शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

नाशिक, नगर मधून जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

By admin | Updated: October 30, 2015 17:50 IST

तहानलेल्या मराठवाड्यासाठी नगर व नाशिकमधून जायकवाडी धरणात १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - तहानलेल्या मराठवाड्यासाठी नगर व नाशिकमधून जायकवाडी धरणात १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अनिल कदम या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पाणी देण्याच्या निर्णयास विरोध करतानाच याचिका दाखल केली होती.
नाशिकमध्येच हजारो गावं दुष्काळी असताना इथलं पाणी देण्यात येऊ नये अशी भूमिका कदम व अन्य विरोधकांनी घेतली आहे. विशेष म्हणजे भाजपा वगळता सगळे पक्ष या निर्णयाविरोधात आहेत. मात्र, भाजपाने मराठवाड्यासाठी जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थात, किती पाणी सोडायचे, नक्की गरज किती आहे याबाबत राज्याच्या जलसंपदा महामंडळाची पूर्वपरवानगी घेऊनच अशा प्रकारचा निर्णय घ्यावा असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाट्टेल त्या परिस्थितीत नाशिकचं पाणी वळवू देणार नाही अशी भूमिकाही कदम यांनी मांडली आहे, त्यासाठी आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे.
या सगळ्या प्रकारावरून येत्या काळात पाण्यावरून प्रदेशा प्रदेशामध्ये संघर्ष घडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.