शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

कोकणातील चार नद्यांचे होणार पुनरुज्जीवन

By admin | Updated: January 7, 2016 02:19 IST

कोकणातील पाण्याचे नियोजन करून चार प्रमुख नद्यांना पुनर्जिवन देण्यासाठी जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांनी पुढाकार घेतला आहे.

मुंबई : कोकणातील पाण्याचे नियोजन करून चार प्रमुख नद्यांना पुनर्जिवन देण्यासाठी जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सिंह एक लोकचळवळ उभारणार असून त्याची सुरूवात १५ ते १९ जानेवारीदरम्यान कोकण जलपरिक्रमेने होणार आहे. या अभियानाची घोषणा बुधवारी झाली. कोकण भूमी प्रतिष्ठान, हिरवळ प्रतिष्ठान व जलबिरादरी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या जलअभियानाची सुरूवात होत आहे. त्यानुसार कोकणातील गांधारी, जगबुडी, अर्जुना नदी, जानवली नदी या चार नद्यांवर काम करण्यात येईल. नद्यांवर बांध घालणे, गाळाने भरलेले डोह उपसून पूर्ववत करणे, साठलेल्या पाण्याचा उपयोग आधुनिक शेती व रोजगार निर्मितीसाठी करणे या सर्व गोष्टी अभियानाच्या माध्यमातून राबवल्या जातील. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, कोकणात पाण्याची कमतरता नसली, तरी नियोजनाअभावी पुढील चार वर्षांत फार बिकट परिस्थिती निर्माण होईल. सध्यातरी येथील चाकरमानी मुंबई, पुणे सारख्या शहरांतील उत्पन्नावर जगत आहेत. मात्र ही लक्ष्मीही त्यांना यापुढे तारू शकणार नाही. त्यामुळे भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी हे सोपे काम आटोपण्याचा प्रयत्न असेल. नंतर मराठवाडा आणि विदर्भ येथील नियोजनावर काम करणार आहे.पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या नाहीच : पाण्याअभावी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करतात, हे साफ चुकीचे कारण असल्याचे मत सिंह यांनी मांडले. ते म्हणाले, देशात पाण्याची सर्वाधिक कमतरता राजस्थानमध्ये आहे. मात्र, तिथे एकही शेतकरी आत्महत्या करीत नाही. बँक आणि शेतीच्या बाजारीकरणातील दुष्टचक्रामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत.मराठवाड्यात ऊस उत्पादनावर बंदी घाला : पाणी आणि मातीची कमतरता आहे, अशा ठिकाणी सर्वाधिक साखर कारखाने असणे, चुकीचे असल्याचे मत सिंह यांनी व्यक्त केले. दुष्काळग्रस्त भागातील उसाच्या उत्पादनावर बंदी घालून, त्या ठिकाणी कमी पाण्यावर येणारी पिके घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.