शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कोकणातील चार नद्यांचे होणार पुनरुज्जीवन

By admin | Updated: January 7, 2016 02:19 IST

कोकणातील पाण्याचे नियोजन करून चार प्रमुख नद्यांना पुनर्जिवन देण्यासाठी जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांनी पुढाकार घेतला आहे.

मुंबई : कोकणातील पाण्याचे नियोजन करून चार प्रमुख नद्यांना पुनर्जिवन देण्यासाठी जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सिंह एक लोकचळवळ उभारणार असून त्याची सुरूवात १५ ते १९ जानेवारीदरम्यान कोकण जलपरिक्रमेने होणार आहे. या अभियानाची घोषणा बुधवारी झाली. कोकण भूमी प्रतिष्ठान, हिरवळ प्रतिष्ठान व जलबिरादरी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या जलअभियानाची सुरूवात होत आहे. त्यानुसार कोकणातील गांधारी, जगबुडी, अर्जुना नदी, जानवली नदी या चार नद्यांवर काम करण्यात येईल. नद्यांवर बांध घालणे, गाळाने भरलेले डोह उपसून पूर्ववत करणे, साठलेल्या पाण्याचा उपयोग आधुनिक शेती व रोजगार निर्मितीसाठी करणे या सर्व गोष्टी अभियानाच्या माध्यमातून राबवल्या जातील. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, कोकणात पाण्याची कमतरता नसली, तरी नियोजनाअभावी पुढील चार वर्षांत फार बिकट परिस्थिती निर्माण होईल. सध्यातरी येथील चाकरमानी मुंबई, पुणे सारख्या शहरांतील उत्पन्नावर जगत आहेत. मात्र ही लक्ष्मीही त्यांना यापुढे तारू शकणार नाही. त्यामुळे भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी हे सोपे काम आटोपण्याचा प्रयत्न असेल. नंतर मराठवाडा आणि विदर्भ येथील नियोजनावर काम करणार आहे.पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या नाहीच : पाण्याअभावी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करतात, हे साफ चुकीचे कारण असल्याचे मत सिंह यांनी मांडले. ते म्हणाले, देशात पाण्याची सर्वाधिक कमतरता राजस्थानमध्ये आहे. मात्र, तिथे एकही शेतकरी आत्महत्या करीत नाही. बँक आणि शेतीच्या बाजारीकरणातील दुष्टचक्रामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत.मराठवाड्यात ऊस उत्पादनावर बंदी घाला : पाणी आणि मातीची कमतरता आहे, अशा ठिकाणी सर्वाधिक साखर कारखाने असणे, चुकीचे असल्याचे मत सिंह यांनी व्यक्त केले. दुष्काळग्रस्त भागातील उसाच्या उत्पादनावर बंदी घालून, त्या ठिकाणी कमी पाण्यावर येणारी पिके घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.