शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

श्रमदानाला येणाऱ्यांची मोफत दाढी-कटिंग! लातूरमधील नाभिकाचा अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 02:01 IST

जलसंवर्धनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी तालुक्यात श्रमदानाची चळवळ गतिमान झाली आहे. त्याला आणखी चालना मिळावी म्हणून गुरधाळ येथील एका नाभिकाने श्रमदात्यांसाठी चक्क शेतीच्या बांधावर मोफत दाढी-कटिंग सुरू केले आहे.

देवणी (जि. लातूर) : जलसंवर्धनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी तालुक्यात श्रमदानाची चळवळ गतिमान झाली आहे. त्याला आणखी चालना मिळावी म्हणून गुरधाळ येथील एका नाभिकाने श्रमदात्यांसाठी चक्क शेतीच्या बांधावर मोफत दाढी-कटिंग सुरू केले आहे. गुरधाळ गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे गावात श्रमदानाचे काम सुरूआहे. मात्र, गावातील काही शेतकरी दाढी- कटींग करण्यासाठी गावात थांबत असल्याचे नाभिक कारागीर गोपाळ गुरधाळकर यांनी पाहिले़ या शेतकºयांचा वेळ वाया जावू नये आणि श्रमदानात सहभाग वाढावा म्हणून त्यांनी बांधावरच दाढी-कटींग सुरू केले आहे.आमीरने दिली टाळ्या वाजवून दादबॉलिवुड स्टार अमीर खानने सुरू केलेला पाणी फाउंडेशनचा उपक्रम शेतकºयांसाठी विशेष लाभदायी आहे. अमीर खानने येथे येऊन श्रमदान करावे आणि मला त्याची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा गोपाळ गुरधाळकर यांनी सोशल मीडियावरून अमीर खानकडे व्यक्त केली होती. यावर आमीरने टाळ्या वाजवून प्रतिसाद दिल्याची क्लिप व्हायरल झाली आहे.

बारा बलुतेदारांपैकी मी एक आहे़ सर्वांची उपजीविका शेतक-यांवर अवलंबून आहे. शेतक-यांकडे पिकले, तरच आपल्याला मिळणार. शेत बहरावे यासाठी श्रमदानातून पाणी मुरविणे गरजेचे आहे. त्यासाठीच माझा हा प्रयत्न आहे.- गोपाळ गुरधाळकरमहाराष्ट्रदिनी महाश्रमदान - आमिर खानपुणे : महाराष्ट्रात सुरू असलेल्या ‘पानी फाउंडेशन’ संस्थेच्या पाणलोट क्षेत्रातील कामाला वेग आला आहे. महाराष्ट्रदिनी चार हजार गावांमध्ये शहरवासीयांना कामाची संधी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती ‘पानी फाउंडेशन’चे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी दिली. खान यांनी पत्रकार परिषदेत महाश्रमदानामागची संकल्पना विशद केली.ते म्हणाले, यंदा महाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांतील चार हजारहून अधिक गावे वॉटरकप स्पर्धेसाठी सहभागी झाली आहेत. दुष्काळग्रस्त भागातील गावांत अधिक जोमाने काम सुरू आहे. महाश्रमदानामध्ये सहभागी होऊ इच्छिणाºयांनी जलमित्र पानी फाउंडेशनच्या वेबसाइटवर जवळच्या गावासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.प्रत्येकाला तीन तासांचे काम देण्यात येणार आहे. त्यामुळे या कामात प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींनी सहभागी व्हावे. ग्रामीण भागातले काम पूर्ण झाल्यावर शहरी भागातही पाणी फाउंडेशन भविष्यात काम करणार आहे. असे झाल्यास पुढील पाच वर्षांत ‘पानी फाऊंडेशन’ची गरज भासणार नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र