शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानाला येणाऱ्यांची मोफत दाढी-कटिंग! लातूरमधील नाभिकाचा अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 02:01 IST

जलसंवर्धनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी तालुक्यात श्रमदानाची चळवळ गतिमान झाली आहे. त्याला आणखी चालना मिळावी म्हणून गुरधाळ येथील एका नाभिकाने श्रमदात्यांसाठी चक्क शेतीच्या बांधावर मोफत दाढी-कटिंग सुरू केले आहे.

देवणी (जि. लातूर) : जलसंवर्धनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी तालुक्यात श्रमदानाची चळवळ गतिमान झाली आहे. त्याला आणखी चालना मिळावी म्हणून गुरधाळ येथील एका नाभिकाने श्रमदात्यांसाठी चक्क शेतीच्या बांधावर मोफत दाढी-कटिंग सुरू केले आहे. गुरधाळ गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे गावात श्रमदानाचे काम सुरूआहे. मात्र, गावातील काही शेतकरी दाढी- कटींग करण्यासाठी गावात थांबत असल्याचे नाभिक कारागीर गोपाळ गुरधाळकर यांनी पाहिले़ या शेतकºयांचा वेळ वाया जावू नये आणि श्रमदानात सहभाग वाढावा म्हणून त्यांनी बांधावरच दाढी-कटींग सुरू केले आहे.आमीरने दिली टाळ्या वाजवून दादबॉलिवुड स्टार अमीर खानने सुरू केलेला पाणी फाउंडेशनचा उपक्रम शेतकºयांसाठी विशेष लाभदायी आहे. अमीर खानने येथे येऊन श्रमदान करावे आणि मला त्याची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा गोपाळ गुरधाळकर यांनी सोशल मीडियावरून अमीर खानकडे व्यक्त केली होती. यावर आमीरने टाळ्या वाजवून प्रतिसाद दिल्याची क्लिप व्हायरल झाली आहे.

बारा बलुतेदारांपैकी मी एक आहे़ सर्वांची उपजीविका शेतक-यांवर अवलंबून आहे. शेतक-यांकडे पिकले, तरच आपल्याला मिळणार. शेत बहरावे यासाठी श्रमदानातून पाणी मुरविणे गरजेचे आहे. त्यासाठीच माझा हा प्रयत्न आहे.- गोपाळ गुरधाळकरमहाराष्ट्रदिनी महाश्रमदान - आमिर खानपुणे : महाराष्ट्रात सुरू असलेल्या ‘पानी फाउंडेशन’ संस्थेच्या पाणलोट क्षेत्रातील कामाला वेग आला आहे. महाराष्ट्रदिनी चार हजार गावांमध्ये शहरवासीयांना कामाची संधी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती ‘पानी फाउंडेशन’चे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी दिली. खान यांनी पत्रकार परिषदेत महाश्रमदानामागची संकल्पना विशद केली.ते म्हणाले, यंदा महाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांतील चार हजारहून अधिक गावे वॉटरकप स्पर्धेसाठी सहभागी झाली आहेत. दुष्काळग्रस्त भागातील गावांत अधिक जोमाने काम सुरू आहे. महाश्रमदानामध्ये सहभागी होऊ इच्छिणाºयांनी जलमित्र पानी फाउंडेशनच्या वेबसाइटवर जवळच्या गावासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.प्रत्येकाला तीन तासांचे काम देण्यात येणार आहे. त्यामुळे या कामात प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींनी सहभागी व्हावे. ग्रामीण भागातले काम पूर्ण झाल्यावर शहरी भागातही पाणी फाउंडेशन भविष्यात काम करणार आहे. असे झाल्यास पुढील पाच वर्षांत ‘पानी फाऊंडेशन’ची गरज भासणार नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र