शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कोकणातील चार नद्यांचे होणार पुनरुज्जीवन

By admin | Updated: January 7, 2016 02:19 IST

कोकणातील पाण्याचे नियोजन करून चार प्रमुख नद्यांना पुनर्जिवन देण्यासाठी जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांनी पुढाकार घेतला आहे.

मुंबई : कोकणातील पाण्याचे नियोजन करून चार प्रमुख नद्यांना पुनर्जिवन देण्यासाठी जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सिंह एक लोकचळवळ उभारणार असून त्याची सुरूवात १५ ते १९ जानेवारीदरम्यान कोकण जलपरिक्रमेने होणार आहे. या अभियानाची घोषणा बुधवारी झाली. कोकण भूमी प्रतिष्ठान, हिरवळ प्रतिष्ठान व जलबिरादरी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या जलअभियानाची सुरूवात होत आहे. त्यानुसार कोकणातील गांधारी, जगबुडी, अर्जुना नदी, जानवली नदी या चार नद्यांवर काम करण्यात येईल. नद्यांवर बांध घालणे, गाळाने भरलेले डोह उपसून पूर्ववत करणे, साठलेल्या पाण्याचा उपयोग आधुनिक शेती व रोजगार निर्मितीसाठी करणे या सर्व गोष्टी अभियानाच्या माध्यमातून राबवल्या जातील. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, कोकणात पाण्याची कमतरता नसली, तरी नियोजनाअभावी पुढील चार वर्षांत फार बिकट परिस्थिती निर्माण होईल. सध्यातरी येथील चाकरमानी मुंबई, पुणे सारख्या शहरांतील उत्पन्नावर जगत आहेत. मात्र ही लक्ष्मीही त्यांना यापुढे तारू शकणार नाही. त्यामुळे भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी हे सोपे काम आटोपण्याचा प्रयत्न असेल. नंतर मराठवाडा आणि विदर्भ येथील नियोजनावर काम करणार आहे.पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या नाहीच : पाण्याअभावी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करतात, हे साफ चुकीचे कारण असल्याचे मत सिंह यांनी मांडले. ते म्हणाले, देशात पाण्याची सर्वाधिक कमतरता राजस्थानमध्ये आहे. मात्र, तिथे एकही शेतकरी आत्महत्या करीत नाही. बँक आणि शेतीच्या बाजारीकरणातील दुष्टचक्रामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत.मराठवाड्यात ऊस उत्पादनावर बंदी घाला : पाणी आणि मातीची कमतरता आहे, अशा ठिकाणी सर्वाधिक साखर कारखाने असणे, चुकीचे असल्याचे मत सिंह यांनी व्यक्त केले. दुष्काळग्रस्त भागातील उसाच्या उत्पादनावर बंदी घालून, त्या ठिकाणी कमी पाण्यावर येणारी पिके घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.