशीदास मुंढे, रामकिशन शेळके, तुकाराम मुंढे, पटन मुंढे, सुंदरबाई पवार, संतोष रोकडे, रमाकांत मुंढे यांनी सांगितले़