शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटात फसवणूक: न्यायालयाकडून प्रसाद लाड यांना तात्पुरता दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 11:01 IST

पाच वर्षांपूर्वी नोंदविलेला गुन्हा व त्यानंतर प्रकरण बंद झाले तरीही पोलिसांनी नोटीस बजावली. हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे. २०१४ मध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा नोंदविल्याची बाब आपल्याला डिसेंबर २० मध्ये बजावलेल्या नोटिसीद्वारे समजले. त्यापूर्वी आपल्याला त्याबाबत साधी कल्पनाही नव्हती, असे लाड यांनी याचिकेत म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  २०१४ मध्ये मुंबई महापालिकेतील एका कंत्राटात फसवणूक केल्याप्रकरणी व बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप असलेले भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना उच्च न्यायालयाने तीन आठवडे अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. 

बिमल अगरवाल यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नोंदविलेल्या जुन्या एफआयआर प्रकरणात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने  डिसेंबर २०२० मध्ये नोटीस बजावल्यानंतर लाड यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. पी. बी. वराळे व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठापुढे होती. 

 पाच वर्षांपूर्वी नोंदविलेला गुन्हा व त्यानंतर प्रकरण बंद झाले तरीही पोलिसांनी नोटीस बजावली. हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे. २०१४ मध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा नोंदविल्याची बाब आपल्याला डिसेंबर २० मध्ये बजावलेल्या नोटिसीद्वारे समजले. त्यापूर्वी आपल्याला त्याबाबत साधी कल्पनाही नव्हती, असे लाड यांनी याचिकेत म्हटले आहे.

लाड यांना खरोखरच नोटीस बजावल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदविल्याची माहिती मिळाली का? असा सवाल करत न्यायालयाने आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला याबाबत उत्तर देण्याचे निर्देश दिले.‘याचिकादारांनी (लाड) यांनी दिलेली माहिती खोटी निघाली तर त्यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देणारे आदेश मागे घेण्यात येतील,’ असे न्यायालयाने स्पष्ट करत लाड यांना तीन आठवडे अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले.

टॅग्स :Prasad Ladप्रसाद लाड