शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

पराभूत उमेदवारांचा मोर्चा

By admin | Updated: March 1, 2017 01:13 IST

मतदान यंत्रात हेराफेरी केल्याचा आरोप करीत महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मोर्चा काढला.

पुणे : मतदान यंत्रात हेराफेरी केल्याचा आरोप करीत महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मोर्चा काढला. भाजपा वगळता सर्वपक्षीय पराभूत उमेदवार मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मतदान यंत्राची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली व त्याचे दहन करण्यात आले.उपमहापौर मुकारी अलगुडे (काँग्रेस) स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, नीलेश निकम (राष्ट्रवादी काँग्रेस), रूपाली पाटील, किशोर शिंदे (मनसे), दत्ता बहिरट, मिलिंद काची (काँग्रेस), धनंजय जाधव (भाजपा बंडखोर) या राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अन्य अनेक उमेदवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. मतमोजणी आधीच भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार, असा अंदाज जाहीर करणाऱ्या भाजपाच्या खासदारांचा यावेळी धिक्कार करण्यात आला. त्यांना आधीच निकाल कसा समजला, त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू केमसे व अन्य अनेक उमेदवारांनी केली. (प्रतिनिधी)>फेरनिवडणुकीची मागणीनागरिकांच्या मतांची चोरी करणाऱ्या भाजपाचा धिक्कार असो, ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, ईव्हीएम घोटाळा हीच का भाजपाची पारदर्शकता अशा विविध घोषणा मोर्चामध्ये दिल्या जात होत्या. बालगंधर्व रंगमंदिरापासून मतदान यंत्रांची अत्यंयात्रा काढण्यात आली. नागरिकांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात होते. फेरनिवडणूकीची मागणी सर्व पराभूत उमेदवारांनी केली.>भाजपाचा हाच पारदर्शक कारभार का?भाजपाच्या विरोधात बंड करून पत्नीसाठी शिवसेनेची उमेदवारी घेणारे भाजपाचे नगरसेवक धनंजय जाधव हेही या मोर्चात सहभागी होते. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुकीस उभ्या राहिलेल्या त्यांच्या पत्नीचा पराभव झाला आहे. लोकशाही मार्गाने विजय मिळणार नाही, याची खात्री असल्याने भाजपाने मतदान यंत्रात फेरफार करून हा विजय मिळवला आहे, असा आरोप त्यांनी केला. बाळासाहेब बोडके, केमसे आदींनीही यावेळी भाजपावर आरोप केले. भाजपा सरकारचा हाच का पारदर्शक कारभार, अशी टीका करण्यात आली.बालगंधर्व ते वैकुंठ असा मोर्चा काढण्यात येणार होता. त्यात मतदान यंत्रांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा नेण्यात येणार होती. बालगंधर्व रंगमंदिराजवळ गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी मोर्चा वैकुंठापर्यंत नेण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे छत्रपती संभाजी उद्यानापर्यंतच मोर्चा नेण्यात आला व तिथे मतदान यंत्रांचे दहन करण्यात आले. प्रत्यक्ष झालेले मतदान व मतदान यंत्राद्वारे मोजणी झालेले मतदान याच्या आकडेवारीत तफावत आहे. त्यासंबधीची सर्व कागदपत्रे जमा करून याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय मोर्चातील पराभूत उमेदवारांनी घेतला.