शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पराभूत उमेदवारांचा मोर्चा

By admin | Updated: March 1, 2017 01:13 IST

मतदान यंत्रात हेराफेरी केल्याचा आरोप करीत महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मोर्चा काढला.

पुणे : मतदान यंत्रात हेराफेरी केल्याचा आरोप करीत महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मोर्चा काढला. भाजपा वगळता सर्वपक्षीय पराभूत उमेदवार मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मतदान यंत्राची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली व त्याचे दहन करण्यात आले.उपमहापौर मुकारी अलगुडे (काँग्रेस) स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, नीलेश निकम (राष्ट्रवादी काँग्रेस), रूपाली पाटील, किशोर शिंदे (मनसे), दत्ता बहिरट, मिलिंद काची (काँग्रेस), धनंजय जाधव (भाजपा बंडखोर) या राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अन्य अनेक उमेदवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. मतमोजणी आधीच भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार, असा अंदाज जाहीर करणाऱ्या भाजपाच्या खासदारांचा यावेळी धिक्कार करण्यात आला. त्यांना आधीच निकाल कसा समजला, त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू केमसे व अन्य अनेक उमेदवारांनी केली. (प्रतिनिधी)>फेरनिवडणुकीची मागणीनागरिकांच्या मतांची चोरी करणाऱ्या भाजपाचा धिक्कार असो, ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, ईव्हीएम घोटाळा हीच का भाजपाची पारदर्शकता अशा विविध घोषणा मोर्चामध्ये दिल्या जात होत्या. बालगंधर्व रंगमंदिरापासून मतदान यंत्रांची अत्यंयात्रा काढण्यात आली. नागरिकांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात होते. फेरनिवडणूकीची मागणी सर्व पराभूत उमेदवारांनी केली.>भाजपाचा हाच पारदर्शक कारभार का?भाजपाच्या विरोधात बंड करून पत्नीसाठी शिवसेनेची उमेदवारी घेणारे भाजपाचे नगरसेवक धनंजय जाधव हेही या मोर्चात सहभागी होते. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुकीस उभ्या राहिलेल्या त्यांच्या पत्नीचा पराभव झाला आहे. लोकशाही मार्गाने विजय मिळणार नाही, याची खात्री असल्याने भाजपाने मतदान यंत्रात फेरफार करून हा विजय मिळवला आहे, असा आरोप त्यांनी केला. बाळासाहेब बोडके, केमसे आदींनीही यावेळी भाजपावर आरोप केले. भाजपा सरकारचा हाच का पारदर्शक कारभार, अशी टीका करण्यात आली.बालगंधर्व ते वैकुंठ असा मोर्चा काढण्यात येणार होता. त्यात मतदान यंत्रांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा नेण्यात येणार होती. बालगंधर्व रंगमंदिराजवळ गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी मोर्चा वैकुंठापर्यंत नेण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे छत्रपती संभाजी उद्यानापर्यंतच मोर्चा नेण्यात आला व तिथे मतदान यंत्रांचे दहन करण्यात आले. प्रत्यक्ष झालेले मतदान व मतदान यंत्राद्वारे मोजणी झालेले मतदान याच्या आकडेवारीत तफावत आहे. त्यासंबधीची सर्व कागदपत्रे जमा करून याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय मोर्चातील पराभूत उमेदवारांनी घेतला.