शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अनुकंपा सेवाभरतीसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मैदानात

By admin | Updated: March 4, 2017 01:58 IST

राज्याच्या शासकीय सेवेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पाल्यास विनाअट अनुकंपा सेवाभरती करावी

मुंबई : राज्याच्या शासकीय सेवेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पाल्यास विनाअट अनुकंपा सेवाभरती करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने १० मार्चला मोर्चाची हाक दिली आहे. भायखळ्यातील राणीबाग मैदान येथून आझाद मैदानापर्यंत निघणाऱ्या मोर्चात हजारो कर्मचारी सामील होण्याचा अंदाज संघटनेने व्यक्त केला आहे.चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्यानेच संघटनेला मोर्चा काढावा लागत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी सांगितले. पठाण म्हणाले की, चतुर्थ श्रेणीतील महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन सेवेत सन्मानजनक वागणूक मिळत नाही. सोबतच महिला कर्मचाऱ्यांना गणवेश बदलण्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्थाही शासनाकडे नाही. त्यामुळे सन्मानजनक वागणुकीसोबत महिला कर्मचाऱ्यांना स्वतंत्र खोली व लॉकर्स देण्याची संघटनेची प्रमुख मागणी आहे. दरम्यान, शासकीय निवासस्थाने कर्मचाऱ्यांच्या नावावर करा, पदोन्नतीची संधी ५० टक्के करताना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निष्कासित करू नका, महसूल विभागात लिपिकांप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना तलाठी पदावर नियुक्ती द्या, अशा मागण्यांचे निवेदन संघटनेने शासनाला सादर केले आहे.(प्रतिनिधी)