शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

वारंवार वीज खंडित केल्याने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: May 8, 2014 22:43 IST

आठवड्यात वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्रस्त शेतकर्‍यांनी दिला आहे.

भोर : भोर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सोळा तास भारनियमन, आठ तास असलेला वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. यामुळे पिके वाळून जात आहेत. नदीत पाणी असून उचलता येत नाही. आठवड्यात वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्रस्त शेतकर्‍यांनी दिला आहे.वीजपुरवठा खंडित होतो. १६ तास भारनियमन याबाबत वीजवितरण कंपनीचे अधिकारी व नामदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांनी बैठक घेतली. या वेळी दिलीप बाठे, बाळासो गरूड, विश्वास ननावरे, गजानन सोनवणे, शंकर मालुसरे, उत्तम थोपटे, अशोक पांगारे, नितीन सोनवणे, कैलास येवले व शेतकरी उपस्थित होते.तालुक्याच्या पूर्व भागातील भोंगवली, किकवी, सारोळा, इंगवली यांच्यासह अनेक गावांत दररोज १६ तास भारनियमन, शिवाय ८ तास होणारा वीजपुरवठाही वारंवार खंडित होतो. यामुळे नदीत पाणी असूनही पाणी उचलता येत नाही. पिके वाळून जात असून भारनियमनामुळे शेतकर्‍यांनापाण्याकडे बघण्याशिवाय कोणताच पर्याय राहत नाही. लाखो रुपये खर्च केलेला वाया जातोय. शेतकर्‍यांच्या नुकसानीला जबाबदार कोण?वीजवितरण कंपनी व पाटबंधारे विभाग एकत्रितपणे जाणूनबुजून शेतकर्‍याला पाणी उचलून देत नाहीत. त्यांचा हा डाव आहे, असा आरोपही या वेळी शेतकर्‍यांनी केला. वीजवितरण कंपनीच्या कार्यालयात गेल्यास अभियंते, कर्मचारी कार्यालयाला भेटत नाहीत. भेटल्यास उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून शेतकर्‍यांना रिकामेच परत पाठवतात. एखाद्या गावचा ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास तो दुरुस्त करण्यासाठी त्याला गावातील वीजबिल वसुलीची अट घालून अडवणूक केली जाते. यात १५ दिवस ट्रान्सफॉर्मर लावत नाही. परिणामी गावाला अंधारात राहावे लागते. अनेक गावांत सिंगल फेज लाईन आहे. ती लिकेज होत नाही. खांब वाकलेत. तारा लोंबकळत आहेत, याची तक्रार करूनही दखल घेत नाहीत. कंपनीचे कार्यकारी व वायरमन कामाच्या ठिकाणी राहत नाहीत. अशा अनेक तक्रारी या वेळी शेतकर्‍यांनी तीव्र शब्दांत अधिकार्‍यांसमोर मांडून राग व्यक्त केला.वीजवितरण कंपनीचे सासवड विभागाचे मुख्य अभियंता राखाडकर व भोरचे सहायक अभियंता माने यांनी शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेतल्या.पूर्व भागातील १६ तासांचे भारनियमन बंद करून ८ तास सुरळीत वीजपुरवठा करावा, इतर कामे पावसाळ्यापूर्वी करावीत, येत्या आठ दिवसांत वीजपुरवठ्यात सुधारणा झाली नाही, तर वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी शेतकर्‍यांनी दिला आहे.