शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

जयगड होणार मालवाहतूक केंद

By admin | Updated: December 2, 2014 23:32 IST

जयगड पोर्ट : जगभरातील मालाची आयात-निर्यात सुलभतेने होणार

रत्नागिरी : जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडण्याचा सामंजस्य करार झाल्याने हे बंदर येत्या काही कालावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मालवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत न्हावा-शेवा (मुंबई), जे. एन. पी. टी. व गोवा या मोठ्या बंदरांवर मालवाहतुकीचा मोठा भार आहे. जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडले जाणार असल्याने अन्य बंदरांवरील मालवाहतुकीचा भार कमी होणार आहे. डिंगणी ते जयगड पोर्ट असा ३४ किलोमीटर्सचा मालवाहतूक रेल्वेमार्ग होणार आहे. जिल्ह्यातील धामणखोल-जयगड येथे बहुउद्देशीय बारमाही चालणारे बंदर जयगड पोर्ट लिमिटेड या खासगी विकासकामार्फत विकसित केले जात आहे. जलवाहतूक ही सर्वांत स्वस्त, परवडणारी वाहतूक म्हणून जगभरात ओळखली जाते. त्यामुळे राज्यातील न्हावा-शेवा, जेएनपीटी व गोवा बंदरातून मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावरील मालवाहतूक करणारी जहाजे नेहमीच दाखल होत आहेत. परिणामी तीनही बंदरांवर कामाचा व्याप प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नवीन बंदराची शासनाला तसेच जागतिक क्षेत्रातील आयात-निर्यातदार कंपन्यांनाही प्रतीक्षा होती. जयगड बंदर ही अपेक्षा पूर्ण करू शकते. यातूनच येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर विकसित करण्याचा विचार पुढे आला. त्यासाठीच गेल्या दोन-तीन वर्षांपासून जयगड बंदर कोकण रेल्वेला मालवाहतूकीच्या दृष्टीने जोडले जावे, याबाबत कोकण रेल्वे व शासनाबरोबर या कंपनीची चर्चा सुरू होती. हा मार्ग रत्नागिरी स्थानकापासून उक्षी किंवा भोके येथून पुढे जयगड बंदराला जोडला जावा, असा प्रारंभीचा सूर होता. मात्र, नंतर हा विचार बदलला असून, आता कोकण रेल्वेमार्गावरील डिंगणी (संगमेश्वर) येथून हा मालवाहतुकीचा एकेरी मार्ग जयगड बंदराला जोडण्याचा सामंजस्य करार राज्य सरकारच्यावतीने मेरिटाइम बोर्ड, कोकण रेल्वे महामंडळ व जयगड पोर्ट लि. यांच्यादरम्यान सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. त्यामुळे जयगड बंदर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलवाहतुकीचे कोकणातील मोठे केंद्र बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोकण रेल्वेला जोडले गेल्याने जयगड बंदरात येणाऱ्या देश-विदेशातील जहाजांतील मालाची ने-आण रेल्वेने करणे शक्य होईल. जयगड पोर्ट ही कंपनी यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. बंदरात येणाऱ्या जहाजांकडून भाडे आकारणी करणार आहे. तसेच रेल्वे माल वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जयगड परिसरात वाहतुकीशी निगडीत व्यवसायांनाही बरकत येणार आहे. (प्रतिनिधी)