शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार वीज खंडित केल्याने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: May 8, 2014 22:43 IST

आठवड्यात वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्रस्त शेतकर्‍यांनी दिला आहे.

भोर : भोर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सोळा तास भारनियमन, आठ तास असलेला वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. यामुळे पिके वाळून जात आहेत. नदीत पाणी असून उचलता येत नाही. आठवड्यात वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्रस्त शेतकर्‍यांनी दिला आहे.वीजपुरवठा खंडित होतो. १६ तास भारनियमन याबाबत वीजवितरण कंपनीचे अधिकारी व नामदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांनी बैठक घेतली. या वेळी दिलीप बाठे, बाळासो गरूड, विश्वास ननावरे, गजानन सोनवणे, शंकर मालुसरे, उत्तम थोपटे, अशोक पांगारे, नितीन सोनवणे, कैलास येवले व शेतकरी उपस्थित होते.तालुक्याच्या पूर्व भागातील भोंगवली, किकवी, सारोळा, इंगवली यांच्यासह अनेक गावांत दररोज १६ तास भारनियमन, शिवाय ८ तास होणारा वीजपुरवठाही वारंवार खंडित होतो. यामुळे नदीत पाणी असूनही पाणी उचलता येत नाही. पिके वाळून जात असून भारनियमनामुळे शेतकर्‍यांनापाण्याकडे बघण्याशिवाय कोणताच पर्याय राहत नाही. लाखो रुपये खर्च केलेला वाया जातोय. शेतकर्‍यांच्या नुकसानीला जबाबदार कोण?वीजवितरण कंपनी व पाटबंधारे विभाग एकत्रितपणे जाणूनबुजून शेतकर्‍याला पाणी उचलून देत नाहीत. त्यांचा हा डाव आहे, असा आरोपही या वेळी शेतकर्‍यांनी केला. वीजवितरण कंपनीच्या कार्यालयात गेल्यास अभियंते, कर्मचारी कार्यालयाला भेटत नाहीत. भेटल्यास उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून शेतकर्‍यांना रिकामेच परत पाठवतात. एखाद्या गावचा ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास तो दुरुस्त करण्यासाठी त्याला गावातील वीजबिल वसुलीची अट घालून अडवणूक केली जाते. यात १५ दिवस ट्रान्सफॉर्मर लावत नाही. परिणामी गावाला अंधारात राहावे लागते. अनेक गावांत सिंगल फेज लाईन आहे. ती लिकेज होत नाही. खांब वाकलेत. तारा लोंबकळत आहेत, याची तक्रार करूनही दखल घेत नाहीत. कंपनीचे कार्यकारी व वायरमन कामाच्या ठिकाणी राहत नाहीत. अशा अनेक तक्रारी या वेळी शेतकर्‍यांनी तीव्र शब्दांत अधिकार्‍यांसमोर मांडून राग व्यक्त केला.वीजवितरण कंपनीचे सासवड विभागाचे मुख्य अभियंता राखाडकर व भोरचे सहायक अभियंता माने यांनी शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेतल्या.पूर्व भागातील १६ तासांचे भारनियमन बंद करून ८ तास सुरळीत वीजपुरवठा करावा, इतर कामे पावसाळ्यापूर्वी करावीत, येत्या आठ दिवसांत वीजपुरवठ्यात सुधारणा झाली नाही, तर वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी शेतकर्‍यांनी दिला आहे.