शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
2
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
3
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
4
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
5
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
6
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
7
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
8
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
9
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
10
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
11
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
12
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
13
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
14
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
15
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
16
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
17
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
18
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
19
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
20
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न

वारंवार वीज खंडित केल्याने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: May 8, 2014 22:43 IST

आठवड्यात वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्रस्त शेतकर्‍यांनी दिला आहे.

भोर : भोर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सोळा तास भारनियमन, आठ तास असलेला वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. यामुळे पिके वाळून जात आहेत. नदीत पाणी असून उचलता येत नाही. आठवड्यात वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्रस्त शेतकर्‍यांनी दिला आहे.वीजपुरवठा खंडित होतो. १६ तास भारनियमन याबाबत वीजवितरण कंपनीचे अधिकारी व नामदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांनी बैठक घेतली. या वेळी दिलीप बाठे, बाळासो गरूड, विश्वास ननावरे, गजानन सोनवणे, शंकर मालुसरे, उत्तम थोपटे, अशोक पांगारे, नितीन सोनवणे, कैलास येवले व शेतकरी उपस्थित होते.तालुक्याच्या पूर्व भागातील भोंगवली, किकवी, सारोळा, इंगवली यांच्यासह अनेक गावांत दररोज १६ तास भारनियमन, शिवाय ८ तास होणारा वीजपुरवठाही वारंवार खंडित होतो. यामुळे नदीत पाणी असूनही पाणी उचलता येत नाही. पिके वाळून जात असून भारनियमनामुळे शेतकर्‍यांनापाण्याकडे बघण्याशिवाय कोणताच पर्याय राहत नाही. लाखो रुपये खर्च केलेला वाया जातोय. शेतकर्‍यांच्या नुकसानीला जबाबदार कोण?वीजवितरण कंपनी व पाटबंधारे विभाग एकत्रितपणे जाणूनबुजून शेतकर्‍याला पाणी उचलून देत नाहीत. त्यांचा हा डाव आहे, असा आरोपही या वेळी शेतकर्‍यांनी केला. वीजवितरण कंपनीच्या कार्यालयात गेल्यास अभियंते, कर्मचारी कार्यालयाला भेटत नाहीत. भेटल्यास उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून शेतकर्‍यांना रिकामेच परत पाठवतात. एखाद्या गावचा ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास तो दुरुस्त करण्यासाठी त्याला गावातील वीजबिल वसुलीची अट घालून अडवणूक केली जाते. यात १५ दिवस ट्रान्सफॉर्मर लावत नाही. परिणामी गावाला अंधारात राहावे लागते. अनेक गावांत सिंगल फेज लाईन आहे. ती लिकेज होत नाही. खांब वाकलेत. तारा लोंबकळत आहेत, याची तक्रार करूनही दखल घेत नाहीत. कंपनीचे कार्यकारी व वायरमन कामाच्या ठिकाणी राहत नाहीत. अशा अनेक तक्रारी या वेळी शेतकर्‍यांनी तीव्र शब्दांत अधिकार्‍यांसमोर मांडून राग व्यक्त केला.वीजवितरण कंपनीचे सासवड विभागाचे मुख्य अभियंता राखाडकर व भोरचे सहायक अभियंता माने यांनी शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेतल्या.पूर्व भागातील १६ तासांचे भारनियमन बंद करून ८ तास सुरळीत वीजपुरवठा करावा, इतर कामे पावसाळ्यापूर्वी करावीत, येत्या आठ दिवसांत वीजपुरवठ्यात सुधारणा झाली नाही, तर वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी शेतकर्‍यांनी दिला आहे.