शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

जयगड होणार मालवाहतूक केंद

By admin | Updated: December 2, 2014 23:32 IST

जयगड पोर्ट : जगभरातील मालाची आयात-निर्यात सुलभतेने होणार

रत्नागिरी : जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडण्याचा सामंजस्य करार झाल्याने हे बंदर येत्या काही कालावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मालवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत न्हावा-शेवा (मुंबई), जे. एन. पी. टी. व गोवा या मोठ्या बंदरांवर मालवाहतुकीचा मोठा भार आहे. जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडले जाणार असल्याने अन्य बंदरांवरील मालवाहतुकीचा भार कमी होणार आहे. डिंगणी ते जयगड पोर्ट असा ३४ किलोमीटर्सचा मालवाहतूक रेल्वेमार्ग होणार आहे. जिल्ह्यातील धामणखोल-जयगड येथे बहुउद्देशीय बारमाही चालणारे बंदर जयगड पोर्ट लिमिटेड या खासगी विकासकामार्फत विकसित केले जात आहे. जलवाहतूक ही सर्वांत स्वस्त, परवडणारी वाहतूक म्हणून जगभरात ओळखली जाते. त्यामुळे राज्यातील न्हावा-शेवा, जेएनपीटी व गोवा बंदरातून मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावरील मालवाहतूक करणारी जहाजे नेहमीच दाखल होत आहेत. परिणामी तीनही बंदरांवर कामाचा व्याप प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नवीन बंदराची शासनाला तसेच जागतिक क्षेत्रातील आयात-निर्यातदार कंपन्यांनाही प्रतीक्षा होती. जयगड बंदर ही अपेक्षा पूर्ण करू शकते. यातूनच येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर विकसित करण्याचा विचार पुढे आला. त्यासाठीच गेल्या दोन-तीन वर्षांपासून जयगड बंदर कोकण रेल्वेला मालवाहतूकीच्या दृष्टीने जोडले जावे, याबाबत कोकण रेल्वे व शासनाबरोबर या कंपनीची चर्चा सुरू होती. हा मार्ग रत्नागिरी स्थानकापासून उक्षी किंवा भोके येथून पुढे जयगड बंदराला जोडला जावा, असा प्रारंभीचा सूर होता. मात्र, नंतर हा विचार बदलला असून, आता कोकण रेल्वेमार्गावरील डिंगणी (संगमेश्वर) येथून हा मालवाहतुकीचा एकेरी मार्ग जयगड बंदराला जोडण्याचा सामंजस्य करार राज्य सरकारच्यावतीने मेरिटाइम बोर्ड, कोकण रेल्वे महामंडळ व जयगड पोर्ट लि. यांच्यादरम्यान सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. त्यामुळे जयगड बंदर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलवाहतुकीचे कोकणातील मोठे केंद्र बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोकण रेल्वेला जोडले गेल्याने जयगड बंदरात येणाऱ्या देश-विदेशातील जहाजांतील मालाची ने-आण रेल्वेने करणे शक्य होईल. जयगड पोर्ट ही कंपनी यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. बंदरात येणाऱ्या जहाजांकडून भाडे आकारणी करणार आहे. तसेच रेल्वे माल वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जयगड परिसरात वाहतुकीशी निगडीत व्यवसायांनाही बरकत येणार आहे. (प्रतिनिधी)