शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डीतील विद्यार्थिनींना मोफत बस सुविधा

By admin | Updated: July 23, 2016 11:08 IST

अहमदनगर जिल्हयातील कोपर्डी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलींना शाळेतून घरापर्यंत ने आण करण्यासाठी सीसीटीव्हींनी सुसज्ज अशा चार बसेसचं लोकार्पण जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेच्या हस्ते करण्यात आले.

ठाणे, दि. २३ - अहमदनगर जिल्हयातील कोपर्डी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलींना शाळेतून घरापर्यंत ने आण करण्यासाठी सीसीटीव्हींनी सुसज्ज अशा चार बसेसचं लोकार्पण जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राष्ट्रीय संत भय्यूजी महाराज यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आलं. मुली आणि पालकांच्या मनातील भीती नाहीशी करुन त्यांना दिलासा देण्यासाठी भय्यूजी महाराज यांनी यावर कायमस्वरुपी सकारात्मक तोडगा काढण्याचे आवाहन केले. त्याला स्वत: पुढाकार घेऊन सर्वोदय या त्यांच्या संस्थेमार्फत २२ लाख रुपये खर्चातून कोपर्डी भागात दोन आणि बीड जिल्हयात दोन अशा चार बसेस दिल्या आहेत. शालेय मुलींना या बसद्वारे घर ते शाळा आणि परतीचा प्रवास नि:शुल्क केला जाणार असल्याची माहिती सूर्योदय संस्थेच्या प्रशाशकीय अधिकारी तथा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल आणि पालघर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख उपनेते अनंत तरे यांनी ठाण्यात दिली. अशा घटना रोखण्यासाठी जसा कडक कायदा गरजेचा आहे, तसा सामाजिक बदल आणि संस्कार रुजविण्याची गरज आहे. त्यासाठी सूर्योदय परिवार राज्यातील शाळांमध्ये संस्कारवान विद्यार्थी निर्माण करण्यासाठी संस्कार अभियान राबविणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. कोपर्डी घटनेतील निर्भयाची आई या व्यवस्था समितीची अध्यक्ष असून बसमध्ये सीसीटीव्हीसह , व्हीडीओ रेकॉर्डर, लोकेशन ट्रेकर, गाडी निघतांना आणि पोहचतांना पालकांना सूचित करणारी संदेश यंत्रणाही समाविष्ट केली आहे. या योजनेचे व्यवस्थापन स्थानिक ग्रामस्थांकडे सोपविण्यात आलं असून योजनेचा संपूर्ण खर्च सूर्योदय या संस्थेमार्फत केला जाणार आहे. समाजात अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्हयात सूर्योदय संस्कार अभियानाचा प्रारंभ केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशा घटनांपासून घाबरुन न जाता मुलींना मानसिक बळ मिळावं यासाठी सूर्योदय कुहू कन्याधन सुरक्षा योजनेंतर्गत मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. * कोपर्डीच्या घटनेनंतर आसपासच्या ३३ हजार मुली शाळेत जाण्यास धजावत नव्हत्या. तर पिडीत मुलीची बहिणही यंदा बारावीत असूनही तिलाही शाळेत पाठविण्यास आईने साशंकता व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर केवळ आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा येथील मुलींना सुविधा आणि सुरक्षा देण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम सुरु केल्याचं अनुराधा पौडवाल यांनी सांगितलं.