शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

ठाण्यातील ‘त्या’ चार नगरसेवकांना दिलासा

By admin | Updated: April 26, 2016 03:32 IST

बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता

ठाणे : बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. परंतु, यामध्ये सभागृहाचा कल पाहून या प्रकरणातील कायदेशीर बाबी तपासून आणि कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घ्यावा, असे आदेश पीठासीन अधिकारी तथा महापौर संजय मोरे यांनी दिले. त्यामुळे या चार नगरसेवकांना महासभेने तात्पुरता दिलासा दिला असला तरी नगरविकास खाते आता कोणते पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. परमार यांनी ७ आॅक्टोबर रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत महापालिकेतील सुधाकर चव्हाण, विक्र ांत चव्हाण, हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला या नगरसेवकांच्या नावांचा उल्लेख होता. त्या आधारावर या चौघांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली अटक झाली होती. तब्बल सव्वादोन महिने कारागृहात काढल्यानंतर सर्वांची सशर्त जामिनावर सुटका झाली आहे. जामीन मिळाल्याचा दिलासा मिळाला असतानाच शासनाच्या नगरविकास खात्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या. यासंदर्भात त्यांनी ठाणे महापालिकेला पत्रही पाठवले होते. त्यानुसार, मार्च महिन्यात चारही नगरसेवकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, या नगरसेवकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर पालिकेच्या सभागृहात दोनतृतीयांश मतांनी अपात्रतेचा ठराव मंजूर झाला, तरच त्यांचे नगरसेवकपद रद्द होऊ शकणार आहे. त्यानुसार, त्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव महासभेत सादर झाला होता. परंतु, यासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे लक्षात घेऊन सदस्य अमित सरय्या यांनी कलम १३ (१) नेमके काय आहे, त्या धर्तीवर यापूर्वी कोणावर कारवाई झाली आहे का, अशा आशयाचे पत्र महापौरांना सादर केले. तसेच भाजपाचे नगरसेवक मिलिंद पाटणकर, विरोधी पक्षनेते संजय भोईर आणि प्रभारी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील निर्णय घ्यावा, अशी सूचना केली. तर, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी १३ (१) या कलमाविषयी माहिती देऊन हे प्रकरण प्रशासनाने सादर केले नसून शासनाच्या निर्देशानुसार ते पटलावर आणल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)