शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

ठाण्यातील ‘त्या’ चार नगरसेवकांना दिलासा

By admin | Updated: April 26, 2016 03:32 IST

बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता

ठाणे : बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. परंतु, यामध्ये सभागृहाचा कल पाहून या प्रकरणातील कायदेशीर बाबी तपासून आणि कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घ्यावा, असे आदेश पीठासीन अधिकारी तथा महापौर संजय मोरे यांनी दिले. त्यामुळे या चार नगरसेवकांना महासभेने तात्पुरता दिलासा दिला असला तरी नगरविकास खाते आता कोणते पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. परमार यांनी ७ आॅक्टोबर रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत महापालिकेतील सुधाकर चव्हाण, विक्र ांत चव्हाण, हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला या नगरसेवकांच्या नावांचा उल्लेख होता. त्या आधारावर या चौघांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली अटक झाली होती. तब्बल सव्वादोन महिने कारागृहात काढल्यानंतर सर्वांची सशर्त जामिनावर सुटका झाली आहे. जामीन मिळाल्याचा दिलासा मिळाला असतानाच शासनाच्या नगरविकास खात्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या. यासंदर्भात त्यांनी ठाणे महापालिकेला पत्रही पाठवले होते. त्यानुसार, मार्च महिन्यात चारही नगरसेवकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, या नगरसेवकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर पालिकेच्या सभागृहात दोनतृतीयांश मतांनी अपात्रतेचा ठराव मंजूर झाला, तरच त्यांचे नगरसेवकपद रद्द होऊ शकणार आहे. त्यानुसार, त्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव महासभेत सादर झाला होता. परंतु, यासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे लक्षात घेऊन सदस्य अमित सरय्या यांनी कलम १३ (१) नेमके काय आहे, त्या धर्तीवर यापूर्वी कोणावर कारवाई झाली आहे का, अशा आशयाचे पत्र महापौरांना सादर केले. तसेच भाजपाचे नगरसेवक मिलिंद पाटणकर, विरोधी पक्षनेते संजय भोईर आणि प्रभारी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील निर्णय घ्यावा, अशी सूचना केली. तर, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी १३ (१) या कलमाविषयी माहिती देऊन हे प्रकरण प्रशासनाने सादर केले नसून शासनाच्या निर्देशानुसार ते पटलावर आणल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)