शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

चौदा हजार कारखाने कामगार कायद्यातून मुक्त

By admin | Updated: July 24, 2015 01:38 IST

इन्स्पेक्टर राजला पायबंद घालण्यासाठी कारखाने अधिनियम १९४८मध्ये बदल, दुरुस्ती करणारे विधेयक आज विधानसभेने आवाजी मतदानाने

मुंबई : इन्स्पेक्टर राजला पायबंद घालण्यासाठी कारखाने अधिनियम १९४८मध्ये बदल, दुरुस्ती करणारे विधेयक आज विधानसभेने आवाजी मतदानाने मंजूर केले. यामुळे राज्यातील १४,३०० कारखाने या अधिनियमाच्या कक्षेतून मुक्त होणार आहेत. शिवाय कारखान्यांच्या संख्येतही वाढ होऊन रोजगार वाढेल, असा दावा कामगारमंत्री प्रकाश महेता यांनी आज विधानसभेत केला.येत्या महिन्याभरात कामगार, मालक आणि विधिमंडळाचे सदस्य यांची त्रिस्तरीय समिती स्थापन केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. राज्यात उद्योगपती जर कामगारांच्या पाठीत खंजीर खुपसत असतील तर कामगारांसोबत कारखान्यांवर जाऊन कामगारांना न्याय दिला जाईल, असेही महेता म्हणाले. हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी महेता यांना मात्र सभागृहात सदस्यांचे मन वळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.कारखान्यातील काम करणाऱ्या कामगारांच्या संख्येत वाढ करून विजेच्या वापरावर चालणारे तसेच विजेच्या वापराविना चालणाऱ्या कारखान्यातील कामगारांच्या संख्येत अनुक्रमे १० व २०ऐवजी २० व ४० असा बदल करण्यात आला आहे. विधेयकामुळे खालील बदल होतीलअतिकालीक (ओव्हरटाइम) करण्यासाठी कारखाने निरीक्षकांची पूर्वपरवानगी घेण्याची अट रद्द. यामुळे इन्स्पेक्टर राजला प्रतिबंध.ओव्हरटाइम तासाची मर्यादा ७५ वरून ११५ करण्यात आली आहे. त्यामुळे जादा काम करून आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी.महिलांना रात्रपाळीत स्वेच्छेने काम करण्यास संधी उपलब्ध करण्यासाठी रात्री ७ ते सकाळी ६ या कालावधीत काम करण्यास प्रतिबंध करणारे कलम रद्द.भरपगारी रजेस पात्र होण्याची मर्यादा २४० दिवसांवरून ९० दिवस.शासन अधिसूचना काढून ज्या गुन्ह्यासंबंधी कम्पाउंडिंगची तरतूद करायची आहे त्याची अनुसूची तयार करेल. तसेच या सूचीमध्ये जे अधिकारी सक्षम आहेत तेच दंडाची रक्कम निश्चित करतील.मुख्य कारखाने निरीक्षकांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय न्यायालयात गुन्हा, खटला दाखल करण्यात येऊ नये, न्यायप्रविष्ट होणाऱ्या प्रकरणावर निरीक्षकांचे नियंत्रण राहील.